शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

पाच वर्ष सत्तेत असताना तुम्ही का गप्प बसलात..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास ...

कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावरच आरोप का केले जात आहेत. गुन्हा न सांगणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो लपवणे हादेखील गुन्हा आहे. तुम्हाला सगळं माहीत होतं तर मग पाच वर्षे गप्प का बसला होता, अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केली.

नारायण राणे मंत्री झाले त्यावेळी भाजपला खात्री झाली की आता कोणताही पक्ष आपल्यासोबत येणार नाही. तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार आहे. त्यामुळे आरोप करून सरकार अस्थिर करायचे, सुरूंग लावायचा यासाठी एवढा आटापिटा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच त्यांना केलेली जिल्हा बंदी यासंबंधी ते म्हणाले, भ्रष्टाचाराबाबतची तक्रार दिल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून त्याचा तपास केला जाईल. त्यासाठी तक्रारदार स्वत: सगळीकडे तक्रार करत फिरत नाही. तक्रारदाराला चौकशी करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार सगळ्या गोष्टी घडतील, यंत्रणा त्यांचे काम करेल, आपल्या हट्टासाठी विनाकारण एखाद्या जिल्ह्याची शांतता भंग करणे योग्य नाही. माझे किरीट सोमय्या यांना आवाहन आहे की, त्यांनी जिल्ह्याची शांतता बिघडवू नये.

---

सुरक्षा देणे शक्य नव्हते..

गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडव्यात यासाठी गेली दहा दिवस पोलीस यंत्रणा काम करत होती., नियोजन करत होते. पहाटेपर्यंत सगळे पोलीस बंदोबस्तात गुंतले होते. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सोमय्या यांना झेड सुरक्षा देणे शक्य झाले नसते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर बंदी करावी लागली, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

--

...म्हणून १४४ कलम

किरीट सोमय्या येणार म्हणून जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले याबद्दल ते म्हणाले, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून हे कलम लावले जाते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आपण अनेकदा हे कलम लागू केले आहे. एखादी व्यक्ती किंवा कारणामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे. जिल्ह्याची शांतता अबाधित राखणे ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पाेलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र चर्चा करून हे कलम लागू केले.

---