शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कृषी महाविद्यालयास ‘शाहूं’चे नाव देण्याचे वावडे का ?

By admin | Updated: June 26, 2015 00:48 IST

दीड वर्षानंतरही प्रलंबीत : नाव देण्याची घोषणा हवेतच

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्याची घोषणा तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. या घोषणेला दीड वर्ष होऊनसुद्धा कृषी महाविद्यालयाच्या नामकरण सोहळ्यास काही मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत कोणत्याही राजकीय नेत्यांकडून किंवा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. असे असताना फक्त येथील प्रवेशद्वाराला राजर्षी शाहूंचे नाव देऊन प्रशासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. २४ नोव्हेंबर २०१३ रोजी महाविद्यालयातील विस्तारित परीक्षा कक्ष, पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर जिल्ह्णाची ओळख राजर्षी शाहू महाराजांनी ‘शेतीप्रधान जिल्हा’ म्हणून करून दिली होती. त्या राजर्षी शाहू महाराजांचे नाव कृषी महाविद्यालयास देणे म्हणजे राज्य शासनाचा सन्मान आहे. ‘येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कृषी महाविद्यालयाचा नामकरण सोहळा पार पडेल,’ असे कृषिमंत्री विखे-पाटील यांनी त्यावेळी जाहीर केले होते. घोषणा होऊन दोन महिने झाले, सहा महिने झाले आणि आता तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले तरी नामकरण सोहळा न झाल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ‘शासकीय काम आणि दीड वर्ष थांब’ यांची प्रचिती पुन्हा एकदा आली. राज्यातील आघाडी सरकार जाऊन भाजप-शिवसेनेची सत्ता आली आहे. राजर्षी शाहूंच्या नगरीत शाहूंची उपेक्षा होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत असून लवकरात लवकर कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे नामकरण करून ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. नावाबद्दल गोंधळकृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नाव आहे. मात्र कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसह सर्व कागदोपत्री ‘कृषी महाविद्यालय, कोल्हापूर’ असे नाव आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये या नावाबद्दल प्रचंड गोंधळ आहे. हा गोंधळ कुठेतरी थांबून तत्काळ या कृषी महाविद्यालयाला ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नाव द्यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. कोल्हापुरात १९६३ मध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा केला. स्थापनेवेळी फक्त ६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे सात संशोधन केंद्रेही आहेत. आतापर्यंत महाविद्यालयातून ७ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे. कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाचे ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्याबाबतचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाठविला आहे. - राजेंद्र भुजबळ, सहायक कुलसचिव, कृषी विद्यापीठ