शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

४० हजार लोकांना शिक्षा करणार का..?

By admin | Updated: August 29, 2015 00:09 IST

पी. एन. यांची विचारणा : जिल्हा बँक बदली वाद

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील ४० हजार लोकांनी के. पी. पाटील यांचा पराभव केला. मग त्या सगळ््यांना तुम्ही शिक्षा करणार का, अशी विचारणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना केली. निमित्त होते जिल्हा बँकेतील बदली प्रकरणाचे. एखाद्याच्या बदलीवरून कसे राजकारण रंगते, याचेही प्रत्यंतर त्यातून आले. घडले ते असे : चेतन पोकर्णेकर हा मूळचा राधानगरीचा लिपिक जिल्हा बँकेच्या कसबा तारळे शाखेत नोकरीत आहे. गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांचा प्रचार केल्याची तक्रार आहे. त्याचा राग माजी आमदार के. पी. पाटील यांना आला होता; परंतु त्यावेळी बँकेत प्रशासक मंडळ असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. आता बँकेत संचालक मंडळ अस्तित्वात आल्याने त्यांची बदली हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे करण्यात आली. त्यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यावर तो आदेश पोस्टाने घरी धाडण्यात आला. शेवटी कारवाईच्या भीतीने ते हलकर्णी येथे रुजू झाले. तोपर्यंत हा विषय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंतही गेला. त्यांनी आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिले. जिल्हा बँकेत काँग्रेसच्या गटाचे माजी आमदार पी. एन. पाटील हे नेते आहेत. आमदार आबिटकर यांना विजयी करण्यात त्यांचाही हातभार लागला होता. त्यामुळे आबिटकर यांनी ही बाब पी. एन. यांच्या कानावर घातली. त्यांनी मग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना फोन केला व निवडणुकीत पराभव झाला म्हणून बदली करून त्रास देणे योग्य नसल्याचे सांगितले. पराभव काय त्याने एकट्याने विरोधात काम केले म्हणून झालेला नाही. ४० हजार लोकांनी विरोधात मते दिली मग त्या सगळ््यांना शिक्षा देणार का, अशी विचारणाही पाटील यांनी ए. वाय. यांच्याकडे केली. संबंधित लिपिकाने दरम्यान बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडेही दाद मागितली आहे. त्यांनी ‘हजर हो, बघूया काय करायचे ते,’ असे आश्वासन दिले आहे; परंतु हा विषय बँकेत चर्चेत आहे.