शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

Lok Sabha Election 2019 कष्टकरी जनतेचा आवाज आहे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:46 IST

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी ...

वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी अनेक मतदारसंघांत समाजवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, तसेच जनता दल यांची लढत लक्षवेधी असायची. या पक्षांचे नेते शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे म्हणून तळपत असायचे. प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणातून समाजवादी आणि डावे पक्ष निवडणुकीच्या लढाईत कोठेही आघाडीवर नाहीत, असे स्पष्ट दिसते आहे.महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. तिसरी शक्ती नाहीच. अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित विकास आघाडीने या चारही पक्षांच्या दोन्ही गटाविरुद्ध तिसरी शक्ती उभारण्याचा प्रयत्न केला आहे. या आघाडीची पहिलीच निवडणूक आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने लोकसभा न लढविता भाजप-शिवसेना युती विरुद्ध प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, कामगार आघाडी शेड्युल कास्ट फेडरेशन आदी पक्षांतर्फे अनेक दिग्गज उमेदवारांनी महाराष्ट्रातून निवडणुका लढविल्या आहेत, तसेच त्या जिंकून लोकसभेत राष्ट्रीय नेत्यांच्या माळेत जाऊन बसले आहेत.डाव्या आघाडीच्या किंवा समाजवादी पक्षांच्या नेत्यांची पार्श्वभूमी ही शेतकरी, कामगार तसेच कष्टकरी समाजाच्या हक्कासाठी नेहमी असायची. श्रीपाद अृमत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी मुंबईत कामगार चळवळीच्या माध्यमातून राजकारण करीत लोकसभेत पाऊल टाकले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सातारा आणि बीडमधून लोकसभेवर प्रतिनिधित्व केले होते. ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी या ज्येष्ठ समाजवादी मंडळींनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते. सध्याच्या पालघर आणि पूर्वीचा डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दबदबा होता. लहानू कोम यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले.रायगड लोकसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला होता. गेल्या पंधरा निवडणुकांमध्ये आघाडीवरचा पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. दि. बा. पाटील यांच्यासह अनेकांनी तेथून प्रतिनिधित्व केले. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या विरोधातील निवडणुका गाजल्या आहेत. कोकणात पूर्वीचा राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्लाच होता. बॅ. नाथ पै आणि मधू दंडवते यांनी सलग दहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मराठवाड्यातही शेकापचा परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, आदी मतदारसंघांत दबदबा होता. विदर्भात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबूवंतराव धोटे नागपूरमधून एकदा निवडून आले होते. वर्ध्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घृंगारे यांनी अनेक वेळा लढत दिली. एकदा त्यांनी वसंत साठे यांचा पराभवही केला होता.या निवडणुकीत माकपतर्फे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून आमदार के. सी. पडवी निवडणूक लढवित आहेत. हा अपवाद वगळता एकाही मतदारसंघातून समाजवादी किंवा डाव्या चळवळीतील उमेदवार नाहीत.वंचित आघाडी व शेट्टीयुती आणि आघाडी वगळता अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित विकास आघाडीत काही उमेदवार विविध चळवळीशी संबंधित आहेत. स्वत: आंबेडकर अकोला आणि सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत.याउलट रिपब्लिकन पक्षांच्या एकाही गटाला युती किंवा आघाडीने उमेदवारी दिलेली नाही. शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व राजू शेट्टी यांचा एकमेव अपवाद आहे, अन्यथा कोणत्याही चळवळी किंवा संघटनेचे प्रतिनिधी शर्यतीत नाहीत.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, क्रांतिसिंह नाना पाटील, आपल्या अभ्यासू संसदीय कार्याने गाजलेले प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै, शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील, केशवराव धोंडगे, समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, प्रमिलाताई दंडवते, भाई उद्धवराव पाटील, प्रा. मधू दंडवते, बापू काळदाते, रामचंद्र श्रृंगारे, श्यामराव परुळेकर, लहानू कोम, आनंदराव चव्हाण, डॉ. दत्ता सामंत, अहिल्याबाई रांगणेकर, भाऊराव गायकवाड आदी दिग्गज महाराष्ट्रातून निवडून येत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक