शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

कचरा तेथेच, ड्रेनेज कोठे, पार्किंग जेथे तेथे !

By admin | Updated: March 19, 2015 00:03 IST

कसबा बावडा : मुख्य रस्त्यावर उभा मी, जीव मुठीत घेऊन मी ! --लोकमत आपल्या दारी

संतोष पाटील / रमेश पाटील ल्ल कोल्हापूरमुबलक पाणी आहे, तर ड्रेनेजची व्यवस्था नाही. रस्ते आहेत; पण पार्किंगचा फज्जा उडाला आहे. सुपीक जमीन तर सांडपाण्यामुळे नापीक होऊ लागली आहे. शहरातील सर्व कचरा बावड्यात येतो. मात्र, विल्हेवाटीची यंत्रणाच नाही. ‘मनपा’च्या मोठ्या चार शाळा असूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, अशा अनेक समस्या अस्सल ग्रामीणबाज असलेल्या कसबा बावडा परिसरातील नागरिकांनी बुधवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाच्या व्यासपीठावर मांडल्या.राजर्षी शाहू विद्यामंदिर ( शाळा क्रमांक - ११) च्या पटांगणावर ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, महानगर वृत्तपत्र संघटनेचे संघटक शंकर चेचर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, मुख्य प्रतिनिधी विश्वास पाटील, भारत माने, राजाराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन हरिष चौगले, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक जयसिंग ठाणेकर, कसबा बावडा व्यापारी पतसंस्थेचे संचालक सचिन पाटील, शाहू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, शिक्षिका स्मिता वरेकर, सुजाता आवटी व शीतल घराळ, आदी उपस्थित होते.शहरातील सर्वांत वेगाने व विस्तारणारे उपनगर म्हणून कसबा बावडा परिसराची ओळख आहे. जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालये बावड्याच्या वेशीवर आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजाराम साखर कारखाना, शिरोली औद्योगिक वसाहत यामुळे बावड्यातील मुख्य रस्ता नेहमीच गजबलेला असतो. त्यातच पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. वाहतुकीच्या समस्येमुळेच गेल्या महिन्याभरात दोन व्यक्ती अपघात ठार झाल्या आहेत. लहान-मोठे अपघात हे तर बावडेकरांच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. शहरातील सर्व मैला बावड्यातील सांडपाणी केंद्रात आणला जातो. मात्र, बावड्यात ड्रेनेज लाईनच नाही. नियमित स्वच्छता न केल्याने डासांचे साम्राज्य आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहेच नाहीत. अनियमित व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो, अशा अनेक तक्रारींचा पाढा परिसरातील नागरिकांनी या व्यासपीठावर मांडला.समस्या सम-विषम तारखेस पार्किंग करणे, अतिक्रमण हटवून रस्ता रिकामा करणे, तीन महत्त्वाच्या ठिकाणी रिक्षा स्टॉपसाठी जागा उपलब्ध करणे, पदपथ पूर्ण झालेली नाहीत, तर काही ठिकाणच्या पदपथावर दुकाने थाटलेली आहेत. सणावेळी तर मुख्य रस्त्यावरच व्यापार थाटला जातो. या प्रशासकीय स्तरावर सहज सोडविण्यासारख्या समस्या आहेत. त्याचे प्रशासनाने निराकरण करण्याची मागणी बहुतांश नागरिकांनी यावेळी केली.‘लोकमत’ने परिसरातील समस्या मांडण्यासाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. या व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी न करता समस्या मांडून त्याची सोडवणूक होणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. रहिवाशांनी या ठिकाणी उपस्थित राहून समस्या मांडाव्यात.शेती नापीकचा धोकासांडपाणी प्रक्रिया केंद्रातून दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. परिसरातील शेतातून वाहणाऱ्या या पाण्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात नापीक होत आहे. - हरिष चौगलेपाणंदींची अवस्था बिकटबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. गावठाणातील रस्ते पूर्ण झाले असले तरी शेतातील पाणंदींची अवस्था बिकट आहे. - हरिबा रणदिवेवाहतूक धोकादायकरस्त्यावरील वाढलेल्या व अवास्तव रहदारीमुळे जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो. - मालूबाई चौगलेरिक्षा स्टॉपसाठी जागा हवीमुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी रिक्षांना स्टॉप आहेत. रिक्षांसाठी हक्काची जागा नसल्याने ती उपलब्ध व्हावी. - शिवाजी चव्हाणसंरक्षण कठडे हवेतराजर्षी शाहू विद्यामंदिराभोवती संरक्षक कठडे उभे करावेत. जेणेकरून शाळेचे पटांगण सुरक्षित राहील. - सुनील पोवारस्पीड बे्रकर हवेतप्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर स्पीड ब्रेकर करावेत. - रघुनाथ चौगलेपदपथाचा वापर हवापादचारी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. नागरिकांनी चालण्यासाठी पदपथाचा वापर करावा. - सुहास चौगलेगटारी सफाई व्हावीमुख्य गटारींची दररोज सफाई होत नाही. दुर्गंधी पसरते. - नामदेव जाधववुडन कोर्ट करावेपॅव्हेलियन बॅडमिंटन हॉलची नियमित स्वच्छता केली जात नाही. पालिके ने वुडन कोर्ट करावे. - प्रणव आळवेकरपदपथावर अतिक्रमणपदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पदपथ रिकामे करून पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करावेत. - एस. डी. कोरवीविद्युत खांब बदलाचौगले गल्ली रस्त्याच्या मध्येच असणारे जुने विद्युत खांब बदलून नवीन जागेत स्थलांतरित करावेत. - पी. के. पाटीलस्टॉपसाठी जागा द्यारिक्षा स्टॉपसाठी मुख्य रस्त्यावर स्वतंत्र जागा मिळावी.- पांडुरंग जाधव