शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

हातकणंगलेतून लढणार; सदाभाऊ खोत यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ‘स्वाभिमानी’चा उल्लेख न करता दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाला भगदाड पडल्याचे दिसेल असेही ते म्हणाले. नव्या संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून, येत्या दसरा मेळाव्यास विचारांतून परिवर्तनाचे सोनं लुटण्यासाठी आम जनतेने मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.२१ सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी नव्या संघटनेची घोषणा कोल्हापुरात होणार आहे. यावेळी संघटनेचा मसुदा, झेंडा व बिल्ला यासह दिशा स्पष्ट केली जाणार आहे. त्यानंतर येत्या ३० सप्टेंबरला इचलकरंजी येथे होणाºया दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी शिरोळ तालुक्यात दौरा केला असे खोत यांनी सांगितले.मंत्री खोत म्हणाले, मी लढवय्या कार्यकर्ता आहे. माझ्या चळवळीवर जनतेचा विश्वास आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सर्वच घटकांतील प्रश्न घेऊन संघटना पुढे जाणार आहे. संवादातून संघर्षाकडे अशी वाटचाल केली जाणार आहे, असेही खोत म्हणाले.बैठकीस भाजपचे सुरेशदादा पाटील, सागर खोत, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, रणजित पाटील, विजय भोजे, धैर्यशील देसाई, आप्पासाहेब काळे, बजरंग काळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, जयसिंगपूर येथे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन मंत्री खोत यांनी चर्चा केली.‘स्वाभिमानी’च्या बालेकिल्ल्यात रणनीतीशिरोळ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो. यातच खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडली आहे. अशातच मंत्री खोत तालुक्यातील उमळवाड, कोथळी, दानोळीसह परिसरात दौरा व बैठका घेत आहेत. या बैठकीत स्वाभिमानीचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. त्यामुळे आगामी कोणत्या निवडणुकीची रणनीती आखली जात आहे, याची चर्चा आहे. शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात आता मंत्री खोत यांची एंट्री चर्चेची ठरली आहे.