शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

वारणा उजवा कालव्याच्या कामास गती मिळणार का?

By admin | Updated: April 23, 2017 23:58 IST

उर्वरित कामाची प्रतीक्षा : वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरवारणा उजवा कालव्याच्या तीस वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थांबलेल्या उर्वरित कामास राज्य शासन गती देणार का, असा प्रश्न शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आशिया खंडातील पहिले मातीचे धरण चांदोली येथे शासनाने बांधले आहे. चांदोली धरणापासून हा कालवा शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील कोतोली, भेडसगाव, सरूड, चरण, डोणोली, सातवे, सावर्डे, वारणानगर मार्गे सांगली जिल्ह्यात जातो. १९७७ ते ७८ च्या दरम्यान या कालव्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर चांदोलीपासून शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावापर्यंत या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.शासनाच्या पाटबंधारे विभागाने साधारणपणे ७० किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रखडत हे काम चालू होते. आजपर्यंत काम बंद अवस्थेत आहे. कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नाममात्र दराने मोबदला मिळाला. काही ठिकाणी जमिनीचे भूसंपादन न करता कालव्याचे काम सुरू होते. या ठिकाणी अर्धवट असे सेतूचे खांब उभे आहेत. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतामध्ये पिकेसुद्धा घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.या कालव्यासाठी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांची सुमारे चारशे ते पाचशे एकर जमीन कालव्याच्या खुदाईत गेली आहे. शेतकऱ्यांना हा कालवा वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे. फडणवीस सरकारने याकडे लक्ष देऊन निधी मंजूर करावा. जेणेकरून रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यांतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.१ २००६ साली या कालव्याचे काम सुरू झाले त्यावेळी आता हा कालवा पूर्णत्वास जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु या कालव्याचे पाणी ज्या भागातून जाते त्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा वापर शेतीसाठी मिळणार की नाही, याचाही संभ्रम लोकांच्या मनात आहे. २ हा कालवा कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार होत आहे. दुष्काळी भागात हे पाणी नेले जात आहे. या कालव्याचे झालेले कामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. चांदोली धरणातून काम पूर्ण झालेल्या कालव्यात पाणी सोडले की संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पसरते. कालव्याला सर्व ठिकाणी गळती लागली आहे.