शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावात कधी वाहणार विकासाचे वारे

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

नागरी सुविधांची वानवा : आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

घन:शाम कुंभार- यड्राव--इचलकरंजी शहराचा झपाट्याने चेहरा-मोहरा बदलत आहे. शहरालगत असलेले परंतु शिरोळ तालुका असूनही इचलकरंजीचा अविभाज्य बनत असलेल्या यड्राव गावास शासकीय योजना, सामाजिक हिताचे उपक्रम व सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरास विकासाची बळकटी मिळू शकेल आणि ग्रामीण भागातही नागरी सुविधा मिळू शकल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागाचा कायापालट होईल.यड्राव गाव हे शिरोळ तालुक्यात असले तरी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजी शहरावर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण व शेतीपूरक उद्योग व्यवसाय असल्याने शहरासाठी आवश्यक असणारा दूध पुरवठा, भाजीपाला, उद्योगामधील कामगारांची आवश्यकता यासह अनेक सुविधांचा पुरवठा येथून होतो. यामुळे परस्परपुरक ठरलेले यड्राव-इचलकरंजी शहर येथील सर्वसामान्यांच्या गरजा व सोयी-सुविधांपेक्षा कितीतरी पुढे आहे. इचलकरंजी-टाकवडे, जांभळी, कोंडीग्रे, तारदाळ, खोतवाडी व शहापूर या सीमारेषेच्या आतील सुमारे तीन कि.मी. परिसरात पसरलेल्या या क्षेत्रात सुमारे बारा हजार लोकसंख्या आहे. मुख्य गावाभोवती औद्योगिकीकरणामुळे विस्तारित वसाहती स्थापन होत आहेत. या वसाहतींना शहरी ढग दिसून येत आहेत.गावातील या लोकसंख्येला आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता आहे. ग्रामस्थांना शुद्ध पेयजल, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, सार्वजनिक शौचालय, मुलांना खेळासाठी मैदान, वाचनालय, वृद्धांसाठी आॅक्सिजन पार्क, सर्व भागात दिवाबत्तीची सोय, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, गावाचा विस्तार वाढत असल्याने स्मशानभूमीची सोय, मळे भागातून येणारा शेती उत्पादनासाठी पाणंद रस्ते तयार करणे, सर्वोपयोगी सांस्कृतिक भवन व झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन, दारूबंदीसाठी पुढाकार, सर्वसोयीनियुक्त बाजारकट्टा या सुविधांची अत्यावश्यकता आहे.याचबरोबर यड्रावच्या दक्षिणेस असलेला इचलकरंजीचा कचरा डेपो, मल:निस्सारण केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर. के. नगर, रेणुकानगर, खंडोबावाडी या भागात अपार्टमेंट संस्कृती जोर धरत आहे. परंतु त्याचा सांडपाणी व्यवस्थापनाशी काहीही संबंध येत नसलेले सांडपाणीच एक मोठा प्रश्न बनत आहे. ग्रामीण भागात शौचालयाबाबत अजून प्रबोधनाची गरज आहे. यड्रावमधील शाळेजवळ असलेल्या गावतळ्याची डागडुजी करून नैसर्गिक पाणीसाठा जनावरे व इतर उपयोगासाठी पूरक ठरला असता. त्याच्याभोवती सुशोभिकरण झाल्यास धावपटूंसाठी धावपट्टी तयार होऊ शकते. जवळच असलेल्या स्मशानभूमीस कंपाऊंड घालूनही सोय करता येईल. मार्गावरील अतिक्रमणे बाजूला करणे वाहतुकीच्यादृष्टीने हितकारक आहे.इचलकरंजी आमराईच्या पूर्वेकडून आसरानगर पार्वती हौसिंग सोसायटी, अल्फोन्सा स्कूल, पार्वती औद्योगिक वसाहत असा प्रस्तावित ८० फुटी बायपास रोड आहे. यामध्ये असणारे शेतकरी व जमीनमालकांनी मार्गासाठी शासनास सहकार्य केल्यास इचलकरंजीतील प्रमुख मार्गांवरील रहदारीचा ताण निश्चित कमी होईल. यामुळे अपघातांची संख्या रोडावेल.गावासाठी स्वच्छ पाणी मिळावे. शासनाकडून मोफत मिळत असलेले मीटर बसवून ग्रामस्थांचा फायदा करावा. ग्रामस्थांना आर्थिक बोजा देऊ नये. तळ्याचे सुशोभीकरण करून खेळाडूंसाठी धावपट्टी करावी. इचलकरंजीचा कचरा डेपो हलवावा. डुकरांचा बंदोबस्त करावा. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. अतिक्रमणे दूर करावीत.- राजगोंडा पाटील, ग्रामस्थ.इचलकरंजीवर अवलंबूनयड्राव गाव शिरोळ तालुक्यात असले तरी ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजीवर अवलंबून रहावे लागते.