शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सरकारपुढे घासून घासून उध्दव यांना नाक कुठे राहिलेय : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:21 IST

उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा लढविणार शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकणार संपूर्ण महाराष्ट्रच माझा बालेकिल्ला मी नेहमीच जनतेसोबत

कोल्हापूर : उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापूरातून सुरु झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, अशी थेट टीका राणे यांनी उध्दव यांच्यावर केली. सत्तेत रहायचे आणि पंतप्रधानापासून मु्ख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची. आता केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरच टीका करायची बाकी आहे. इतकेच नाराज आहात तर बाहेर का पडत नाही असा सवाल करत राणे म्हणाले, उध्दव सत्तेतून बाहेर पडले, तर त्यांचे दुकान बंद पडेल, अशी खोचक टीका केली.कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहाही जागा शून्यावर आणीन, असे सांगतानाच राणे यांनी शिवसेनेचे नामोनिशाण राहणार नाही, पण शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे नुकसान करणार नाही. त्यांची आमदारकी त्यांना मिळेल, फक्त ती कोणत्या पक्षाची असेल, हे तुमचे तुम्हीच ओळखा, असेही राणे म्हणाले.केवळ सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे. मी मुख्यमंत्री असताना जे चांगले निर्णय घेतले, त्या बळावरच जनता मला पाठिंबा देत आहे. कोल्हापूरच नव्हे तर गडचिरोलीतही माझी जादू चालते, अशा शब्दात नारायण राणे यांनी विरोधकांना टोला लगावला. सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षात काय फरक राहिला असा सवालही त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.पक्षात आता घेउन नीतेश आणि नीलेश या दोन्ही मुलांची कारकीर्द मी संपविणार नाही. त्यांचा राजीनामा हा त्यांचे नुकसान करणारा ठरेल. कारकीर्द पूर्ण झाली की ते पक्षात येतील असे सांगत राणे यांनी मंत्रीपदाबद्दल थोडी वाट पहा असे भाष्य केले.सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हावी बाळासाहेबांवर टीका केली नव्हती, असे सांगितले.गुजरातमध्ये भाजप सरकारला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत असतानाच सध्या भाजपविरोधात नाराजी आहे, मग तुमचे धोरण काय असणार, असे पत्रकारांनी विचारताच जर जनता भाजपच्या विरोधात असेल तर आम्ही जनतेसोबत असू, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे kolhapurकोल्हापूर