शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Maharashtra Assembly Election 2019 ‘उत्तर’चे मतदान का घटले ? चर्चेतून दोन-तीन कारणे समोर ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:09 IST

कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु

ठळक मुद्देपरिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही.

कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी नऊ मतदारसंघांत मोठ्या चुरशीने जोरदार मतदान होत असताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मात्र मतदान कमालीचे घटले. कमी मतदानाचा फायदा कोणाला होणार यापेक्षा मतदान का घटले, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. चर्चेतून दोन-तीन कारणे ठळकपणे समोर आली आहेत.

कोल्हापूर उत्तर हा पूर्णत: शहरी चेहरा असलेला मतदारसंघ आहे. येथील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे केडर, प्रशासनाकडून होणारी जनजागृती आणि झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्त्यांमधून दिसणारा उत्साह यांमुळे शहरात ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान होणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६०. ८७ टक्के इतकेच मतदान झाले. त्यातही मतदान न करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

यावेळी दोन लाख ८६ हजार १६९ मतदारांपैकी ९२ हजार ८४० पुरुष मतदारांनी, तर ८१ हजार ३६५ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी घटण्यामागे दोन-तीन कारणे ठळकपणे दिसतात. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या कमी होती. त्यातही ही निवडणूक आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत जाधव यांच्यात झाली. जेव्हा तीन ते चार मातब्बर उमेदवार असतात तेव्हा सर्व उमेदवारांची यंत्रणा कामाला लागते. मतदारांना मतदान करण्याकरिता बाहेर काढले जाते; पण येथे मतदारारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फारसे प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून झाले नाहीत.दुसरे एक महत्त्वाचे कारण ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदार संघाचे आहे; कारण ‘उत्तर’मधील बहुतेक सर्वच नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांनी ‘दक्षिण’च्या निवडणुकीत वाहून घेतले होते. त्यांचे ‘उत्तर’कडे दुर्लक्ष झाले. परिणामी मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा आल्या.

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेले नाही. तिसरे कारण तोंडावर असलेल्या दिवाळी सणाचे आहे. दिवाळीच्या आठ दिवस आधी महिला फराळ बनविण्याच्या कामात व्यस्त असतात. सध्या घरोघरी ही कामे सुरू असल्याने महिला तुलनेने कमी बाहेर पडल्या. पावसाळी वातावरणाचाही मतदानावर परिणाम झाला. निवडणुकीतील चुरस प्रचारादरम्यान केवळ प्रमुख कार्यकर्ते, उमेदवारांतच दिसली. ती मतदारांत दिसली नाही. त्यामुळेच मतदान घटले.

  • अशीही एक चर्चा!

शहरातील एका वसाहतीत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केवळ मंडळाच्या कार्यकर्त्यांना ‘लक्ष्मी’दर्शन घडविले; पण घरोघरी ही लक्ष्मी पोहोचली नाही. घरापर्यंत लक्ष्मी येईल या अपेक्षेत असलेल्या मतदारांची निराशा झाली. त्यामुळे येथे मतदार बाहेर पडलेच नाहीत. दुपारी तीननंतर उमेदवार व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच अनेकांनी तिकडे धाव घेऊन मतदारांना मतदान करण्यास बाहेर पडण्याचे आवाहन केले. तरीही तेथे पन्नास टक्क्यांपेक्षा कमीच मतदान झाल्याचे सांगण्यात येते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक