शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

...तर दादांना ध्वजारोहण करू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 01:00 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर : सरकारवर विश्वास ठेवून आम्ही ८०:२० फॉर्मुल्यावर विश्वास ठेवला. साखरेने ३५०० रुपयांचा टप्पा पार करूनही कारखानदार एफआरपीमधील २० टक्के देण्यास टाळाटाळ करत आहेत. १५ एप्रिलपर्यंत ही रक्कम दिली नाही आणि सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल, तर १ मे ला महाराष्ट्र दिनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘एफआरपी’ तर द्यावी लागेलच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी आता रस्त्यावरची लढाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एफआरपी’बाबत कारखानदार व सरकारची भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’चा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी भगवान काटे होते. खासदार शेट्टी म्हणाले, दराबाबत ८०:२० टक्क्यावर तडजोड केली, ती कायमस्वरूपी नव्हती. साखरेचा दर तीन हजारांच्या वर गेल्यानंतर व्याजासह पैसे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मेळावा घेणार म्हटल्यावर साखर आयुक्तांनी बैठक घेऊन २० टक्क्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन दिली. कारखानदारांनी जिल्हा बँकेत बैठक घेऊन त्याला खोडा घातला. १५ एप्रिलपर्यंत एफआरपीतील २० टक्के दिले नाहीत, तर सहकारमंत्र्यांनी साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा त्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू देणार नाही. साखरेचे दर वाढल्याने एफआरपी प्रमाणे पैसे घेणारच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, साखरेच्या भाववाढीमागे ‘स्वाभिमानी’चे प्रयत्न आहेत. २० टक्क्यासाठी कारखानदार आढेवेढे घेत आहेत, घामाचे दाम देणार नसाल तर हात बांधून घरात बसणार नाही, ५० हजारांची फौज घेऊन रस्त्यावर उतरू. वर्मी घाव घातल्यानंतर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही खोत यांनी दिला. दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार (दि. ७) पासून दोन दिवस पिंपळगाव (जि. नाशिक) येथे होत आहे. यामध्ये दुष्काळासह विविध विषयांवर चर्चा होणार असून संघटनेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत खोत यांनी दिले. यावेळी जालंदर पाटील, वैभव कांबळे, तानाजी देसाई, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, भगवान काटे यांनी मनोगत व्यक्त केले. अण्णासाहेब चौगुले, विठ्ठल मोरे, संदीप राजोबा, सुभाष शेट्टी, सुरेश कांबळे, जयकुमार कोले, आदी उपस्थित होते. बिनशिक्क्याच्या पोत्यासाठी भरारीपथक! कारखानदार काटा मारतात, यासाठी वजनकाटेच आॅनलाईन करण्याची मागणी सरकारकडे करत आहे. रिकव्हरी मारण्याचा उद्योगही सुरू असून बिनशिक्क्याच्या पोत्यात साखर भरून काळ्या बाजारात विकली जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी परिसरातील कार्यकर्त्यांचे भरारीपथक नेमणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. मुश्रीफसाहेब, कागलच्या हातशिल्लकचे काय? जिल्हा बॅँकेतील खातेदारांकडून सक्तीने ११.४५ रुपये महिन्याला वसूल केले जातात. यासाठी बॅँकेवर धडक देऊ, बॅँक अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्यांचे खिशे कापणार का? मुश्रीफसाहेब, कागल शाखेतील हातशिल्लक पळवली नसती तर अशा वसुलीचे काम करावे लागले नसते, असा टोला शेट्टी यांनी हाणला. म्हणूनच पवारांची कावीळ! जुलैमध्ये साखरेचे दर १९०० रुपये असताना व भविष्यात दर वाढणार हे माहिती असताना दुबळ्या व आजारी कारखान्यांना कोणी साखर विकण्यास सांगितली. आता ३८०० रुपये दर असताना साखर का विकत नाहीत. या कटाचा सूत्रधार कोण याची चौकशी सहकारमंत्र्यांनी करावी. यासाठीच शरद पवार यांची कावीळ झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. केंद्राचे ४५ रुपये अनुदान प्रोत्साहनासाठीच साखर निर्यात करणाऱ्यांना केंद्र सरकार ४५ रुपये प्रतिटन प्रोत्साहन अनुदान देणार आहे. हे अनुदान वजा करून एफआरपी देण्याचा डाव कारखानदारांचा आहे. एफआरपीमधील एक रुपयाला जरी हात लावाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.