शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्रावणात तरी भाविकांना देवदर्शन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : श्रावण म्हणजे भगवान श्री शिवशंकराच्या उपासनेचा महिना. या महिन्याभरात शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : श्रावण म्हणजे भगवान श्री शिवशंकराच्या उपासनेचा महिना. या महिन्याभरात शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते, दुसरीकडे मराठी संस्कृतीतील नागपंचमी, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारख्या सणांची रेलचेल असते. आता या श्रावणोत्सवाला महिना राहिल्याने यंदा तरी देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार की नाही, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. या मंदिरांवर जगणे अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही शासनाने आता मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.

आषाढात गावोगावीच्या जत्रा, माही आणि श्रावण म्हणजे सण, उत्सव, धार्मिक विधी, व्रतवैकल्यांचा महिना. मराठी संस्कृतीत श्रावणाला विशेष महत्त्व असून, हा देवदेवतांच्या उपासनेचा कालावधी मानला जातो. यातही भगवान शिवशंकराच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आणि सध्या दुसरी लाट सुरू असल्याने सलग दुसऱ्यावर्षी सगळीच मंदिरे बंद आहेत. भाविकांना मंदिरात जाऊन देवदर्शन घेता येत नाही, आता जिल्ह्यातील संसर्गाची दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली असली तरी त्याचा वेग फार कमी आहे. त्यामुळे एक महिन्याने मंदिरे भाविकांसाठी खुली होतील का, हे त्यावेळच्या कोरोनास्थितीवरच अवलंबून आहे.

---

शिवशक्तीचे स्थान

कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान असल्याने येथे सर्वाधिक शिव मंदिरे आहेत, अंबाबाईच्या मूळ मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहेच शिवाय बरोबर वरच्या मजल्यावर मातृलिंग आहे. शहरातही कपिलेश्वर, अतिबलेश्वर, उत्तरेश्वर, वटेश्वर, ऋणमुक्तेश्वर, कैलासगडचे स्वारी मंदिर, वडणगे तसेच पंचगंगा नदी घाटावरही शिव मंदिरे आहेत. त्यामुळे श्रावणात या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.

---

श्रावण सोमवार असे

पहिला : ९ ऑगस्ट, दुसरा : १६ ऑगस्ट, तिसरा : २३ ऑगस्ट, चौथा : ३० ऑगस्ट पाचवा : ६ सप्टेंबर

---

९ ऑगस्टपासून श्रावण

यंदा ९ ऑगस्टपासून श्रावण सुरू होत असून, त्याचदिवशी पहिला श्रावण सोमवार आहे, तर अमावास्यादेखील सोमवारी आहे. त्यामुळे यंदा या महिन्यात पाच सोमवार आहेत. त्याशिवाय १३ ऑगस्टला नागपंचमी, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन, २२ ऑगस्टला राखी पौर्णिमा, ३० ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सण आहेत.

----

व्यावसायिक म्हणतात...

तीन महिने होऊन गेले तरी मंदिरे बंद आहेत, पूजा साहित्याच्या विक्रीवरच आमचं कुटुंब अवलंबून आहे. कर्ज काढून घर चालवतोय. शासन अन्य व्यवसाय, उद्योगांचा विचार करत आहे पण मंदिरावर अवलंबून असलेल्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांचं काय होणार, याचा विचार करुन नियमांचे पालन करत मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे.

- राजू निकम (पूजा साहित्य विक्रेता)

--

श्रावणात मंदिरांमध्ये भाविक येतात, त्यामुळे उलाढाल होते. दुकाने बंद होऊन आता १०० दिवस होत आले. शहरात अंबाबाई मंदिर आणि परिसरातील मंदिरांवर १० हजार कुटुंब अवलंबून आहेत, ज्यांचा आणखी एखादा व्यवसाय आहे त्यांचे ठीक आहे पण ज्यांचा उदरनिर्वाह मंदिरामुळे चालतो अशा कुटुंबांचे काय, याचाही विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा..

- हर्षदा मेवेकरी (व्यावसायिक)

-----