शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

यड्रावात कधी वाहणार विकासाचे वारे

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

नागरी सुविधांची वानवा : आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

घन:शाम कुंभार- यड्राव--इचलकरंजी शहराचा झपाट्याने चेहरा-मोहरा बदलत आहे. शहरालगत असलेले परंतु शिरोळ तालुका असूनही इचलकरंजीचा अविभाज्य बनत असलेल्या यड्राव गावास शासकीय योजना, सामाजिक हिताचे उपक्रम व सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरास विकासाची बळकटी मिळू शकेल आणि ग्रामीण भागातही नागरी सुविधा मिळू शकल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागाचा कायापालट होईल.यड्राव गाव हे शिरोळ तालुक्यात असले तरी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजी शहरावर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण व शेतीपूरक उद्योग व्यवसाय असल्याने शहरासाठी आवश्यक असणारा दूध पुरवठा, भाजीपाला, उद्योगामधील कामगारांची आवश्यकता यासह अनेक सुविधांचा पुरवठा येथून होतो. यामुळे परस्परपुरक ठरलेले यड्राव-इचलकरंजी शहर येथील सर्वसामान्यांच्या गरजा व सोयी-सुविधांपेक्षा कितीतरी पुढे आहे. इचलकरंजी-टाकवडे, जांभळी, कोंडीग्रे, तारदाळ, खोतवाडी व शहापूर या सीमारेषेच्या आतील सुमारे तीन कि.मी. परिसरात पसरलेल्या या क्षेत्रात सुमारे बारा हजार लोकसंख्या आहे. मुख्य गावाभोवती औद्योगिकीकरणामुळे विस्तारित वसाहती स्थापन होत आहेत. या वसाहतींना शहरी ढग दिसून येत आहेत.गावातील या लोकसंख्येला आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता आहे. ग्रामस्थांना शुद्ध पेयजल, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, सार्वजनिक शौचालय, मुलांना खेळासाठी मैदान, वाचनालय, वृद्धांसाठी आॅक्सिजन पार्क, सर्व भागात दिवाबत्तीची सोय, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, गावाचा विस्तार वाढत असल्याने स्मशानभूमीची सोय, मळे भागातून येणारा शेती उत्पादनासाठी पाणंद रस्ते तयार करणे, सर्वोपयोगी सांस्कृतिक भवन व झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन, दारूबंदीसाठी पुढाकार, सर्वसोयीनियुक्त बाजारकट्टा या सुविधांची अत्यावश्यकता आहे.याचबरोबर यड्रावच्या दक्षिणेस असलेला इचलकरंजीचा कचरा डेपो, मल:निस्सारण केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर. के. नगर, रेणुकानगर, खंडोबावाडी या भागात अपार्टमेंट संस्कृती जोर धरत आहे. परंतु त्याचा सांडपाणी व्यवस्थापनाशी काहीही संबंध येत नसलेले सांडपाणीच एक मोठा प्रश्न बनत आहे. ग्रामीण भागात शौचालयाबाबत अजून प्रबोधनाची गरज आहे. यड्रावमधील शाळेजवळ असलेल्या गावतळ्याची डागडुजी करून नैसर्गिक पाणीसाठा जनावरे व इतर उपयोगासाठी पूरक ठरला असता. त्याच्याभोवती सुशोभिकरण झाल्यास धावपटूंसाठी धावपट्टी तयार होऊ शकते. जवळच असलेल्या स्मशानभूमीस कंपाऊंड घालूनही सोय करता येईल. मार्गावरील अतिक्रमणे बाजूला करणे वाहतुकीच्यादृष्टीने हितकारक आहे.इचलकरंजी आमराईच्या पूर्वेकडून आसरानगर पार्वती हौसिंग सोसायटी, अल्फोन्सा स्कूल, पार्वती औद्योगिक वसाहत असा प्रस्तावित ८० फुटी बायपास रोड आहे. यामध्ये असणारे शेतकरी व जमीनमालकांनी मार्गासाठी शासनास सहकार्य केल्यास इचलकरंजीतील प्रमुख मार्गांवरील रहदारीचा ताण निश्चित कमी होईल. यामुळे अपघातांची संख्या रोडावेल.गावासाठी स्वच्छ पाणी मिळावे. शासनाकडून मोफत मिळत असलेले मीटर बसवून ग्रामस्थांचा फायदा करावा. ग्रामस्थांना आर्थिक बोजा देऊ नये. तळ्याचे सुशोभीकरण करून खेळाडूंसाठी धावपट्टी करावी. इचलकरंजीचा कचरा डेपो हलवावा. डुकरांचा बंदोबस्त करावा. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. अतिक्रमणे दूर करावीत.- राजगोंडा पाटील, ग्रामस्थ.इचलकरंजीवर अवलंबूनयड्राव गाव शिरोळ तालुक्यात असले तरी ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजीवर अवलंबून रहावे लागते.