शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

यड्रावात कधी वाहणार विकासाचे वारे

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

नागरी सुविधांची वानवा : आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

घन:शाम कुंभार- यड्राव--इचलकरंजी शहराचा झपाट्याने चेहरा-मोहरा बदलत आहे. शहरालगत असलेले परंतु शिरोळ तालुका असूनही इचलकरंजीचा अविभाज्य बनत असलेल्या यड्राव गावास शासकीय योजना, सामाजिक हिताचे उपक्रम व सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरास विकासाची बळकटी मिळू शकेल आणि ग्रामीण भागातही नागरी सुविधा मिळू शकल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागाचा कायापालट होईल.यड्राव गाव हे शिरोळ तालुक्यात असले तरी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजी शहरावर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण व शेतीपूरक उद्योग व्यवसाय असल्याने शहरासाठी आवश्यक असणारा दूध पुरवठा, भाजीपाला, उद्योगामधील कामगारांची आवश्यकता यासह अनेक सुविधांचा पुरवठा येथून होतो. यामुळे परस्परपुरक ठरलेले यड्राव-इचलकरंजी शहर येथील सर्वसामान्यांच्या गरजा व सोयी-सुविधांपेक्षा कितीतरी पुढे आहे. इचलकरंजी-टाकवडे, जांभळी, कोंडीग्रे, तारदाळ, खोतवाडी व शहापूर या सीमारेषेच्या आतील सुमारे तीन कि.मी. परिसरात पसरलेल्या या क्षेत्रात सुमारे बारा हजार लोकसंख्या आहे. मुख्य गावाभोवती औद्योगिकीकरणामुळे विस्तारित वसाहती स्थापन होत आहेत. या वसाहतींना शहरी ढग दिसून येत आहेत.गावातील या लोकसंख्येला आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता आहे. ग्रामस्थांना शुद्ध पेयजल, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, सार्वजनिक शौचालय, मुलांना खेळासाठी मैदान, वाचनालय, वृद्धांसाठी आॅक्सिजन पार्क, सर्व भागात दिवाबत्तीची सोय, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, गावाचा विस्तार वाढत असल्याने स्मशानभूमीची सोय, मळे भागातून येणारा शेती उत्पादनासाठी पाणंद रस्ते तयार करणे, सर्वोपयोगी सांस्कृतिक भवन व झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन, दारूबंदीसाठी पुढाकार, सर्वसोयीनियुक्त बाजारकट्टा या सुविधांची अत्यावश्यकता आहे.याचबरोबर यड्रावच्या दक्षिणेस असलेला इचलकरंजीचा कचरा डेपो, मल:निस्सारण केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर. के. नगर, रेणुकानगर, खंडोबावाडी या भागात अपार्टमेंट संस्कृती जोर धरत आहे. परंतु त्याचा सांडपाणी व्यवस्थापनाशी काहीही संबंध येत नसलेले सांडपाणीच एक मोठा प्रश्न बनत आहे. ग्रामीण भागात शौचालयाबाबत अजून प्रबोधनाची गरज आहे. यड्रावमधील शाळेजवळ असलेल्या गावतळ्याची डागडुजी करून नैसर्गिक पाणीसाठा जनावरे व इतर उपयोगासाठी पूरक ठरला असता. त्याच्याभोवती सुशोभिकरण झाल्यास धावपटूंसाठी धावपट्टी तयार होऊ शकते. जवळच असलेल्या स्मशानभूमीस कंपाऊंड घालूनही सोय करता येईल. मार्गावरील अतिक्रमणे बाजूला करणे वाहतुकीच्यादृष्टीने हितकारक आहे.इचलकरंजी आमराईच्या पूर्वेकडून आसरानगर पार्वती हौसिंग सोसायटी, अल्फोन्सा स्कूल, पार्वती औद्योगिक वसाहत असा प्रस्तावित ८० फुटी बायपास रोड आहे. यामध्ये असणारे शेतकरी व जमीनमालकांनी मार्गासाठी शासनास सहकार्य केल्यास इचलकरंजीतील प्रमुख मार्गांवरील रहदारीचा ताण निश्चित कमी होईल. यामुळे अपघातांची संख्या रोडावेल.गावासाठी स्वच्छ पाणी मिळावे. शासनाकडून मोफत मिळत असलेले मीटर बसवून ग्रामस्थांचा फायदा करावा. ग्रामस्थांना आर्थिक बोजा देऊ नये. तळ्याचे सुशोभीकरण करून खेळाडूंसाठी धावपट्टी करावी. इचलकरंजीचा कचरा डेपो हलवावा. डुकरांचा बंदोबस्त करावा. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. अतिक्रमणे दूर करावीत.- राजगोंडा पाटील, ग्रामस्थ.इचलकरंजीवर अवलंबूनयड्राव गाव शिरोळ तालुक्यात असले तरी ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजीवर अवलंबून रहावे लागते.