शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

थोडा तरी शाहू विचार जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:13 IST

केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ भावे यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.गर्दीने खचाखच भरलेल्या शाहू स्मारक सभागृहात हा शानदार समारंभ पार पडला. प्रा. भावे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वांनीच उठून उभे राहून भावे यांच्या कार्याला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली. ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विश्वस्त प्रा. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना पुष्पा भावे म्हणाल्या, सध्या देशभरात घोषित आणीबाणी नसली तरी ती असल्यासारखीच परिस्थिती आहे. मोठ्या पेचप्रसंगातून आपण चाललो आहोत. एका राजकीय गटाच्या ठिकाणी दुसरा गट सत्तेवर आला, एवढ्यापुरते हे मर्यादित नाही; परंतु वंचितांचा, सर्वसामान्यांचा विचार कोण करणार आणि सर्वांसाठी नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहायचे, हा खरा प्रश्न आहे. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांची जी मूल्याधिष्ठित दृष्टी होती, ती अंगी बाणवून आपल्याला यापुढील काळात काम करावे लागेल. त्यांच्या मूल्यदृष्टीकडे अविवेकाने पाहिल्यानेच ही वेळ आली आहे.