शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वारणा उजवा कालव्याच्या कामास गती मिळणार का?

By admin | Updated: April 23, 2017 23:58 IST

उर्वरित कामाची प्रतीक्षा : वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरवारणा उजवा कालव्याच्या तीस वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थांबलेल्या उर्वरित कामास राज्य शासन गती देणार का, असा प्रश्न शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आशिया खंडातील पहिले मातीचे धरण चांदोली येथे शासनाने बांधले आहे. चांदोली धरणापासून हा कालवा शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील कोतोली, भेडसगाव, सरूड, चरण, डोणोली, सातवे, सावर्डे, वारणानगर मार्गे सांगली जिल्ह्यात जातो. १९७७ ते ७८ च्या दरम्यान या कालव्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर चांदोलीपासून शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावापर्यंत या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. वारणानगरपर्यंत ९० टक्के कालव्याचे काम पूर्ण झाले आहे.शासनाच्या पाटबंधारे विभागाने साधारणपणे ७० किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रखडत हे काम चालू होते. आजपर्यंत काम बंद अवस्थेत आहे. कालव्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नाममात्र दराने मोबदला मिळाला. काही ठिकाणी जमिनीचे भूसंपादन न करता कालव्याचे काम सुरू होते. या ठिकाणी अर्धवट असे सेतूचे खांब उभे आहेत. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतामध्ये पिकेसुद्धा घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.या कालव्यासाठी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांची सुमारे चारशे ते पाचशे एकर जमीन कालव्याच्या खुदाईत गेली आहे. शेतकऱ्यांना हा कालवा वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागला आहे. फडणवीस सरकारने याकडे लक्ष देऊन निधी मंजूर करावा. जेणेकरून रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यांतील शेतकरी व्यक्त करीत आहेत.१ २००६ साली या कालव्याचे काम सुरू झाले त्यावेळी आता हा कालवा पूर्णत्वास जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; परंतु या कालव्याचे पाणी ज्या भागातून जाते त्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा वापर शेतीसाठी मिळणार की नाही, याचाही संभ्रम लोकांच्या मनात आहे. २ हा कालवा कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार होत आहे. दुष्काळी भागात हे पाणी नेले जात आहे. या कालव्याचे झालेले कामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. चांदोली धरणातून काम पूर्ण झालेल्या कालव्यात पाणी सोडले की संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पसरते. कालव्याला सर्व ठिकाणी गळती लागली आहे.