शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

‘हाय वे’वरचा बचत गटांचा मॉल होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:44 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी ‘हाय वे’वर मॉल उभारण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी ‘हाय वे’वर मॉल उभारण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील गेली तीन वर्षे करत आहेत. मात्र, दुसरीकडे चार कोटी रुपये खर्चून बांधलेली सात तालुका विक्री केंद्रे अजूनही बंदच आहेत. विक्री केंद्रे बांधून पाच वर्षे झाली तरी किरकोळ कामांसाठी ती सुरू झालेली नाहीत. जी सुरू झाली तिथे महिला बचत गटांचा प्रतिसाद नाही.कागल येथील केंद्राचे काम १६ आॅगस्ट २०१३ रोजी पूर्ण झाले आहे. अजून किरकोळ कामे राहिली असून, त्यासाठी निधी न मिळाल्याने अजून हे केंद्र बंद आहे. हातकणंगलेत ५० लाख खर्च झाले असून, कामे अपूर्ण आहेत. इमारत उघडली गेलेली नाही. गडहिंग्लजला ४४ लाख रुपये खर्च झाले. कामे अपूर्ण आहेत; पण विक्री केंद्र बंदच आहे. पन्हाळा तालुक्याचे केंद्र बाजारभोगाव येथे बांधण्यात आले असून, तेथेही विक्री सुरू नाही. आजऱ्यातही ५० लाख खर्चूनही इमारत बंद आहे. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे ६ फेबु्रवारी २०१४ साली काम पूर्ण झाले; पण तेथेही विक्री सुरू नाही. गगनबावड्याचीही कामे अपूर्ण असून, तेथेही इमारत बंद आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, जागा नसल्याने २८ आॅगस्ट २०१४ ला ते पैसे परत पाठवण्यात आले. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे केंद्र उभारण्यासाठी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर आणि शाहूवाडी या तालुक्यांमध्ये विक्री केंद्रे उभारण्यासाठी जागा नसल्याने प्रस्ताव रद्द झाले. असे असताना पालकमंत्री पाटील हे वारंवार हाय वेवर मॉल बांधण्याची घोषणा करत आहेत; परंतु जागा पाहणीव्यतिरिक्त हा मुद्दा एक पाऊलही पुढे गेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला; पण...पालकमंत्री पाटील यांनी शासकीय चौकटीत निधी लवकर मिळत नसल्याने अन्य मार्गांनी मदत करत आजरा आणि गडहिंग्लज येथील विक्री केंद्रांची कामे पूर्ण करून घेतली तरीही या दोन्ही केंद्रांना अजूनही कुलपेच आहेत.दोनदा उद्घाटन झाले; परंतु...आजºयाच्या विक्री केंद्राचे तर दोनवेळा उद्घाटन झाले. सुरुवातीला काही दिवस महिला आपल्या बचत गटांची उत्पादने घेऊन विक्रीसाठी बसल्या; परंतु ग्राहकांअभावी नंतर ही विक्री बंद पडली.पंचायत समिती आवार ठरले असते फायदेशीरपंचायत समितीच्या आवारात या बचत गटांना चार-पाच गाळे काढून दिले असते आणि ते विविध गटांना ठराविक दिवस दिले असते तर वस्तूंची चांगली विक्री झाली असती; परंतु वस्तुस्थितीची माहिती न घेता केलेले नियोजन कोट्यवधी रुपये खर्चूनही अजून प्रत्यक्षात उतरलेले नाही हे दुर्दैवी आहे.धोरणच चुकीचेग्रामीण भागातील महिला वर्षभर उत्पादने घेऊन विक्रीसाठी बसू शकत नाहीत. पावसाळ्यात, सुगीमध्ये त्यांचे शेतीकामाला प्राधान्य असते; परंतु एखाद्या मॉलसारखी रोज येथून विक्री होईल, असे गृहीत धरून बांधलेल्या या इमारती निरूपयोगी ठरल्या आहेत. मुळात यातील अनेक जागा अशा आहेत की, ग्राहक या ठिकाणी फारसे येत नाहीत.