शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

थोडा तरी शाहू विचार जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:13 IST

केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ भावे यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.गर्दीने खचाखच भरलेल्या शाहू स्मारक सभागृहात हा शानदार समारंभ पार पडला. प्रा. भावे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वांनीच उठून उभे राहून भावे यांच्या कार्याला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली. ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विश्वस्त प्रा. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना पुष्पा भावे म्हणाल्या, सध्या देशभरात घोषित आणीबाणी नसली तरी ती असल्यासारखीच परिस्थिती आहे. मोठ्या पेचप्रसंगातून आपण चाललो आहोत. एका राजकीय गटाच्या ठिकाणी दुसरा गट सत्तेवर आला, एवढ्यापुरते हे मर्यादित नाही; परंतु वंचितांचा, सर्वसामान्यांचा विचार कोण करणार आणि सर्वांसाठी नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहायचे, हा खरा प्रश्न आहे. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांची जी मूल्याधिष्ठित दृष्टी होती, ती अंगी बाणवून आपल्याला यापुढील काळात काम करावे लागेल. त्यांच्या मूल्यदृष्टीकडे अविवेकाने पाहिल्यानेच ही वेळ आली आहे.