शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्ष सत्तेत असताना तुम्ही का गप्प बसलात..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास ...

कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावरच आरोप का केले जात आहेत. गुन्हा न सांगणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो लपवणे हादेखील गुन्हा आहे. तुम्हाला सगळं माहीत होतं तर मग पाच वर्षे गप्प का बसला होता, अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केली.

नारायण राणे मंत्री झाले त्यावेळी भाजपला खात्री झाली की आता कोणताही पक्ष आपल्यासोबत येणार नाही. तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार आहे. त्यामुळे आरोप करून सरकार अस्थिर करायचे, सुरूंग लावायचा यासाठी एवढा आटापिटा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच त्यांना केलेली जिल्हा बंदी यासंबंधी ते म्हणाले, भ्रष्टाचाराबाबतची तक्रार दिल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून त्याचा तपास केला जाईल. त्यासाठी तक्रारदार स्वत: सगळीकडे तक्रार करत फिरत नाही. तक्रारदाराला चौकशी करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार सगळ्या गोष्टी घडतील, यंत्रणा त्यांचे काम करेल, आपल्या हट्टासाठी विनाकारण एखाद्या जिल्ह्याची शांतता भंग करणे योग्य नाही. माझे किरीट सोमय्या यांना आवाहन आहे की, त्यांनी जिल्ह्याची शांतता बिघडवू नये.

---

सुरक्षा देणे शक्य नव्हते..

गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडव्यात यासाठी गेली दहा दिवस पोलीस यंत्रणा काम करत होती., नियोजन करत होते. पहाटेपर्यंत सगळे पोलीस बंदोबस्तात गुंतले होते. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सोमय्या यांना झेड सुरक्षा देणे शक्य झाले नसते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर बंदी करावी लागली, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

--

...म्हणून १४४ कलम

किरीट सोमय्या येणार म्हणून जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले याबद्दल ते म्हणाले, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून हे कलम लावले जाते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आपण अनेकदा हे कलम लागू केले आहे. एखादी व्यक्ती किंवा कारणामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे. जिल्ह्याची शांतता अबाधित राखणे ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पाेलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र चर्चा करून हे कलम लागू केले.

---