शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : सद्य परिस्थितीत सर्वत्र जलस्रोत निर्मितीस महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक संघटना, शासन, समाज, कार्यकर्ते यासाठीचे पूरक उपक्रम राबवीत असताना येथील नैसर्गिक गावतळ्याचा जीर्णाेद्धार करून त्यास पुनरुज्जीवित करणे यामुळे गावातील इतर जलस्रोतांना पाझराने पाणी पातळी वाढू शकते. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पुढाकारास महत्त्व आहे. येथील गावतळ्याच्या पाण्याचा वापर कपडे धुणे, जनावरांसाठी व इतर उपयोगासाठी होत होता. तळ्यात साठणारे पाणी पाझर होऊन परिसरातील विहिरींना पाण्याची कमतरता भासत नव्हती. तळ्यामध्ये पाणी कमी झाले तर पंचगंगा साखर कारखान्याच्या सिंचन नलिकेमधील पाणी तळ्यात सोडून पाणी पातळी योग्य राखली जात होती. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासून तळे कोरडे पडले आहे. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. तळ्याशेजारी कुमार विद्यामंदिर शाळा असल्याने कचऱ्याची दुर्गंधी व त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तळ्याचे सुशोभीकरण करून तेथे ग्रामस्थांसाठी नाना-नानी पार्क, पदपथ, खत प्रकल्प उभारण्याचा यापूर्वी ग्रामपंचायतीने केलेला ठराव फक्त कागदोपत्रीच राहिला आहे. गावतळे सुशोभित झाल्यास परिसर नयनरम्य होऊ शकतो. बाजूलाच ग्रामदैवत लक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. त्याठिकाणी येणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ होऊ शकतो. तळ्याशेजारी असलेल्या स्मशानभूमीसही संरक्षक भिंत नसल्याने तेथील अनावश्यक साहित्य तळ्यात पडते. शासन पातळीवर पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार सामाजिक संघटनाच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहभागातून सातारा-खटाव परिसरात वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने पाणीस्रोत उभे राहिले आहे. सांगलीच्या पूर्व भागात ग्रामस्थांच्या सहभागाने या नदीची रुंदी वाढवून गाळ काढून प्रवाह मोठा बनला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीचा प्रवाह रुंदीकरणाचे सुमारे सहा किलोमीटरचे काम ग्रामस्थांचा सहभाग व दानशुरांचे सहकार्य यातून होत आहे. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे गावतळ्याचे पुनरुज्जीवन करण्यात येऊन त्याचे सुशोभीकरण केल्याने गावच्या सौदर्यांत भर पडली आहे. गावतळ्याची खोली, रुंदी वाढवून पाणीसाठ्याची क्षमता वाढविल्यास पावसाचा पाणीसाठा जलस्रोत वाढीस पूरक ठरणार आहे. गावतळे शासन दरबारी नोंदीची उलट-सुलट चर्चा असताना ग्रामस्थांच्या व सार्वजनिक हितापुढे शासकीय नोंदीचे महत्त्व कमी आहे. यड्राव परिसरात मोठमोठे उद्योग आहेत. येथील दानशूर मंडळी समाजहिताच्या कार्यात सहभागी होऊ शकतील. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज आहे.