शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सरकारपुढे घासून घासून उध्दव यांना नाक कुठे राहिलेय : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:21 IST

उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा लढविणार शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकणार संपूर्ण महाराष्ट्रच माझा बालेकिल्ला मी नेहमीच जनतेसोबत

कोल्हापूर : उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापूरातून सुरु झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, अशी थेट टीका राणे यांनी उध्दव यांच्यावर केली. सत्तेत रहायचे आणि पंतप्रधानापासून मु्ख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची. आता केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरच टीका करायची बाकी आहे. इतकेच नाराज आहात तर बाहेर का पडत नाही असा सवाल करत राणे म्हणाले, उध्दव सत्तेतून बाहेर पडले, तर त्यांचे दुकान बंद पडेल, अशी खोचक टीका केली.कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहाही जागा शून्यावर आणीन, असे सांगतानाच राणे यांनी शिवसेनेचे नामोनिशाण राहणार नाही, पण शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे नुकसान करणार नाही. त्यांची आमदारकी त्यांना मिळेल, फक्त ती कोणत्या पक्षाची असेल, हे तुमचे तुम्हीच ओळखा, असेही राणे म्हणाले.केवळ सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे. मी मुख्यमंत्री असताना जे चांगले निर्णय घेतले, त्या बळावरच जनता मला पाठिंबा देत आहे. कोल्हापूरच नव्हे तर गडचिरोलीतही माझी जादू चालते, अशा शब्दात नारायण राणे यांनी विरोधकांना टोला लगावला. सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षात काय फरक राहिला असा सवालही त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.पक्षात आता घेउन नीतेश आणि नीलेश या दोन्ही मुलांची कारकीर्द मी संपविणार नाही. त्यांचा राजीनामा हा त्यांचे नुकसान करणारा ठरेल. कारकीर्द पूर्ण झाली की ते पक्षात येतील असे सांगत राणे यांनी मंत्रीपदाबद्दल थोडी वाट पहा असे भाष्य केले.सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हावी बाळासाहेबांवर टीका केली नव्हती, असे सांगितले.गुजरातमध्ये भाजप सरकारला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत असतानाच सध्या भाजपविरोधात नाराजी आहे, मग तुमचे धोरण काय असणार, असे पत्रकारांनी विचारताच जर जनता भाजपच्या विरोधात असेल तर आम्ही जनतेसोबत असू, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे kolhapurकोल्हापूर