शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 ‘उत्तर’चे मतदान का घटले ? चर्चेतून दोन-तीन कारणे समोर ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:09 IST

कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु

ठळक मुद्देपरिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही.

कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी नऊ मतदारसंघांत मोठ्या चुरशीने जोरदार मतदान होत असताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मात्र मतदान कमालीचे घटले. कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार यापेक्षा मतदान का घटले, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. चर्चेतून दोन-तीन कारणे ठळकपणे समोर आली आहेत.

कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६०. ८७ टक्के इतकेच मतदान झाले. त्यातही मतदान न करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

यावेळी दोन लाख ८६ हजार १६९ मतदारांपैकी ९२ हजार ८४० पुरुष मतदारांनी, तर ८१ हजार ३६५ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी घटण्यामागे दोन-तीन कारणे ठळकपणे दिसतात. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या कमी होती. त्यातही ही निवडणूक आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत जाधव यांच्यात झाली. जेव्हा तीन ते चार मातब्बर उमेदवार असतात तेव्हा सर्व उमेदवारांची यंत्रणा कामाला लागते. मतदारांना मतदान करण्याकरिता बाहेर काढले जाते; पण येथे मतदारारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फारसे प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून झाले नाहीत.दुसरे एक महत्त्वाचे कारण ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदार संघाचे आहे; कारण ‘उत्तर’मधील बहुतेक सर्वच नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांनी ‘दक्षिण’च्या निवडणुकीत वाहून घेतले होते. त्यांचे ‘उत्तर’कडे दुर्लक्ष झाले. परिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या.

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही. तिसरे कारण तोंडावर असलेल्या दिवाळी सणाचे आहे. दिवाळीच्या आठ दिवस आधी महिला फराळ बनविण्याच्या कामात व्यस्त असतात. सध्या घरोघरी ही कामे सुरू असल्याने महिला तुलनेने कमी बाहेर पडल्या. पावसाळी वातावरणाचाही मतदानावर परिणाम झाला. निवडणुकीतील चुरस प्रचारादरम्यान केवळ प्रमुख कार्यकर्ते, उमेदवारांतच दिसली. ती मतदारांत दिसली नाही. त्यामुळेच मतदान घटले.

  • अशीही एक चर्चा!

शहरातील एका वसाहतीत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केवळ मंडळाच्या कार्यकर्त्यांना ‘लक्ष्मी’दर्शन घडविले; पण घरोघरी ही लक्ष्मी पोहोचली नाही. घरापर्यंत लक्ष्मी येईल या अपेक्षेत असलेल्या मतदारांची निराशा झाली. त्यामुळे येथे मतदार बाहेर पडलेच नाहीत. दुपारी तीननंतर उमेदवार व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच अनेकांनी तिकडे धाव घेऊन मतदारांना मतदान करण्यास बाहेर पडण्याचे आवाहन केले. तरीही तेथे पन्नास टक्क्यांपेक्षा कमीच मतदान झाल्याचे सांगण्यात येते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक