शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

गाडी लावायची तरी कुठे? दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:12 IST

चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या तेथे मोटारसायकल लावण्यासही जागा नाही अशी स्थिती आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहने याचा हा परिणाम आहे. पूर्वी ...

चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या तेथे मोटारसायकल लावण्यासही जागा नाही अशी स्थिती आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहने याचा हा परिणाम आहे. पूर्वी गल्लीत एखाद-दुसरे चारचाकी वाहन, काही रिक्षा आणि मोजक्याच दुचाकी होत्या. आता प्रत्येकाच्या घरात दोन-तीन मोटारसायकली आहेतच.

दिवसा या मोटारसायकली कामानिमित्त बाहेर जात असल्या तरी रात्री त्या रस्त्यावरच लावल्या जातात. कारण गावभागातील जुनी गल्ली त्यामुळे घरेही छोटी आणि रस्ताही अरुंदच. गाड्या लावायला जागाच नाही. त्यामुळे सगळ््या गाड्या रस्त्यावरच. या गल्लीत सध्या एखादे चारचाकी वाहनही आत येऊ शकत नाही. रुग्ण, वृद्ध आणि अपंग यांना त्या गल्लीतील एखाद्या घरात जायचे असेल तर मोठी अडचण आहे.

रुग्ण असेल तर गल्लीतून बाहेरच्या रस्त्याला नेल्याशिवाय त्याला रुग्णवाहिकेत घालता येत नाही, अशी ‘भयानक’ परिस्थिती आहे. हे इचलकरंजीतील उदाहरण बहुतांशी शहरांमध्ये असलेल्या जुन्या गल्ल्यांमध्ये लागू पडते. कोल्हापुरातही तीच परिस्थिती आहे. पेठा असोत की उपनगरे रात्री रस्त्यावर वाहने पार्किंग केलेली असतात. अपवाद फक्त अपार्टमेंटस् किंवा मोठ्या बंगल्यांचा. बाजारपेठांतील रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्नदेखील गंभीरच आहे.

बऱ्याचवेळेला गाड्या कुठे लावायच्या हे बाहेर गावच्या वाहनचालकांना माहीत नसते. कोल्हापूरचा असला तरी दोन मिनिटांचे काम आहे म्हणून तो रस्त्यावरच वाहन लावून जातो. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. वाहतूक पोलीस अशा वाहनांवर कारवाई करतात, पण ते तरी कुठे-कुठे एकाचवेळी जाणार. शिवाय यावरून वाहतूक पोलीस आणि संबंधित वाहनचालक-मालक यांच्यात वादावादीचे प्रसंगही घडतात. शहरातील वाहनांची संख्या दररोज वाढतेच आहे. दुचाकी चालवणाºया अल्पवयीन मुलांच्या पालकांना दंड आणि शिक्षा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी पोलिसांनी सध्या चालू केली आहे. दररोज अशा कारवाईच्या बातम्या येत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र, काही दिवस ही मोहीम राबवून थांबवू नये, अन्यथा पुन्हा पूर्वीसारखे ‘ये रे माझ्या मागल्या...’ चालू होते.

पार्किंगच्या प्रश्नावरही अशीच उपाययोजना करायला हवी. यासाठी ठिकठिकाणी वाहनतळांची सोय करणे गरजेचे आहे. कोल्हापूर हे पर्यटनस्थळ आहे. दररोज हजारो पर्यटक शहरात येत असतात. त्यांच्या वाहनांसाठी अंबाबाई मंदिराजवळील वाहनतळ सोडता अन्यत्र व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. बहुमजली पार्किंगतळाचा पर्यायही विचारात घेण्यासारखा आहे.

पुण्यात गेल्या आठवड्यात पे अँड पार्किंगचा विषय बराच गाजला. शहरातील सर्वच रस्त्यांवर दिवसा आणि रात्री वाहने लावल्यास शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. हे समजताच पुणेकरातून प्रचंड विरोध झाला. विविध संघटनांनी महापालिकेच्या सभेवेळी महापालिकेला घेरावही घातला. अखेर महापालिकेने शहरातील केवळ पाच प्रमुख रस्त्यांवर २४ तास पे अँड पार्किंग केले आहे.

हे धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. विकसित राष्ट्रांत पार्किंगचा प्रश्न इतका गंभीर असल्याचे दिसत नाही. कारण तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्कृष्ट असते. शिवाय खासगी वाहने पार्किंग केल्यास आकारले जाणारे शुल्कही जास्त असते. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी शुल्क द्यायला प्रथम विरोध होतो. हे खरे असले तरी सोयी हव्या असतील तर शुल्क द्यावेच लागेल आणि त्यातूनच व्यवस्था उभी करता येऊ शकेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी