शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा बँक यंंदा तरी लाभांश देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : जिल्हा बँकेकडे जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये भागभांडवल अडकून पडले असून, गेली दहा वर्षे यावर एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. मागील सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा पकडून सचालक मंडळाला धारेवर धरले असता पुढील वर्षी आपण लाभांश देऊ, असे अश्वासन खुद्द अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी दिल्यामुळे यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : जिल्हा बँकेकडे जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये भागभांडवल अडकून पडले असून, गेली दहा वर्षे यावर एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. मागील सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा पकडून सचालक मंडळाला धारेवर धरले असता पुढील वर्षी आपण लाभांश देऊ, असे अश्वासन खुद्द अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी दिल्यामुळे यावर्षी सभासद सेवा संस्थांचे लक्ष लाभांशाकडे लागून राहिले आहे.राज्यात पीककर्ज वाटपाची त्रिस्तर पद्धत आहे. राज्य बँक जिल्हा बँकेला, जिल्हा बँक सेवा संस्थांना व सेवा संस्था शेतकºयांना पीक कर्जाचा पुरवठा करते. सेवा संस्थांना जिल्हा बँक सहा टक्के दराने शेतकºयांना पीक कर्ज पुरवठ्यासाठी पैसे उपलब्ध करून देते; पण शासनाने पंजाबराव देशमुख कृषी कर्ज सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे एक लाख रुपयेपर्यंत कर्ज असणाºया शेतकºयांना वेळेत कर्ज फेडल्यास संपूर्ण व्याजमाफीचा लाभ मिळू लागला, तर एक लाख ते दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर सहा टक्के व्याज आकारले जात असले तरी वेळेत परतफेड करणाºया शेतकºयांना पुन्हा चार टक्के व्याज सवलत दिली जाते. यामुळे हे कर्ज दोन टक्के व्याज दरानेच शेतकºयांना पडते. सेवा संस्थांचा कारभार या दोन टक्क्यांतून मिळणाºया व्यवसायातूनच सुरू असतो.पूर्वी जिल्हा बँक एकूण व्यवहारावर १५ टक्के रक्कम सेवा संस्थांना सचिवांचे पगार व स्टेशनरी खर्चासाठी म्हणून देत होती. मात्र, सचिवांचा पगार व स्टेशनरीसाठी संस्थांना आपल्या मिळणाºया उत्पन्नातून १५ टक्के रक्कम वर्गणी म्हणून भरावी लागत असल्याने अल्प व्यवहार असणाºया संस्था मेटाकुटीला येऊ लागल्या आहेत. संस्थांनी जिल्हा बँकेकडून जे कर्ज उचललेले असते त्याच्या पोटी जे भागभांडवल म्हणून पाच ते सात टक्के रक्कमआपल्याकडे ठेवून घेतली जाते, ते उत्पन्नाचे मोठे साधन ठरू शकते. गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेकडे कोट्यवधीच्या ठेवी पडून आहेत. यावर बँक पाच ते सात टक्के व्याज देत होती. मात्र, २००७ पासून बँक तोट्यात असल्याने जिल्हा बँकेने एक रुपयाही लाभांश दिलेला नाही; पण या भागभांडवलाच्या रकमेचा बँकेने व्यवसायासाठी मात्र वापर केलाआहे.आज जिल्ह्यातील १८५६ सेवा संस्थांचे १६५ कोटी ४५ लाख रुपये भागभांडवल जिल्हा बँकेकडे गेली दहा वर्षे पडून आहेत. सेवा संस्थांनीही प्रत्येक सर्वसाधारण सभेत आपल्या भागभांडवलावर लाभांश मिळावा म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती; पण दोन वर्षे संचालक मंडळाने, तर सहा वर्षे प्रशासकांनी बँक तोट्यात असल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेच्या नियमाला ढाल करत लाभांशाला ठेंगा दिला.मात्र, मागील वर्षी सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाला धारेवर धरल्यानंतर विद्यमान अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पुढील वर्षी लाभांशदेऊ, असे जाहीर केले होते. आता बँकेला १२ कोटींचा नफा झाला आहे. यामुळे यावर्षी अध्यक्ष आश्वासन दिल्याप्रमाणे लाभांश देणार काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.आणखी भागभांडवल गुंतवणूक करण्याचे जिल्हा बँकेचे सेवा संस्थांना आवाहन१६५ कोटी सेवा संस्थांचे भागभांडवल गुंतून असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा जिल्हा बँक प्रशासनाने परिपत्रक काढून आणखी भागभांडवल गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. काही प्रमाणात सक्तीही केल्याचे सेवा संस्थांकडून सांगण्यात आले. इच्छा अथवा आर्थिक ताकद नसतानाही काही सेवा संस्थांनी २० हजारांपासून ५० हजारांपर्यंत भागभांडवल गुंतवणूक केली आहे.लाभांश देण्यासाठी साडेनऊ कोटी आवश्यकसध्या जिल्हा बँकेकडे १६५ कोटी ४५ लाख रक्कम सेवा संस्थांची भागभांडवल म्हणून जमा आहे. केवळ पाच टक्के रक्कम लाभांश म्हणून वाटायची झाल्यास साडेनऊ कोटी रुपये रक्कम वाटावी लागणार आहे आणि बँकेला नफा १२ कोटी आहे. यामुळे यावर्षी लाभांश वाटपासाठी अडचणीच अधिक दिसतात