शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

‘दक्षिण’च्या आमदारांना भेटायचे कुठे ?

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

सतेज पाटील : अमल महाडिकांवर टीका, पालकमंत्र्यांनी गरिबांची पेन्शन बंद केली

कोल्हापूर : पेन्शन बंद झाल्यामुळे शिरोलीतील घरात जाऊन भेटायला गरिबांकडे बसच्या तिकिटाला पैसेही नाहीत; त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदारांना भेटायचे कसे आणि कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे त्यांना मते टाकणाऱ्यांना आता पश्चात्ताप होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नामोल्लेख टाळत आमदार अमल महाडिक यांच्यावर मंगळवारी केली. आम्ही लाभार्थ्यांना पेन्शन सुरू केली, हे खुपत असल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ‘बोगस’ या नावाखाली पेन्शन बंद करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विविध योजनांमधील पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाप्रसंगी ताराबाई पार्कातील बालाजी गार्डनमध्ये ते बोलत होते. शुक्रवारी (दि. १८) शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात आमदार महादेवराव महाडिक यांनी नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटील यांनी आमदार अमल यांच्यावर ‘निशाणा’ साधला.पाटील म्हणाले, चार दिवसांपूर्वी जोतिबाला अभिषेकासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मतदारसंघातील एका अनोळखी मतदाराने माझी भेट घेतली. ‘साहेब, आमचे चुकले, त्यांना मत दिले, आता पश्चात्ताप होत आहे, असे सांगितले. माझे शहरात ‘अजिंक्यतारा’ येथे कार्यालय आहे. तेथे सर्वसामान्य येऊ शकतात. त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था होते. आताच्या ‘दक्षिणे’च्या आमदारांना भेटायचे कोठे, असा प्रश्न आहे. ‘दक्षिणे’त भाजपचे कार्यकर्ते फिरत आहेत. ‘बंटी पाटील’ असे दारावर स्टिकर असलेल्या कुटुंबाची ‘संजय गांधी निराधार योजने’ची पेन्शन बंद केली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा दहा हजार बोगस पेन्शनचे लाभार्थी असल्याचे सांगत आहेत. सत्तेची मस्ती आली आहे, म्हणून रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे, असेही पाटील यांनी सांगीतले.पैसे देऊन झाले आमदारपेन्शन बंद झाली आहे म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्या कार्यकर्त्याने ‘निवडणुकीत पैसे दिले आहेत; त्यामुळे पाच वर्षे आमच्याकडे यायचे नाही,’ असे सांगितल्याचे लाभार्थी शकुंतला चौगुले (रा. निगवे खालसा) यांनी पाटील यांचे भाषण सुरू असताना मध्येच उठून सांगितले. हा संदर्भ घेऊन पाटील म्हणाले, ‘दक्षिण’मधील निवडणूक कशी जिंकली हे यातून स्पष्ट झाले आहे. पैसे वाटून ते आमदार झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटून काम सांगितले तर ‘तुम्ही निवडणुकीत पैसे घेतले आहेत. पाच वर्षे यायचे नाही,’ अशी उत्तरे ते देत आहेत.