शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

युनियन मोठी की शासन? पवार :

By admin | Updated: May 22, 2017 17:38 IST

प्रशासनाने दबावाखाली काम करू नये

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २२ : महानगरपालिका प्रशासन हे कर्मचारी संघाच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट झाले असून युनियन मोठी की शासन असा येथे प्रश्न पडतो. यापुढे प्रशासनाने कर्मचारी संघाचा प्रभाव झुगारून काम करावे अन्यथा आयोगाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल, असा गर्भित इशारा सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

शासन अध्यादेश आणि कायदे यानुसारच कामे झाले पाहिजे. कर्मचारी संघाचा दबाव घेऊन प्रशासनाने काम करायची गरज नाही. सफाई कर्मचारी खासगी सावकारीच्या फासात अडकलेले आहेत. त्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. ही फार भयानक बाब आहे. कर्मचारी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांचा या सावकरांशी संबंध आहे का याची चौकशी केली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांसंबंधी राज्य शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी तीन महिन्यांत करावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. जर तसे केले नाही तर त्याची आयोगाला गंभीर दखल घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. सफाई कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी केली का नाही याचे सामाजिक लेखापरीक्षण केले पाहिजे.

शासनाकडून निधी येतो, योजना ठरवून दिल्या जातात पण प्रत्यक्षात त्या पोहोचत नाहीत म्हणूनच लेखापरीक्षणाचा शिफारस आम्ही शासनाकडे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातील बहुतेक सर्वच महानगरपालिकेत शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही याबाबत शासनाला लवकरच आयोगातर्फे अहवाल दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शाहूंच्या नगरीतच वंचित

राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात वंचितांना, दलितांना आरक्षणे दिली; पण दुर्दैवाने त्यांच्याच नगरीतील महानगरपालिकेत मेहतर वाल्मिकी या मागास समाजाला अनेक गोष्टीत वंचित ठेवले गेले आहे याचे वाईट वाटते. आयुक्तांना काही गोष्टी खालचे अधिकारी कळूही देत नाहीत. अधिकाऱ्यांची साखळी आहे. अशा शब्दांत पवार यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.