शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

पोर्लेत सरपंच पदाची लाॅटरी कोणत्या गटाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली राजकीय इप्सित साध्य करणारे कासारी आणि उदय गट स्थानिक निवडणुकीत परस्पर विरोधी असतात. या दोन्ही गटांतून ...

जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली राजकीय इप्सित साध्य करणारे कासारी आणि उदय गट स्थानिक निवडणुकीत परस्पर विरोधी असतात. या दोन्ही गटांतून राजकीय मतभेदामुळे फुटलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाने उदय गटाला हातमिळवणी करून कासारीकडील २५ वर्षांची सत्ता १३/५ च्या फरकाने काबीज केली.

सरपंच पदाचा ठोकताळा करून काही कार्यकर्त्यांनी निवडणूक ताकदीने लढवून जिंकली; परंतु निवडणूकीनंतर महिला आरक्षित सरपंच पदाच्या आरक्षणाने गट नेत्यांची डोकेदुखी वाढवली. आघाडीतून निवडून आलेल्या चार महिला सरपंच पदांच्या दावेदार आहेत. नशिबांनी सरपंच पदाच्या लाॅटरीचे तिकीट फाटले असले तरी पहिल्या बहुमानासाठी महिला सदस्यांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. चार सदस्यांपैकी दोन उदय, तर दोन राष्ट्रवादी, सेना गटाच्या असल्या तरी एकेकाळी उदयचा हा बुरूज होता. पाच वर्षांसाठी सरपंच, उपसरपंच पदाचा फाॅर्म्युला ठरवताना गटनेत्यांचा कस लागणार आहे. पंचवीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून पाच वर्षांसाठी दिलेल्या सत्तेचा खेळ होऊ नये, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

चौकट

निवडून आलेल्या चार महिलांपैकी दोन महिला या उदय गटातून फुटून गेल्या. त्या राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत, तर दोन महिला या उदय गटातून निवडून आल्या आहेत. यापैकी उदय गटात नाराजीच्या वाटेवर असलेल्या गटाची त्या महिलेला उमेदवारी मिळाली होती. तसेच तंटामुक्त पद पराजितांना की डावलेल्यांना कार्यकर्त्याला द्यायचे हे कोडेचं आहे. सरपंच, उपसरपंच पद निवडीचे त्रांगडं पाच वर्ष सोडविताना गटनेत्यांचे नाकीनऊ होणार आहे.

Sent from my iPhone