शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

Maharashtra Assembly Election 2019 ‘उत्तर’चे मतदान का घटले ? चर्चेतून दोन-तीन कारणे समोर ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:09 IST

कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु

ठळक मुद्देपरिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही.

कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी नऊ मतदारसंघांत मोठ्या चुरशीने जोरदार मतदान होत असताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मात्र मतदान कमालीचे घटले. कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार यापेक्षा मतदान का घटले, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. चर्चेतून दोन-तीन कारणे ठळकपणे समोर आली आहेत.

कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६०. ८७ टक्के इतकेच मतदान झाले. त्यातही मतदान न करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

यावेळी दोन लाख ८६ हजार १६९ मतदारांपैकी ९२ हजार ८४० पुरुष मतदारांनी, तर ८१ हजार ३६५ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी घटण्यामागे दोन-तीन कारणे ठळकपणे दिसतात. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या कमी होती. त्यातही ही निवडणूक आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत जाधव यांच्यात झाली. जेव्हा तीन ते चार मातब्बर उमेदवार असतात तेव्हा सर्व उमेदवारांची यंत्रणा कामाला लागते. मतदारांना मतदान करण्याकरिता बाहेर काढले जाते; पण येथे मतदारारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फारसे प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून झाले नाहीत.दुसरे एक महत्त्वाचे कारण ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदार संघाचे आहे; कारण ‘उत्तर’मधील बहुतेक सर्वच नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांनी ‘दक्षिण’च्या निवडणुकीत वाहून घेतले होते. त्यांचे ‘उत्तर’कडे दुर्लक्ष झाले. परिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या.

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही. तिसरे कारण तोंडावर असलेल्या दिवाळी सणाचे आहे. दिवाळीच्या आठ दिवस आधी महिला फराळ बनविण्याच्या कामात व्यस्त असतात. सध्या घरोघरी ही कामे सुरू असल्याने महिला तुलनेने कमी बाहेर पडल्या. पावसाळी वातावरणाचाही मतदानावर परिणाम झाला. निवडणुकीतील चुरस प्रचारादरम्यान केवळ प्रमुख कार्यकर्ते, उमेदवारांतच दिसली. ती मतदारांत दिसली नाही. त्यामुळेच मतदान घटले.

  • अशीही एक चर्चा!

शहरातील एका वसाहतीत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केवळ मंडळाच्या कार्यकर्त्यांना ‘लक्ष्मी’दर्शन घडविले; पण घरोघरी ही लक्ष्मी पोहोचली नाही. घरापर्यंत लक्ष्मी येईल या अपेक्षेत असलेल्या मतदारांची निराशा झाली. त्यामुळे येथे मतदार बाहेर पडलेच नाहीत. दुपारी तीननंतर उमेदवार व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच अनेकांनी तिकडे धाव घेऊन मतदारांना मतदान करण्यास बाहेर पडण्याचे आवाहन केले. तरीही तेथे पन्नास टक्क्यांपेक्षा कमीच मतदान झाल्याचे सांगण्यात येते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक