शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

आंबेओहोळचे दोनशे कोटी रुपये गेले कोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

उत्तूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या करकीर्दीत आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २२७ कोटींहून अधिक निधी ...

उत्तूर :

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या करकीर्दीत आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २२७ कोटींहून अधिक निधी पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींचे प्रश्न, सोयी-सुविधा, जमिनीचे वाटप व मोबदला यासाठी मंजूर केलेला होता, तरीही अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मग हे सव्वादोनशे कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न भाजपा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

प्रकल्पाच्या पुनर्वसनप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी घाटगे यांनी केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत हे धरण पूर्ण झाले पाहिजे, आमची ही मागणी पहिल्यापासून आहे. आधी पुनर्वसन नंतर धरण असा कायदा आहे. तो मोडून धरणग्रस्तांना विश्वासात न घेता आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम स्थानिक प्रशासनावर दबाव टाकून पोलीस बंदोबस्तात सुरू आहे.

कोणतेही राजकीय वळण न देता गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या या धरणाच्या पूर्ततेसाठी सरकारने आता तातडीने लक्ष घातले पाहिजे.

प्रकल्प पूर्ण होण्याआधी धरणग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन करणे हेही तितकेच गरजेचे आहे. पुनर्वसनाचा प्रश्न ३१ जानेवारीअखेर पूर्ण सोडवण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले होते. त्याला शासनाकडूनच तिलांजली देऊन पुनर्वसनाचे काम अपूर्ण असताना घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. केवळ श्रेयवादासाठी एका मंत्र्यांच्या दबावाखाली प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे, असे वाटते. एका बाजूला म्हटले जाते पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि दुसऱ्या बाजूला दडपशाहीने घळभरणीचे काम सुरू केले जात आहे, हा काय प्रकार आहे? त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावल्या आहेत व शासनाच्या विरोधात धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

------------------------

*

मंत्र्यांची श्रेयवादासाठी घळभरणी

विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याआधीच घळभरणीच्या कामाची घाई करताहेत, हे अन्यायकारक आहे. हा प्रश्न त्यांच्यांमुळेच आणखी चिघळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी पुनर्वसनासह प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, अशी मागणीही घाटगे यांनी केली आहे.

दोनशे कोटींचा अजूनही हिशेब नाही

मागील सरकारने दोनशे कोटी पुनर्वसनासाठी दिले होते. त्याचे नेमके काय केले ? याचे साधे उत्तर मंत्री महोदय, पुनर्वसन विभाग देत नाही, ही बाब गंभीर आहे. त्याचा खुलासा करावा.