शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

‘हाय वे’वरचा बचत गटांचा मॉल होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:44 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी ‘हाय वे’वर मॉल उभारण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी ‘हाय वे’वर मॉल उभारण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील गेली तीन वर्षे करत आहेत. मात्र, दुसरीकडे चार कोटी रुपये खर्चून बांधलेली सात तालुका विक्री केंद्रे अजूनही बंदच आहेत. विक्री केंद्रे बांधून पाच वर्षे झाली तरी किरकोळ कामांसाठी ती सुरू झालेली नाहीत. जी सुरू झाली तिथे महिला बचत गटांचा प्रतिसाद नाही.कागल येथील केंद्राचे काम १६ आॅगस्ट २०१३ रोजी पूर्ण झाले आहे. अजून किरकोळ कामे राहिली असून, त्यासाठी निधी न मिळाल्याने अजून हे केंद्र बंद आहे. हातकणंगलेत ५० लाख खर्च झाले असून, कामे अपूर्ण आहेत. इमारत उघडली गेलेली नाही. गडहिंग्लजला ४४ लाख रुपये खर्च झाले. कामे अपूर्ण आहेत; पण विक्री केंद्र बंदच आहे. पन्हाळा तालुक्याचे केंद्र बाजारभोगाव येथे बांधण्यात आले असून, तेथेही विक्री सुरू नाही. आजऱ्यातही ५० लाख खर्चूनही इमारत बंद आहे. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे ६ फेबु्रवारी २०१४ साली काम पूर्ण झाले; पण तेथेही विक्री सुरू नाही. गगनबावड्याचीही कामे अपूर्ण असून, तेथेही इमारत बंद आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, जागा नसल्याने २८ आॅगस्ट २०१४ ला ते पैसे परत पाठवण्यात आले. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे केंद्र उभारण्यासाठी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर आणि शाहूवाडी या तालुक्यांमध्ये विक्री केंद्रे उभारण्यासाठी जागा नसल्याने प्रस्ताव रद्द झाले. असे असताना पालकमंत्री पाटील हे वारंवार हाय वेवर मॉल बांधण्याची घोषणा करत आहेत; परंतु जागा पाहणीव्यतिरिक्त हा मुद्दा एक पाऊलही पुढे गेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला; पण...पालकमंत्री पाटील यांनी शासकीय चौकटीत निधी लवकर मिळत नसल्याने अन्य मार्गांनी मदत करत आजरा आणि गडहिंग्लज येथील विक्री केंद्रांची कामे पूर्ण करून घेतली तरीही या दोन्ही केंद्रांना अजूनही कुलपेच आहेत.दोनदा उद्घाटन झाले; परंतु...आजºयाच्या विक्री केंद्राचे तर दोनवेळा उद्घाटन झाले. सुरुवातीला काही दिवस महिला आपल्या बचत गटांची उत्पादने घेऊन विक्रीसाठी बसल्या; परंतु ग्राहकांअभावी नंतर ही विक्री बंद पडली.पंचायत समिती आवार ठरले असते फायदेशीरपंचायत समितीच्या आवारात या बचत गटांना चार-पाच गाळे काढून दिले असते आणि ते विविध गटांना ठराविक दिवस दिले असते तर वस्तूंची चांगली विक्री झाली असती; परंतु वस्तुस्थितीची माहिती न घेता केलेले नियोजन कोट्यवधी रुपये खर्चूनही अजून प्रत्यक्षात उतरलेले नाही हे दुर्दैवी आहे.धोरणच चुकीचेग्रामीण भागातील महिला वर्षभर उत्पादने घेऊन विक्रीसाठी बसू शकत नाहीत. पावसाळ्यात, सुगीमध्ये त्यांचे शेतीकामाला प्राधान्य असते; परंतु एखाद्या मॉलसारखी रोज येथून विक्री होईल, असे गृहीत धरून बांधलेल्या या इमारती निरूपयोगी ठरल्या आहेत. मुळात यातील अनेक जागा अशा आहेत की, ग्राहक या ठिकाणी फारसे येत नाहीत.