शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

वारणा उजवा कालव्याच्या कामास गती मिळणार का?

By admin | Updated: April 23, 2017 23:58 IST

उर्वरित कामाची प्रतीक्षा : वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरवारणा उजवा कालव्याच्या तीस वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थांबलेल्या उर्वरित कामास राज्य शासन गती देणार का, असा प्रश्न शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आशिया खंडातील पहिले मातीचे धरण चांदोली येथे शासनाने बांधले आहे. चांदोली धरणापासून हा कालवा शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील कोतोली, भेडसगाव, सरूड, चरण, डोणोली, सातवे, सावर्डे, वारणानगर मार्गे सांगली जिल्ह्यात जातो. १९७७ ते ७८ च्या दरम्यान या कालव्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर चांदोलीपासून शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावापर्यंत या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.शासनाच्या पाटबंधारे विभागाने साधारणपणे ७० किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रखडत हे काम चालू होते. आजपर्यंत काम बंद अवस्थेत आहे. कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नाममात्र दराने मोबदला मिळाला. काही ठिकाणी जमिनीचे भूसंपादन न करता कालव्याचे काम सुरू होते. या ठिकाणी अर्धवट असे सेतूचे खांब उभे आहेत. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतामध्ये पिकेसुद्धा घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.या कालव्यासाठी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांची सुमारे चारशे ते पाचशे एकर जमीन कालव्याच्या खुदाईत गेली आहे. शेतकऱ्यांना हा कालवा वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे. फडणवीस सरकारने याकडे लक्ष देऊन निधी मंजूर करावा. जेणेकरून रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यांतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.१ २००६ साली या कालव्याचे काम सुरू झाले त्यावेळी आता हा कालवा पूर्णत्वास जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु या कालव्याचे पाणी ज्या भागातून जाते त्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा वापर शेतीसाठी मिळणार की नाही, याचाही संभ्रम लोकांच्या मनात आहे. २ हा कालवा कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार होत आहे. दुष्काळी भागात हे पाणी नेले जात आहे. या कालव्याचे झालेले कामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. चांदोली धरणातून काम पूर्ण झालेल्या कालव्यात पाणी सोडले की संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पसरते. कालव्याला सर्व ठिकाणी गळती लागली आहे.