शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

इचलकरंजीत आघाडी तुटणार का ?

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

तीन वर्षांची आघाडी तुटल्यास पालिकेतील पाणीपुरवठा व बांधकाम हे दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम विभाग राष्ट्रीय कॉँग्रेसकडे राहणार

राजाराम पाटील - इचलकरंजी विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेतील राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या तीन वर्षांची आघाडी तुटल्यास पालिकेतील पाणीपुरवठा व बांधकाम हे दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम विभाग राष्ट्रीय कॉँग्रेसकडे राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सन २०११ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १० व श.वि.आ.चे १७ नगरसेवक निवडून आले. ५७ नगरसेवक असलेल्या नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसला भक्कम बहुमत मिळाल्याने कॉँग्रेसने आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडले. विविध विषय समित्यांची निवडणूक आली असताना राष्ट्रीय कॉँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. समझोत्याप्रमाणे राष्ट्रवादीला बांधकाम व शिक्षण या दोन समित्या, तर कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य व महिला बालकल्याण या समित्या राहिल्या.नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसकडे बहुतांशी नवखे नगरसेवक निवडून आले होते. त्यातील काही नगरसेवक चळवळी आहेत. सत्तारूढ नगरसेवक असूनसुद्धा काही नगरसेवकांनी पालिकेकडील विविध नागरी सेवा-सुविधांसाठी मोर्चे आणले आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. त्याचा परिणाम म्हणून पालिकेच्या दैनंदिन कामकाजातसुद्धा गोंधळ उडाला. दोन्ही कॉँग्रेसमध्ये समन्वय रहावा आणि नगरसेवकांवर नियंत्रण असावे, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील माजी आमदार अशोकराव जांभळे यांना पालिकेच्या कारभारात लक्ष पुरविण्यास सांगितले. जांभळे हे पालिकेच्या कामकाजात लक्ष पुरवित असले तरी त्यांच्या एकतर्फी कारभाराबद्दल दोन्हीही कॉँग्रेसमधील नगरसेवकांची नाराजी आहे.यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे उभे होते. दोन्हीही निवडणुकांचा निकाल पाहता नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर केलेल्या आघाडीचा फायदा दिसलाच नाही. उलट यामुळे कारंडे गट दुरावला गेला आणि त्याचा फटका थेट विधानसभा निवडणुकीमध्ये बसला, अशी चर्चा कॉँग्रेसमधील बहुतांशी नगरसेवकांमध्ये आहे.नगरपालिकेमध्ये विविध प्रकारच्या विकासकामांची चर्चा होत असताना टक्केवारी वाढल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता वाढलेल्या टक्केवारीचा फायदा राष्ट्रवादीला झाला; पण पालिकेत आघाडी असल्याने त्याची बदनामी मात्र कॉँग्रेसला सोसावी लागली, अशी टीका कॉँग्रेसच्या नगरसेवकांतून होत आहे. शहर कॉँग्रेस समितीमध्ये झालेल्या एका बैठकीतसुद्धा काही नगरसेवकांनी याबाबत थेट पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आणि त्यातूनच नगरपालिकेतील राष्ट्रवादीबरोबरची आघाडी संपुष्टात आणावी, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे.सध्या नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसचे २९ नगरसेवक असून, काठावरील बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आणखीन काही दिवस घरोबा ठेवावा लागेल, असे मत पक्षश्रेष्ठींचे आहे; पण आणखीन दोन वर्षांनी नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना कॉँग्रेसच्या पदरात बदनामी येऊन जनतेच्या प्रचंड असंतोषाला सामोरे जावे लागेल, अशा विचाराने नगरसेवकांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.‘बांधकाम’साठी काही नगरसेवकांच्या हालचालीराष्ट्रवादीबरोबर आघाडी तोडल्यास राष्ट्रवादीच्या वाट्यास असलेले बांधकाम व शिक्षण या दोन्ही समित्यांचे सभापतिपद कॉँग्रेसला मिळणार आहे. त्यातील बांधकाम खाते हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तुटावी, यादृष्टीने काही नगरसेवक हालचाली करीत आहेत. ज्यामुळे कॉँग्रेसमधील आणखीन दोन नगरसेवकांची वर्णी सभापतिपदासाठी लागेल, असेही बोलले जाते.चोपडेंच्या तक्रारीमुळे विकासकामे ठप्पप्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशा दोन्ही कॉँग्रेसमध्ये उमेदवारांची सरळ लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल चोपडे यांना निवडून आणण्यासाठी विरोधी शहर विकास आघाडीने चांगलीच मदत केली. नगरसेवक चोपडे हे राष्ट्रवादीचे असूनसुद्धा नगरपालिकेच्या अनेक विकासकामांबाबत जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्रालय, प्रसंगी उच्च न्यायालयातसुद्धा वारंवार तक्रारी करत राहतात. परिणामी पालिकेतील काही विकासकामे ठप्प झाली आहेत. याबाबतची नाराजीसुद्धा कॉँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आहे.