शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

यड्रावचे गावतळे पुनरुज्जीवित होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : सद्य परिस्थितीत सर्वत्र जलस्रोत निर्मितीस महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक संघटना, शासन, समाज, कार्यकर्ते यासाठीचे पूरक उपक्रम राबवीत असताना येथील नैसर्गिक गावतळ्याचा जीर्णाेद्धार करून त्यास पुनरुज्जीवित करणे यामुळे गावातील इतर जलस्रोतांना पाझराने पाणी पातळी वाढू शकते. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पुढाकारास महत्त्व आहे. येथील गावतळ्याच्या पाण्याचा वापर कपडे धुणे, जनावरांसाठी व इतर उपयोगासाठी होत होता. तळ्यात साठणारे पाणी पाझर होऊन परिसरातील विहिरींना पाण्याची कमतरता भासत नव्हती. तळ्यामध्ये पाणी कमी झाले तर पंचगंगा साखर कारखान्याच्या सिंचन नलिकेमधील पाणी तळ्यात सोडून पाणी पातळी योग्य राखली जात होती. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासून तळे कोरडे पडले आहे. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. तळ्याशेजारी कुमार विद्यामंदिर शाळा असल्याने कचऱ्याची दुर्गंधी व त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तळ्याचे सुशोभीकरण करून तेथे ग्रामस्थांसाठी नाना-नानी पार्क, पदपथ, खत प्रकल्प उभारण्याचा यापूर्वी ग्रामपंचायतीने केलेला ठराव फक्त कागदोपत्रीच राहिला आहे. गावतळे सुशोभित झाल्यास परिसर नयनरम्य होऊ शकतो. बाजूलाच ग्रामदैवत लक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. त्याठिकाणी येणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ होऊ शकतो. तळ्याशेजारी असलेल्या स्मशानभूमीसही संरक्षक भिंत नसल्याने तेथील अनावश्यक साहित्य तळ्यात पडते. शासन पातळीवर पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार सामाजिक संघटनाच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहभागातून सातारा-खटाव परिसरात वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने पाणीस्रोत उभे राहिले आहे. सांगलीच्या पूर्व भागात ग्रामस्थांच्या सहभागाने या नदीची रुंदी वाढवून गाळ काढून प्रवाह मोठा बनला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीचा प्रवाह रुंदीकरणाचे सुमारे सहा किलोमीटरचे काम ग्रामस्थांचा सहभाग व दानशुरांचे सहकार्य यातून होत आहे. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे गावतळ्याचे पुनरुज्जीवन करण्यात येऊन त्याचे सुशोभीकरण केल्याने गावच्या सौदर्यांत भर पडली आहे. गावतळ्याची खोली, रुंदी वाढवून पाणीसाठ्याची क्षमता वाढविल्यास पावसाचा पाणीसाठा जलस्रोत वाढीस पूरक ठरणार आहे. गावतळे शासन दरबारी नोंदीची उलट-सुलट चर्चा असताना ग्रामस्थांच्या व सार्वजनिक हितापुढे शासकीय नोंदीचे महत्त्व कमी आहे. यड्राव परिसरात मोठमोठे उद्योग आहेत. येथील दानशूर मंडळी समाजहिताच्या कार्यात सहभागी होऊ शकतील. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज आहे.