शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत आघाडी तुटणार का ?

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

तीन वर्षांची आघाडी तुटल्यास पालिकेतील पाणीपुरवठा व बांधकाम हे दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम विभाग राष्ट्रीय कॉँग्रेसकडे राहणार

राजाराम पाटील - इचलकरंजी विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेतील राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या तीन वर्षांची आघाडी तुटल्यास पालिकेतील पाणीपुरवठा व बांधकाम हे दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम विभाग राष्ट्रीय कॉँग्रेसकडे राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सन २०११ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १० व श.वि.आ.चे १७ नगरसेवक निवडून आले. ५७ नगरसेवक असलेल्या नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसला भक्कम बहुमत मिळाल्याने कॉँग्रेसने आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडले. विविध विषय समित्यांची निवडणूक आली असताना राष्ट्रीय कॉँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. समझोत्याप्रमाणे राष्ट्रवादीला बांधकाम व शिक्षण या दोन समित्या, तर कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य व महिला बालकल्याण या समित्या राहिल्या.नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसकडे बहुतांशी नवखे नगरसेवक निवडून आले होते. त्यातील काही नगरसेवक चळवळी आहेत. सत्तारूढ नगरसेवक असूनसुद्धा काही नगरसेवकांनी पालिकेकडील विविध नागरी सेवा-सुविधांसाठी मोर्चे आणले आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. त्याचा परिणाम म्हणून पालिकेच्या दैनंदिन कामकाजातसुद्धा गोंधळ उडाला. दोन्ही कॉँग्रेसमध्ये समन्वय रहावा आणि नगरसेवकांवर नियंत्रण असावे, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील माजी आमदार अशोकराव जांभळे यांना पालिकेच्या कारभारात लक्ष पुरविण्यास सांगितले. जांभळे हे पालिकेच्या कामकाजात लक्ष पुरवित असले तरी त्यांच्या एकतर्फी कारभाराबद्दल दोन्हीही कॉँग्रेसमधील नगरसेवकांची नाराजी आहे.यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे उभे होते. दोन्हीही निवडणुकांचा निकाल पाहता नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर केलेल्या आघाडीचा फायदा दिसलाच नाही. उलट यामुळे कारंडे गट दुरावला गेला आणि त्याचा फटका थेट विधानसभा निवडणुकीमध्ये बसला, अशी चर्चा कॉँग्रेसमधील बहुतांशी नगरसेवकांमध्ये आहे.नगरपालिकेमध्ये विविध प्रकारच्या विकासकामांची चर्चा होत असताना टक्केवारी वाढल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता वाढलेल्या टक्केवारीचा फायदा राष्ट्रवादीला झाला; पण पालिकेत आघाडी असल्याने त्याची बदनामी मात्र कॉँग्रेसला सोसावी लागली, अशी टीका कॉँग्रेसच्या नगरसेवकांतून होत आहे. शहर कॉँग्रेस समितीमध्ये झालेल्या एका बैठकीतसुद्धा काही नगरसेवकांनी याबाबत थेट पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आणि त्यातूनच नगरपालिकेतील राष्ट्रवादीबरोबरची आघाडी संपुष्टात आणावी, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे.सध्या नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसचे २९ नगरसेवक असून, काठावरील बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आणखीन काही दिवस घरोबा ठेवावा लागेल, असे मत पक्षश्रेष्ठींचे आहे; पण आणखीन दोन वर्षांनी नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना कॉँग्रेसच्या पदरात बदनामी येऊन जनतेच्या प्रचंड असंतोषाला सामोरे जावे लागेल, अशा विचाराने नगरसेवकांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.‘बांधकाम’साठी काही नगरसेवकांच्या हालचालीराष्ट्रवादीबरोबर आघाडी तोडल्यास राष्ट्रवादीच्या वाट्यास असलेले बांधकाम व शिक्षण या दोन्ही समित्यांचे सभापतिपद कॉँग्रेसला मिळणार आहे. त्यातील बांधकाम खाते हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तुटावी, यादृष्टीने काही नगरसेवक हालचाली करीत आहेत. ज्यामुळे कॉँग्रेसमधील आणखीन दोन नगरसेवकांची वर्णी सभापतिपदासाठी लागेल, असेही बोलले जाते.चोपडेंच्या तक्रारीमुळे विकासकामे ठप्पप्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशा दोन्ही कॉँग्रेसमध्ये उमेदवारांची सरळ लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल चोपडे यांना निवडून आणण्यासाठी विरोधी शहर विकास आघाडीने चांगलीच मदत केली. नगरसेवक चोपडे हे राष्ट्रवादीचे असूनसुद्धा नगरपालिकेच्या अनेक विकासकामांबाबत जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्रालय, प्रसंगी उच्च न्यायालयातसुद्धा वारंवार तक्रारी करत राहतात. परिणामी पालिकेतील काही विकासकामे ठप्प झाली आहेत. याबाबतची नाराजीसुद्धा कॉँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आहे.