शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

वारणा उजवा कालव्याच्या कामास गती मिळणार का?

By admin | Updated: April 23, 2017 23:58 IST

उर्वरित कामाची प्रतीक्षा : वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरवारणा उजवा कालव्याच्या तीस वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थांबलेल्या उर्वरित कामास राज्य शासन गती देणार का, असा प्रश्न शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आशिया खंडातील पहिले मातीचे धरण चांदोली येथे शासनाने बांधले आहे. चांदोली धरणापासून हा कालवा शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील कोतोली, भेडसगाव, सरूड, चरण, डोणोली, सातवे, सावर्डे, वारणानगर मार्गे सांगली जिल्ह्यात जातो. १९७७ ते ७८ च्या दरम्यान या कालव्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर चांदोलीपासून शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावापर्यंत या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.शासनाच्या पाटबंधारे विभागाने साधारणपणे ७० किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रखडत हे काम चालू होते. आजपर्यंत काम बंद अवस्थेत आहे. कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नाममात्र दराने मोबदला मिळाला. काही ठिकाणी जमिनीचे भूसंपादन न करता कालव्याचे काम सुरू होते. या ठिकाणी अर्धवट असे सेतूचे खांब उभे आहेत. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतामध्ये पिकेसुद्धा घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.या कालव्यासाठी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांची सुमारे चारशे ते पाचशे एकर जमीन कालव्याच्या खुदाईत गेली आहे. शेतकऱ्यांना हा कालवा वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे. फडणवीस सरकारने याकडे लक्ष देऊन निधी मंजूर करावा. जेणेकरून रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यांतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.१ २००६ साली या कालव्याचे काम सुरू झाले त्यावेळी आता हा कालवा पूर्णत्वास जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु या कालव्याचे पाणी ज्या भागातून जाते त्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा वापर शेतीसाठी मिळणार की नाही, याचाही संभ्रम लोकांच्या मनात आहे. २ हा कालवा कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार होत आहे. दुष्काळी भागात हे पाणी नेले जात आहे. या कालव्याचे झालेले कामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. चांदोली धरणातून काम पूर्ण झालेल्या कालव्यात पाणी सोडले की संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पसरते. कालव्याला सर्व ठिकाणी गळती लागली आहे.