शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

‘आयआरबी’चे अपूर्ण रस्ते करायचे कोणी ?

By admin | Updated: August 3, 2014 23:37 IST

जबाबदारी कोणाची ? : स्थायी समिती सभेत विचारणा

कोल्हापूर : ‘आयआरबी’ने रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ही अर्धवट कामे पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची ? असा संतप्त सवाल शनिवारी स्थायी समिती सभेत उपस्थित झाला. जर आयआरबी अपूर्ण कामे करणार नसेल, तर महानगरपालिका किंवा शासनाच्या निधीतून पूर्ण करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते. ‘आयआरबी’ने करायचा जावळाचा गणपती मंदिर ते क्रशर चौक हा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतही त्यामुळे व्यत्यय येत असल्याची बाब शारंगधर देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली. अपूर्ण कामे केली जाणार नसतील, तर महापालिका किंवा शासनाच्या निधीतून ती करण्यात यावीत, असेही त्यांनी सुचविले. व्हीनस चौकात अशीच ‘आयआरबी’च्या रस्त्यावर चेंबर उखडली आहेत. तेथे अपघात होण्याची शक्यता आहे, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. रंकाळा परिसरातील रस्ता करायचा झाला, तर किमान अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे स्टिअरिंग कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून आयआरबीकडून तसे पत्र घेऊ, असे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.लक्ष्मीपुरीत झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील चारही विभागीय कार्यालयांना त्यांच्या भागातील रस्ते दुभाजक रंगविण्याचे तसेच रस्त्यांवरील चेंबर तपासण्याचे आदेश देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.