शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘दक्षिण’च्या आमदारांना भेटायचे कुठे ?

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

सतेज पाटील : अमल महाडिकांवर टीका, पालकमंत्र्यांनी गरिबांची पेन्शन बंद केली

कोल्हापूर : पेन्शन बंद झाल्यामुळे शिरोलीतील घरात जाऊन भेटायला गरिबांकडे बसच्या तिकिटाला पैसेही नाहीत; त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदारांना भेटायचे कसे आणि कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे त्यांना मते टाकणाऱ्यांना आता पश्चात्ताप होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नामोल्लेख टाळत आमदार अमल महाडिक यांच्यावर मंगळवारी केली. आम्ही लाभार्थ्यांना पेन्शन सुरू केली, हे खुपत असल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ‘बोगस’ या नावाखाली पेन्शन बंद करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विविध योजनांमधील पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाप्रसंगी ताराबाई पार्कातील बालाजी गार्डनमध्ये ते बोलत होते. शुक्रवारी (दि. १८) शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात आमदार महादेवराव महाडिक यांनी नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटील यांनी आमदार अमल यांच्यावर ‘निशाणा’ साधला.पाटील म्हणाले, चार दिवसांपूर्वी जोतिबाला अभिषेकासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मतदारसंघातील एका अनोळखी मतदाराने माझी भेट घेतली. ‘साहेब, आमचे चुकले, त्यांना मत दिले, आता पश्चात्ताप होत आहे, असे सांगितले. माझे शहरात ‘अजिंक्यतारा’ येथे कार्यालय आहे. तेथे सर्वसामान्य येऊ शकतात. त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था होते. आताच्या ‘दक्षिणे’च्या आमदारांना भेटायचे कोठे, असा प्रश्न आहे. ‘दक्षिणे’त भाजपचे कार्यकर्ते फिरत आहेत. ‘बंटी पाटील’ असे दारावर स्टिकर असलेल्या कुटुंबाची ‘संजय गांधी निराधार योजने’ची पेन्शन बंद केली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा दहा हजार बोगस पेन्शनचे लाभार्थी असल्याचे सांगत आहेत. सत्तेची मस्ती आली आहे, म्हणून रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे, असेही पाटील यांनी सांगीतले.पैसे देऊन झाले आमदारपेन्शन बंद झाली आहे म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्या कार्यकर्त्याने ‘निवडणुकीत पैसे दिले आहेत; त्यामुळे पाच वर्षे आमच्याकडे यायचे नाही,’ असे सांगितल्याचे लाभार्थी शकुंतला चौगुले (रा. निगवे खालसा) यांनी पाटील यांचे भाषण सुरू असताना मध्येच उठून सांगितले. हा संदर्भ घेऊन पाटील म्हणाले, ‘दक्षिण’मधील निवडणूक कशी जिंकली हे यातून स्पष्ट झाले आहे. पैसे वाटून ते आमदार झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटून काम सांगितले तर ‘तुम्ही निवडणुकीत पैसे घेतले आहेत. पाच वर्षे यायचे नाही,’ अशी उत्तरे ते देत आहेत.