शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

काम देता का काम, रोजगारासाठी ९ हजार जाणांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST

कोल्हापूर : अनलॉकनंतर व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने बेरोजगार नोकरीच्या शोधात विविध ठिकाणी अर्ज करीत आहेत. नोकरीसाठी वर्षभरात येथील ...

कोल्हापूर : अनलॉकनंतर व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने बेरोजगार नोकरीच्या शोधात विविध ठिकाणी अर्ज करीत आहेत. नोकरीसाठी वर्षभरात येथील स्वयंरोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात ८ हजार ९५७ जणांनी नोंदणी केली आहे. यापैकी ५ हजार ९७३ जणांना खासगी कंपनीत व इतर ठिकाणी नोकरी मिळाली आहे. उर्वरित अजूनही नोकरीच्या शोधात आहेत.

कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय अवलंबल्याने मंदीचे सावट गडद झाले आहे. परिणामी नव्याने निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. काही ठिकाणी नोकरकपातही केल्याने बेरोजगारीत पुन्हा भर पडली आहे. यामुळे नोकरीसाठी स्वयंरोजगार, उद्योजकता कार्यालयाकडे नोंदणी करण्याकडे कल वाढला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लॉकडाऊन झाल्याने रोजगार नसल्याने आठ महिन्यांत सर्वाधिक मार्च महिन्यात २१९७ जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्या महिन्यात केवळ १०८ जणांनाच नोकरी मिळाली आहे. मे महिन्यात नोंदणी केलेल्यांपैकी फक्त एकासच नोकरी मिळाली आहे. गेल्या आठ महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात नोकरीच्या सर्वाधिक संधी निर्माण झाल्याने ३ हजार ३८९ जणांना नोकरी मिळाली. एप्रिल, जुलै, ऑगस्ट वगळता इतर महिन्यात नोंदणीपेक्षा निम्म्याहून कमी लोकांना नोकरी मिळाली आहे.

चौकट

कोणत्या महिन्यात किती नोंदणी?

जानेवारी -१०१४

फेब्रुवारी - १३२२

मार्च -२१९७

एप्रिल -६८४

मे - ३१८

जून - ७२६

जुलै - १४८८

ऑगस्ट - १२०८

कोणत्या वर्षात किती नोंदणी ?

२०१५- ११००७

२०१६-८५७९

२०१७-१७६२०

२०१८-२४७११

२०१९-२१४४३

२०२०-१६४९६

२०२१ ऑगस्टअखेर -८९५७

या वर्षात ५ हजार ९७३ जणांना मिळाला रोजगार

कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. खासगी क्षेत्रात नव्याने नोकऱ्यांच्या जागा निर्माण होण्यालाही मर्यादा आल्या आहेत. तरीही स्वयंरोजगार आणि उद्योजकता कार्यालयाकडे जानेवारी २०२१ ते ऑगस्टअखेर पर्यंत नोंदवलेल्या ८ हजार ९५७ पैकी ५ हजार ९७३ जणांनाच नोकरी मिळाली आहे.

अनेकांनी पकडली मुंबई पुण्याची वाट

स्वयंरोजगार, उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाकडे नोंदणी करूनही नोकरी न मिळालेले बेरोजगार पुणे, मुंबईची वाट धरत आहेत. गावाकडेही भाकरीचा प्रश्न सुटत नसल्याने ते मोठ्या शहरात जाऊन नोकरीचा शोध घेत आहेत. तेथे मिळेल ती नोकरी ते करीत आहेत. बेरोजगारांची संख्या अधिक आणि जागा कमी असे चित्र असल्याने रोजगारीची समस्या भीषण जाणवत आहे.

कोट

नोकरीसाठी आपल्या कार्यालयाकडे या वर्षात ८ हजारपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. यातील अनेक जणांना ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नोंदणी केलेल्या अधिकाअधिक जणांना नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे.

संजय माळी, सहायक आयुक्त, स्वयंरोजगार, उद्योजकता विभाग