शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आजऱ्यातील लाभार्थी कधी पात्र ठरणार ?

By admin | Updated: August 14, 2015 23:10 IST

श्रावणबाळ योजना : कागलमध्ये प्रक्रिया सुरू; आजराकरांना प्रतीक्षा

कृष्णा सावंत- पेरणोली  श्रावणबाळ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कागल तहसीलदारांनी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आजरा तालुक्यातील अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कधी राबविणार, अशी विचारणा तालुक्यातील लाभार्थ्यांमधून होत आहे.कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे तीन हजार अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन योजना सुरू होणार आहे. मुश्रीफ यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या आधारावर समितीने मंजूर केलेली पेन्शन योजना नामंजूर करता येत नसल्याचे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे खरोखर पात्र असूनही अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे. आजरा तालुका हा दुर्गम तालुका आहे. वाड्या-वस्त्यावर शेतात शेतमजुरी करणारी जनता अधिक आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले मजुरी, हॉटेल कामगार, बांधकाम कामगार, आदी कामे करतात. त्यामुळे आजऱ्याच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच एकाचवेळी एक हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना पेन्शन योजना मंजूर झाली. मात्र, मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून फेर चौकशीमधून अपात्र करण्याचा धडाका लावला. त्यात काही खरोखर पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांचा समावेश झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत आजरा येथील सामाजिक संवेदना संस्थेमध्ये निवेदन दिले आहे. केवळ ३५० लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यामधील काही लाभार्थी वगळता बहुतांश लाभार्थी पात्र आहेत. आजऱ्यातील तहसीलदारांची प्रतिमा सामाजिक बांधीलकी जपणारी अशी असल्याने आजरा तालुक्यातही कागलप्रमाणे प्रक्रिया राबवून बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू होण्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे.कागल तालुक्याप्रमाणे आम्हीसुद्धा बंद झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन सुरू करणार आहोत. त्या लाभार्थ्यांची जनसुनावणी घेऊन पात्र की अपात्र ठरविण्यात येणार आहे.- श्रीमती शिल्पा ठोकडे,तहसीलदार, आजरा.