शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार

By admin | Updated: December 4, 2015 00:55 IST

सर्किट बेंच प्रश्न : बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय; वकिलांतील गटबाजी उघड; चव्हाण-घाटगे यांच्यात शाब्दिक चकमक

कोल्हापूर : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी व येथील नवीन न्यायसंकुलातील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने बोलाविलेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण व माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे वकिलांतील गटबाजी उघड झाली. यावेळी कसबा बावडा येथील न्यायसंकुलाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, बैठकीसाठी आलेल्या पाच जिल्ह्यांतील वकिलांनी सर्वांसमोर ‘तुम्ही एकटे रहा, आम्ही पाच जिल्ह्यांतून हा सर्किट बेंचचा प्रश्न सोडवू,’ असे कोल्हापुरातील वकिलांना सुनावले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. टाऊन हॉल येथील बार असोसिएशनच्या सभागृहात रात्री ही बैठक झाली.कोल्हापुरात सहा जिल्ह्यांचे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, अशी दोन दशकांहून अधिक जुनी मागणी आहे. सर्किट बेंचप्रश्नी उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती व टाउन हॉल येथील जिल्हा न्यायालयासमोर टायर पेटवून निषेध केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात या सहा जिल्ह्णांतील संबंधित वकिलांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या अवमान याचिकाप्रश्नी प्रभारी मुख्य न्यायाधीश अभय ओक यांनी संबंधित वकिलांना नोटिसा पाठविल्या. त्यावरून हमीपत्र द्यावयाचे की नाही, यावरून वकिलांमध्ये मतभेद झाले.बुधवारच्या बैठकीत न्यायालयीन अवमान प्रकरणी काय निर्णय घ्यावयाचा आहे, तो जिल्हा बार असोसिएशनच्या समितीने घ्यावा. याप्रकरणी समिती जे निर्णय घेईल, ते सर्व सभासदांवर बंधनकारक राहतील, असा ठराव एकमताने मंजूर झाला. परंतु पुन्हा गुरुवारी सायंकाळी खंडपीठ कृती समितीने बैठक बोलविली. यावेळी सर्किट बेंचप्रश्नी अनेकांनी मते व्यक्त केली.माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, न्यायालयीन अवमान याचिकाप्रश्नी समिती जो काही निर्णय घेईल, त्याला आम्ही बांधील आहोत. पण, काही चार-पाच वर्षे वकिली करणारे, सर्किट बेंचप्रश्नी संभ्रमावस्था पसरवीत आहे. आम्ही सर्किट बेंच प्रश्नी शुद्ध भावनेने लढा देऊ. अ‍ॅड. माणिक मुळीक म्हणाले, काहीजण सर्किट बेंच आंदोलनात कशी फूट पडेल, हे बघत आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो सहा जिल्ह्णांतील वकिलांना घेऊन एकमुखी घ्यावा.अ‍ॅड. संपत पवार म्हणाले, न्यायसंकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी १९ डिसेंबरला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी वकील बांधवांनी लवचिक भूमिका घ्यावी. दुसऱ्या दिवशी पासून सर्किट बेंचप्रश्नी पुन्हा आंदोलनात आहोत. अ‍ॅड. शिवाजीराव राणे म्हणाले, न्यायालयीन अवमान याचिका प्रकरणी ज्या वकिलांना नोटिसा आल्या आहेत, त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. हे आंदोलन सकारात्मक मार्गांनी पुढे नेऊया. विद्यमान अध्यक्ष राजेंद्र चव्हाण हे न्यायालय अवमानप्रश्नी ठराव झाला की नाही, याबाबत सविस्तर माहिती देत असताना विवेक घाटगे हे मधूनच उठून बोलू राहिले. त्यामुळे चव्हाण व घाटगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वातावरण तणावपूर्ण बनले. उपस्थित वकिलांनी दोघांना शांत केले.सांगलीचे अभिजित सोहनी म्हणाले, सर्किट बेंचप्रश्नी पक्षकारांचेही पाठबळ गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी नुसते बोलतात. पण त्यांनी काही केल्याचे त्यांनी दिसत नाही. हे आंदोलन फक्त वकिलांंचेच सुरू आहे. सर्व समाजाचा त्यामध्ये सहभाग मिळाल्याशिवाय यश मिळणार नाही.साताऱ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशील पाटील म्हणाले, न्यायालय अवमान याचिकाबद्दल कोल्हापूरच्या वकिलांनी हमीपत्र द्यावयाचे की नाही, हा कोल्हापूर बार असोसिएशनचा निर्णय आहे. त्यासाठी आम्हाला या ठिकाणी कशाला बोलाविले? महाराष्ट्र अ‍ॅँड गोवा बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. शिवाजी चव्हाण, अ‍ॅड. ए. ए. कापसे, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. डी. एम. जगताप (सातारा), अ‍ॅड. आर. आर. पाटील,(सांगली), अ‍ॅड. एफ. एम. झारी (मिरज), आदींनी मते व्यक्त केली. (प्रतिनिधी)न्यायालय अवमानप्रकरणी एक महिन्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी उच्च न्यायालयात करणार आहेत. त्याचबरोबर या महिन्यात होणाऱ्या नवीन न्यायसंकुलाच्या इमारतीच्या कार्यक्रमावेळी वकील बांधव अलिप्त राहणार आहेत.- अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन