शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

...तर दादांना ध्वजारोहण करू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 01:00 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर : सरकारवर विश्वास ठेवून आम्ही ८०:२० फॉर्मुल्यावर विश्वास ठेवला. साखरेने ३५०० रुपयांचा टप्पा पार करूनही कारखानदार एफआरपीमधील २० टक्के देण्यास टाळाटाळ करत आहेत. १५ एप्रिलपर्यंत ही रक्कम दिली नाही आणि सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल, तर १ मे ला महाराष्ट्र दिनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘एफआरपी’ तर द्यावी लागेलच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी आता रस्त्यावरची लढाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एफआरपी’बाबत कारखानदार व सरकारची भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’चा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी भगवान काटे होते. खासदार शेट्टी म्हणाले, दराबाबत ८०:२० टक्क्यावर तडजोड केली, ती कायमस्वरूपी नव्हती. साखरेचा दर तीन हजारांच्या वर गेल्यानंतर व्याजासह पैसे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मेळावा घेणार म्हटल्यावर साखर आयुक्तांनी बैठक घेऊन २० टक्क्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन दिली. कारखानदारांनी जिल्हा बँकेत बैठक घेऊन त्याला खोडा घातला. १५ एप्रिलपर्यंत एफआरपीतील २० टक्के दिले नाहीत, तर सहकारमंत्र्यांनी साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा त्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू देणार नाही. साखरेचे दर वाढल्याने एफआरपी प्रमाणे पैसे घेणारच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, साखरेच्या भाववाढीमागे ‘स्वाभिमानी’चे प्रयत्न आहेत. २० टक्क्यासाठी कारखानदार आढेवेढे घेत आहेत, घामाचे दाम देणार नसाल तर हात बांधून घरात बसणार नाही, ५० हजारांची फौज घेऊन रस्त्यावर उतरू. वर्मी घाव घातल्यानंतर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही खोत यांनी दिला. दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार (दि. ७) पासून दोन दिवस पिंपळगाव (जि. नाशिक) येथे होत आहे. यामध्ये दुष्काळासह विविध विषयांवर चर्चा होणार असून संघटनेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत खोत यांनी दिले. यावेळी जालंदर पाटील, वैभव कांबळे, तानाजी देसाई, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, भगवान काटे यांनी मनोगत व्यक्त केले. अण्णासाहेब चौगुले, विठ्ठल मोरे, संदीप राजोबा, सुभाष शेट्टी, सुरेश कांबळे, जयकुमार कोले, आदी उपस्थित होते. बिनशिक्क्याच्या पोत्यासाठी भरारीपथक! कारखानदार काटा मारतात, यासाठी वजनकाटेच आॅनलाईन करण्याची मागणी सरकारकडे करत आहे. रिकव्हरी मारण्याचा उद्योगही सुरू असून बिनशिक्क्याच्या पोत्यात साखर भरून काळ्या बाजारात विकली जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी परिसरातील कार्यकर्त्यांचे भरारीपथक नेमणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. मुश्रीफसाहेब, कागलच्या हातशिल्लकचे काय? जिल्हा बॅँकेतील खातेदारांकडून सक्तीने ११.४५ रुपये महिन्याला वसूल केले जातात. यासाठी बॅँकेवर धडक देऊ, बॅँक अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्यांचे खिशे कापणार का? मुश्रीफसाहेब, कागल शाखेतील हातशिल्लक पळवली नसती तर अशा वसुलीचे काम करावे लागले नसते, असा टोला शेट्टी यांनी हाणला. म्हणूनच पवारांची कावीळ! जुलैमध्ये साखरेचे दर १९०० रुपये असताना व भविष्यात दर वाढणार हे माहिती असताना दुबळ्या व आजारी कारखान्यांना कोणी साखर विकण्यास सांगितली. आता ३८०० रुपये दर असताना साखर का विकत नाहीत. या कटाचा सूत्रधार कोण याची चौकशी सहकारमंत्र्यांनी करावी. यासाठीच शरद पवार यांची कावीळ झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. केंद्राचे ४५ रुपये अनुदान प्रोत्साहनासाठीच साखर निर्यात करणाऱ्यांना केंद्र सरकार ४५ रुपये प्रतिटन प्रोत्साहन अनुदान देणार आहे. हे अनुदान वजा करून एफआरपी देण्याचा डाव कारखानदारांचा आहे. एफआरपीमधील एक रुपयाला जरी हात लावाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.