शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावात कधी वाहणार विकासाचे वारे

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

नागरी सुविधांची वानवा : आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

घन:शाम कुंभार- यड्राव--इचलकरंजी शहराचा झपाट्याने चेहरा-मोहरा बदलत आहे. शहरालगत असलेले परंतु शिरोळ तालुका असूनही इचलकरंजीचा अविभाज्य बनत असलेल्या यड्राव गावास शासकीय योजना, सामाजिक हिताचे उपक्रम व सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरास विकासाची बळकटी मिळू शकेल आणि ग्रामीण भागातही नागरी सुविधा मिळू शकल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागाचा कायापालट होईल.यड्राव गाव हे शिरोळ तालुक्यात असले तरी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजी शहरावर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण व शेतीपूरक उद्योग व्यवसाय असल्याने शहरासाठी आवश्यक असणारा दूध पुरवठा, भाजीपाला, उद्योगामधील कामगारांची आवश्यकता यासह अनेक सुविधांचा पुरवठा येथून होतो. यामुळे परस्परपुरक ठरलेले यड्राव-इचलकरंजी शहर येथील सर्वसामान्यांच्या गरजा व सोयी-सुविधांपेक्षा कितीतरी पुढे आहे. इचलकरंजी-टाकवडे, जांभळी, कोंडीग्रे, तारदाळ, खोतवाडी व शहापूर या सीमारेषेच्या आतील सुमारे तीन कि.मी. परिसरात पसरलेल्या या क्षेत्रात सुमारे बारा हजार लोकसंख्या आहे. मुख्य गावाभोवती औद्योगिकीकरणामुळे विस्तारित वसाहती स्थापन होत आहेत. या वसाहतींना शहरी ढग दिसून येत आहेत.गावातील या लोकसंख्येला आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता आहे. ग्रामस्थांना शुद्ध पेयजल, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, सार्वजनिक शौचालय, मुलांना खेळासाठी मैदान, वाचनालय, वृद्धांसाठी आॅक्सिजन पार्क, सर्व भागात दिवाबत्तीची सोय, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, गावाचा विस्तार वाढत असल्याने स्मशानभूमीची सोय, मळे भागातून येणारा शेती उत्पादनासाठी पाणंद रस्ते तयार करणे, सर्वोपयोगी सांस्कृतिक भवन व झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन, दारूबंदीसाठी पुढाकार, सर्वसोयीनियुक्त बाजारकट्टा या सुविधांची अत्यावश्यकता आहे.याचबरोबर यड्रावच्या दक्षिणेस असलेला इचलकरंजीचा कचरा डेपो, मल:निस्सारण केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर. के. नगर, रेणुकानगर, खंडोबावाडी या भागात अपार्टमेंट संस्कृती जोर धरत आहे. परंतु त्याचा सांडपाणी व्यवस्थापनाशी काहीही संबंध येत नसलेले सांडपाणीच एक मोठा प्रश्न बनत आहे. ग्रामीण भागात शौचालयाबाबत अजून प्रबोधनाची गरज आहे. यड्रावमधील शाळेजवळ असलेल्या गावतळ्याची डागडुजी करून नैसर्गिक पाणीसाठा जनावरे व इतर उपयोगासाठी पूरक ठरला असता. त्याच्याभोवती सुशोभिकरण झाल्यास धावपटूंसाठी धावपट्टी तयार होऊ शकते. जवळच असलेल्या स्मशानभूमीस कंपाऊंड घालूनही सोय करता येईल. मार्गावरील अतिक्रमणे बाजूला करणे वाहतुकीच्यादृष्टीने हितकारक आहे.इचलकरंजी आमराईच्या पूर्वेकडून आसरानगर पार्वती हौसिंग सोसायटी, अल्फोन्सा स्कूल, पार्वती औद्योगिक वसाहत असा प्रस्तावित ८० फुटी बायपास रोड आहे. यामध्ये असणारे शेतकरी व जमीनमालकांनी मार्गासाठी शासनास सहकार्य केल्यास इचलकरंजीतील प्रमुख मार्गांवरील रहदारीचा ताण निश्चित कमी होईल. यामुळे अपघातांची संख्या रोडावेल.गावासाठी स्वच्छ पाणी मिळावे. शासनाकडून मोफत मिळत असलेले मीटर बसवून ग्रामस्थांचा फायदा करावा. ग्रामस्थांना आर्थिक बोजा देऊ नये. तळ्याचे सुशोभीकरण करून खेळाडूंसाठी धावपट्टी करावी. इचलकरंजीचा कचरा डेपो हलवावा. डुकरांचा बंदोबस्त करावा. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. अतिक्रमणे दूर करावीत.- राजगोंडा पाटील, ग्रामस्थ.इचलकरंजीवर अवलंबूनयड्राव गाव शिरोळ तालुक्यात असले तरी ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजीवर अवलंबून रहावे लागते.