शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करणार - आमदार आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST

खोची : शेती ही निसर्गावर अवलंबून असते. नैसर्गिक वातावरणाने साथ दिल्यास पिके उत्तम येतात. शेतकरी प्रचंड कष्टाने शेती पिकवितो. ...

खोची : शेती ही निसर्गावर अवलंबून असते. नैसर्गिक वातावरणाने साथ दिल्यास पिके उत्तम येतात. शेतकरी प्रचंड कष्टाने शेती पिकवितो. हातकणंगले तालुक्यातील शेतकरी विविध पिके घेऊन नावीन्यपूर्ण शेती करतात. या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. त्यांच्या अडचणी सोडवून सहकार्य करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.

लाटवडे येथील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार आवळे यांचा सत्कार शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरसिंह पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

जनार्दन पाटील (सर) म्हणाले, गारपिटीमुळे गतवर्षी ऊसशेती व भाजीपाला, फळबाग शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार राजू आवळे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई लाटवडे गावातील शेतकऱ्यांना मिळाली.

यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, शामराव वाघमारे, सुरेश पाटील, गणपती काटकर, विजय पाटील, तानाजी कोळी, बाजीराव सातपुते, डॉ. विजय गोरड, शकील अत्तार, अरुण पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी- लाटवडे (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांना गारपीट नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार राजू आवळे यांचा सत्कार लाटवडे येथील शेतकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पाटील यांनी केला. यावेळी जनार्दन पाटील(सर), शामराव वाघमारे, गणपती काटकर, सुरेश पाटील, विजय पाटील, तानाजी कोळी, बाजीराव सातपुते उपस्थित होते.(छाया - आयुब मुल्ला)