शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:55 IST

गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे,

कोल्हापूर : गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे, साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत, त्यांची चौकशी करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री आणि भाजपा प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केली. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.मंत्री पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानेही नवे राजकीय वळण घेतले आहे. आतापर्यंत नेहरू-गांधी घराण्याने देश चालवला आणि शरद पवार यांच्यासारख्यानी महाराष्ट्र चालवला.पवार खासदार, मुलगी खासदार, पुतण्या माजी मंत्री आणि आता रोहित पवार विधानसभा लढवणार ही घराणेशाही नव्या पिढीला मान्य नाही. म्हणून लोक मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही ज्यांना पक्षात घेत आहे त्यांना कोणतीही भीती दाखवण्याची गरज नाही. ते लोक स्वखुषीने भाजपमध्ये येत आहेत. आयकर धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत, त्यासाठी त्या यंत्रणा सहा-सहा महिने त्या प्रकरणाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या कारवाईबद्दल हरकत असेल तर न्यायालयात दाद मागावी, आम्ही काय कुणाला अडवलेले नाही. दोन्ही काँग्रेसमधील दोन अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटून नेल्याने मागच्या पाच वर्षांत आमचे सरकार हतबल होते. आता आपल्याला मजबूत सरकार आणायचे आहे. त्यासाठी नेटाने कामाला लागावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.––―――––―–―आमदार क्षीरसागर यांनी फार जोशात राहू नये : महेश जाधव यांचा टोलालोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने मातब्बर उमेदवारांना पराभूत केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी फार जोशात राहू नये, असा टोला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला. शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार असले तरी भाजपाच आज जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील