शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

‘दौलत’ पुन्हा न्यायालयीन कचाट्यात अडकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 18:51 IST

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबत ‘न्यूट्रीयन्टस’शी झालेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या सभेत झाल्याने नवीन वादास तोंड फुटणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडून पाच वर्षांनंतर कारखान्याचे धुराडे पेटले होते. बॅँकेने करार मोडल्यास कंपनी न्यायालयात जाणार आणि पुन्हा पेच तयार होणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्दे‘न्यूट्रीयन्टस’सोबतच जिल्हा बँकेने करार रद्द केल्यास पेच हंगामही अडचणीत येण्याची शक्यताबॅँकेने करार मोडल्यास कंपनी न्यायालयात जाणार जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची

कोल्हापूर 26 : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबत ‘न्यूट्रीयन्टस’शी झालेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या सभेत झाल्याने नवीन वादास तोंड फुटणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडून पाच वर्षांनंतर कारखान्याचे धुराडे पेटले होते. बॅँकेने करार मोडल्यास कंपनी न्यायालयात जाणार आणि पुन्हा पेच तयार होणार हे निश्चित आहे.

जिल्हा बँकेवर प्रशासक येण्यात ‘दत्त-आसुर्ले’ आणि ‘दौलत’ साखर कारखान्यांचा हातभार लावला. ‘दत्त’ कारखाना १०८ कोटींना विक्री करून जिल्हा बँकेने आपल्याभोवती लागलेल्या फासाची पहिली दोरी काढून टाकली; पण ‘दौलत’ने बँकेला चांगलेच झुंजवले. विकत घेण्यास सोडाच पण चालविण्यासाठी कोणीही ताकदीने पुढे येत नव्हते.

कारखान्याकडील ६८ कोटींच्या येण्यामुळे बॅँक अडचणीत आली होती. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचा निर्णय घेणे बँक प्रशासनाला गरजेचे होते, त्यानुसार तब्बल दहावेळा विक्री व भाडेतत्त्वाच्या निविदा बँकेने प्रसिद्ध केल्या पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर न्यूट्रीयन्टस फु्रट कंपनी (गोकाक) यांनी भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्यास घेतला. मार्च २०१७ अखेर ३४ कोटी भरून उर्वरित रक्कम पाच वर्षे समान हप्त्यात द्यायचे, या बदल्यात ४५ वर्षांच्या दीर्घ मुदतीने चालविण्यासाठी द्यायचा, असा करार कंपनी व जिल्हा बँक यांच्यात झाला. त्यानंतर ‘न्यूट्रीयन्टस’ने सन २०१६-१७ चा हंगाम घेतला.

या हंगामात शेतकºयांनी पाठविलेल्या उसाचे पैसे वेळेत देता आले नाही, कर्मचाºयांची देणी व त्यानंतर झालेली साखर चोरी यामुळे कंपनीची मोठी बदनामी झाली. साखर चोरीनंतर कंपनीशी केलेला करार रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या, पण कायदेशीर बाबींचा अभ्यास करता करार मोडणे अडचणीचे ठरणार आहे. शेतकरी, कामगारांची देणी, साखर चोरी व बॅँकेशी झालेला करार या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार बॅँकेने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला तर कंपनी न्यायालयात जाणार हे निश्चित आहे.

यापूर्वी तासगांवकर शुगर्सने कारखाना भाडेतत्त्वावर घेतला होता, त्यात थिटे पेपर्स आल्याने तो गुंता सोडवताना जिल्हा बॅँकेची दमछाक झाली. आता नव्याने गुंता तयार झाला तर येणारा हंगामही अडचणीत येऊ शकतो.

जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाचीसर्वसाधारण सभेत जरी ठराव झाला तर सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून निर्णय घेण्याची जबाबदारी बॅँकेची आहे. ‘न्यूट्रीयन्टस’कडून ३४ कोटी वसुली झाल्यानेच बॅँक संचित तोट्यातून बाहेर आली. त्यामुळे बॅँक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता फारच कमी आहे.