शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

हातकणंगलेतून लढणार; सदाभाऊ खोत यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ‘स्वाभिमानी’चा उल्लेख न करता दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाला भगदाड पडल्याचे दिसेल असेही ते म्हणाले. नव्या संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून, येत्या दसरा मेळाव्यास विचारांतून परिवर्तनाचे सोनं लुटण्यासाठी आम जनतेने मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.२१ सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी नव्या संघटनेची घोषणा कोल्हापुरात होणार आहे. यावेळी संघटनेचा मसुदा, झेंडा व बिल्ला यासह दिशा स्पष्ट केली जाणार आहे. त्यानंतर येत्या ३० सप्टेंबरला इचलकरंजी येथे होणाºया दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी शिरोळ तालुक्यात दौरा केला असे खोत यांनी सांगितले.मंत्री खोत म्हणाले, मी लढवय्या कार्यकर्ता आहे. माझ्या चळवळीवर जनतेचा विश्वास आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सर्वच घटकांतील प्रश्न घेऊन संघटना पुढे जाणार आहे. संवादातून संघर्षाकडे अशी वाटचाल केली जाणार आहे, असेही खोत म्हणाले.बैठकीस भाजपचे सुरेशदादा पाटील, सागर खोत, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, रणजित पाटील, विजय भोजे, धैर्यशील देसाई, आप्पासाहेब काळे, बजरंग काळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, जयसिंगपूर येथे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन मंत्री खोत यांनी चर्चा केली.‘स्वाभिमानी’च्या बालेकिल्ल्यात रणनीतीशिरोळ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो. यातच खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडली आहे. अशातच मंत्री खोत तालुक्यातील उमळवाड, कोथळी, दानोळीसह परिसरात दौरा व बैठका घेत आहेत. या बैठकीत स्वाभिमानीचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. त्यामुळे आगामी कोणत्या निवडणुकीची रणनीती आखली जात आहे, याची चर्चा आहे. शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात आता मंत्री खोत यांची एंट्री चर्चेची ठरली आहे.