शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पद नसलेल्यांना संधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:37 IST

जिल्हा परिषद : नियोजन समितीबाबत भाजप व मित्रपक्षांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यांमधून २९ सदस्य निवडावयाचे असून त्यासाठी प्राधान्याने ज्यांना पदे मिळालेली नाहीत त्यांना भाजप व मित्रपक्षांकडून संधी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा नियोजन समितीसाठी आज (मंगळवार)पासून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक आणि पाठिंबा दिलेल्या सर्व गटांच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहेत. एकूणच जिल्ह्णाच्या विकास प्रक्रियेमध्ये जिल्हा नियोजन समितीला मोठे महत्त्व असते. याच समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या पार्श्वभूमीवर या समितीवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी अनेक सदस्यांची इच्छा असते. पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीमध्ये खासदार, आमदार यांचाही सहभाग असल्याने या समितीवर येण्यासाठी अनेकांची धडपड असते. जिल्हा परिषदेवर भाजप व मित्रपक्षांची सत्ता आणण्यासाठी अनेकांचे सहकार्य घ्यावे लागले आहे. सध्या भाजपकडे अध्यक्षपद असून शिवसेनेकडे उपाध्यक्ष आणि सभापती अशी दोन पदे आहेत तर ‘जनसुराज्य’कडे दोन सभापतिपदे आहेत.‘स्वाभिमानी’लाही एक सभापतिपद देण्यात आले आहेत. त्यामुळे या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांना त्या त्यावेळी नियोजन समितीचे सदस्यत्व देऊ, असे सांगण्यात आले होते. आता अशांनी जोर धरला आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भुदरगड विकास आघाडी, शिवसेनेचे दोन सदस्य असे जिल्हा परिषदेत विरोधी गटांत आहेत. त्यांची बैठक शुक्रवारी होत आहे. त्यांच्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये चांगली मांडणी करतील अशांना पाठविण्यासाठी प्रयत्न केले जातील.