शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

थोडा तरी शाहू विचार जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:13 IST

केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ भावे यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.गर्दीने खचाखच भरलेल्या शाहू स्मारक सभागृहात हा शानदार समारंभ पार पडला. प्रा. भावे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वांनीच उठून उभे राहून भावे यांच्या कार्याला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली. ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विश्वस्त प्रा. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना पुष्पा भावे म्हणाल्या, सध्या देशभरात घोषित आणीबाणी नसली तरी ती असल्यासारखीच परिस्थिती आहे. मोठ्या पेचप्रसंगातून आपण चाललो आहोत. एका राजकीय गटाच्या ठिकाणी दुसरा गट सत्तेवर आला, एवढ्यापुरते हे मर्यादित नाही; परंतु वंचितांचा, सर्वसामान्यांचा विचार कोण करणार आणि सर्वांसाठी नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहायचे, हा खरा प्रश्न आहे. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांची जी मूल्याधिष्ठित दृष्टी होती, ती अंगी बाणवून आपल्याला यापुढील काळात काम करावे लागेल. त्यांच्या मूल्यदृष्टीकडे अविवेकाने पाहिल्यानेच ही वेळ आली आहे.