शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

आजऱ्यातील लाभार्थी कधी पात्र ठरणार ?

By admin | Updated: August 14, 2015 23:10 IST

श्रावणबाळ योजना : कागलमध्ये प्रक्रिया सुरू; आजराकरांना प्रतीक्षा

कृष्णा सावंत- पेरणोली  श्रावणबाळ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कागल तहसीलदारांनी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आजरा तालुक्यातील अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कधी राबविणार, अशी विचारणा तालुक्यातील लाभार्थ्यांमधून होत आहे.कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे तीन हजार अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन योजना सुरू होणार आहे. मुश्रीफ यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या आधारावर समितीने मंजूर केलेली पेन्शन योजना नामंजूर करता येत नसल्याचे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे खरोखर पात्र असूनही अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे. आजरा तालुका हा दुर्गम तालुका आहे. वाड्या-वस्त्यावर शेतात शेतमजुरी करणारी जनता अधिक आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले मजुरी, हॉटेल कामगार, बांधकाम कामगार, आदी कामे करतात. त्यामुळे आजऱ्याच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच एकाचवेळी एक हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना पेन्शन योजना मंजूर झाली. मात्र, मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून फेर चौकशीमधून अपात्र करण्याचा धडाका लावला. त्यात काही खरोखर पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांचा समावेश झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत आजरा येथील सामाजिक संवेदना संस्थेमध्ये निवेदन दिले आहे. केवळ ३५० लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यामधील काही लाभार्थी वगळता बहुतांश लाभार्थी पात्र आहेत. आजऱ्यातील तहसीलदारांची प्रतिमा सामाजिक बांधीलकी जपणारी अशी असल्याने आजरा तालुक्यातही कागलप्रमाणे प्रक्रिया राबवून बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू होण्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे.कागल तालुक्याप्रमाणे आम्हीसुद्धा बंद झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन सुरू करणार आहोत. त्या लाभार्थ्यांची जनसुनावणी घेऊन पात्र की अपात्र ठरविण्यात येणार आहे.- श्रीमती शिल्पा ठोकडे,तहसीलदार, आजरा.