शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘दक्षिण’च्या आमदारांना भेटायचे कुठे ?

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

सतेज पाटील : अमल महाडिकांवर टीका, पालकमंत्र्यांनी गरिबांची पेन्शन बंद केली

कोल्हापूर : पेन्शन बंद झाल्यामुळे शिरोलीतील घरात जाऊन भेटायला गरिबांकडे बसच्या तिकिटाला पैसेही नाहीत; त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदारांना भेटायचे कसे आणि कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे त्यांना मते टाकणाऱ्यांना आता पश्चात्ताप होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नामोल्लेख टाळत आमदार अमल महाडिक यांच्यावर मंगळवारी केली. आम्ही लाभार्थ्यांना पेन्शन सुरू केली, हे खुपत असल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ‘बोगस’ या नावाखाली पेन्शन बंद करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विविध योजनांमधील पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाप्रसंगी ताराबाई पार्कातील बालाजी गार्डनमध्ये ते बोलत होते. शुक्रवारी (दि. १८) शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात आमदार महादेवराव महाडिक यांनी नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटील यांनी आमदार अमल यांच्यावर ‘निशाणा’ साधला.पाटील म्हणाले, चार दिवसांपूर्वी जोतिबाला अभिषेकासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मतदारसंघातील एका अनोळखी मतदाराने माझी भेट घेतली. ‘साहेब, आमचे चुकले, त्यांना मत दिले, आता पश्चात्ताप होत आहे, असे सांगितले. माझे शहरात ‘अजिंक्यतारा’ येथे कार्यालय आहे. तेथे सर्वसामान्य येऊ शकतात. त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था होते. आताच्या ‘दक्षिणे’च्या आमदारांना भेटायचे कोठे, असा प्रश्न आहे. ‘दक्षिणे’त भाजपचे कार्यकर्ते फिरत आहेत. ‘बंटी पाटील’ असे दारावर स्टिकर असलेल्या कुटुंबाची ‘संजय गांधी निराधार योजने’ची पेन्शन बंद केली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा दहा हजार बोगस पेन्शनचे लाभार्थी असल्याचे सांगत आहेत. सत्तेची मस्ती आली आहे, म्हणून रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे, असेही पाटील यांनी सांगीतले.पैसे देऊन झाले आमदारपेन्शन बंद झाली आहे म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्या कार्यकर्त्याने ‘निवडणुकीत पैसे दिले आहेत; त्यामुळे पाच वर्षे आमच्याकडे यायचे नाही,’ असे सांगितल्याचे लाभार्थी शकुंतला चौगुले (रा. निगवे खालसा) यांनी पाटील यांचे भाषण सुरू असताना मध्येच उठून सांगितले. हा संदर्भ घेऊन पाटील म्हणाले, ‘दक्षिण’मधील निवडणूक कशी जिंकली हे यातून स्पष्ट झाले आहे. पैसे वाटून ते आमदार झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटून काम सांगितले तर ‘तुम्ही निवडणुकीत पैसे घेतले आहेत. पाच वर्षे यायचे नाही,’ अशी उत्तरे ते देत आहेत.