शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक यंंदा तरी लाभांश देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : जिल्हा बँकेकडे जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये भागभांडवल अडकून पडले असून, गेली दहा वर्षे यावर एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. मागील सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा पकडून सचालक मंडळाला धारेवर धरले असता पुढील वर्षी आपण लाभांश देऊ, असे अश्वासन खुद्द अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी दिल्यामुळे यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : जिल्हा बँकेकडे जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये भागभांडवल अडकून पडले असून, गेली दहा वर्षे यावर एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. मागील सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा पकडून सचालक मंडळाला धारेवर धरले असता पुढील वर्षी आपण लाभांश देऊ, असे अश्वासन खुद्द अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी दिल्यामुळे यावर्षी सभासद सेवा संस्थांचे लक्ष लाभांशाकडे लागून राहिले आहे.राज्यात पीककर्ज वाटपाची त्रिस्तर पद्धत आहे. राज्य बँक जिल्हा बँकेला, जिल्हा बँक सेवा संस्थांना व सेवा संस्था शेतकºयांना पीक कर्जाचा पुरवठा करते. सेवा संस्थांना जिल्हा बँक सहा टक्के दराने शेतकºयांना पीक कर्ज पुरवठ्यासाठी पैसे उपलब्ध करून देते; पण शासनाने पंजाबराव देशमुख कृषी कर्ज सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे एक लाख रुपयेपर्यंत कर्ज असणाºया शेतकºयांना वेळेत कर्ज फेडल्यास संपूर्ण व्याजमाफीचा लाभ मिळू लागला, तर एक लाख ते दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर सहा टक्के व्याज आकारले जात असले तरी वेळेत परतफेड करणाºया शेतकºयांना पुन्हा चार टक्के व्याज सवलत दिली जाते. यामुळे हे कर्ज दोन टक्के व्याज दरानेच शेतकºयांना पडते. सेवा संस्थांचा कारभार या दोन टक्क्यांतून मिळणाºया व्यवसायातूनच सुरू असतो.पूर्वी जिल्हा बँक एकूण व्यवहारावर १५ टक्के रक्कम सेवा संस्थांना सचिवांचे पगार व स्टेशनरी खर्चासाठी म्हणून देत होती. मात्र, सचिवांचा पगार व स्टेशनरीसाठी संस्थांना आपल्या मिळणाºया उत्पन्नातून १५ टक्के रक्कम वर्गणी म्हणून भरावी लागत असल्याने अल्प व्यवहार असणाºया संस्था मेटाकुटीला येऊ लागल्या आहेत. संस्थांनी जिल्हा बँकेकडून जे कर्ज उचललेले असते त्याच्या पोटी जे भागभांडवल म्हणून पाच ते सात टक्के रक्कमआपल्याकडे ठेवून घेतली जाते, ते उत्पन्नाचे मोठे साधन ठरू शकते. गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेकडे कोट्यवधीच्या ठेवी पडून आहेत. यावर बँक पाच ते सात टक्के व्याज देत होती. मात्र, २००७ पासून बँक तोट्यात असल्याने जिल्हा बँकेने एक रुपयाही लाभांश दिलेला नाही; पण या भागभांडवलाच्या रकमेचा बँकेने व्यवसायासाठी मात्र वापर केलाआहे.आज जिल्ह्यातील १८५६ सेवा संस्थांचे १६५ कोटी ४५ लाख रुपये भागभांडवल जिल्हा बँकेकडे गेली दहा वर्षे पडून आहेत. सेवा संस्थांनीही प्रत्येक सर्वसाधारण सभेत आपल्या भागभांडवलावर लाभांश मिळावा म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती; पण दोन वर्षे संचालक मंडळाने, तर सहा वर्षे प्रशासकांनी बँक तोट्यात असल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेच्या नियमाला ढाल करत लाभांशाला ठेंगा दिला.मात्र, मागील वर्षी सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाला धारेवर धरल्यानंतर विद्यमान अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पुढील वर्षी लाभांशदेऊ, असे जाहीर केले होते. आता बँकेला १२ कोटींचा नफा झाला आहे. यामुळे यावर्षी अध्यक्ष आश्वासन दिल्याप्रमाणे लाभांश देणार काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.आणखी भागभांडवल गुंतवणूक करण्याचे जिल्हा बँकेचे सेवा संस्थांना आवाहन१६५ कोटी सेवा संस्थांचे भागभांडवल गुंतून असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा जिल्हा बँक प्रशासनाने परिपत्रक काढून आणखी भागभांडवल गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. काही प्रमाणात सक्तीही केल्याचे सेवा संस्थांकडून सांगण्यात आले. इच्छा अथवा आर्थिक ताकद नसतानाही काही सेवा संस्थांनी २० हजारांपासून ५० हजारांपर्यंत भागभांडवल गुंतवणूक केली आहे.लाभांश देण्यासाठी साडेनऊ कोटी आवश्यकसध्या जिल्हा बँकेकडे १६५ कोटी ४५ लाख रक्कम सेवा संस्थांची भागभांडवल म्हणून जमा आहे. केवळ पाच टक्के रक्कम लाभांश म्हणून वाटायची झाल्यास साडेनऊ कोटी रुपये रक्कम वाटावी लागणार आहे आणि बँकेला नफा १२ कोटी आहे. यामुळे यावर्षी लाभांश वाटपासाठी अडचणीच अधिक दिसतात