शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

वाचन समाजासाठी अत्यावश्यक गरज कधी होणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

मुरगूड : समाजात वाचनाविषयीची अनास्था दूर होऊन ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक गरज कधी ...

मुरगूड : समाजात वाचनाविषयीची अनास्था दूर होऊन ती आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक गरज कधी ठरणार, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक जीवन साळोखे यांनी उपस्थित केला. जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. घराघरात सर्व जण एकत्र बसून टीव्ही बघत बसतात, तसे काही काळ सर्वजण पुस्तकांचे वाचन करतील तो दिवस खऱ्या अर्थाने पुस्तक दिन ठरेल, वाचन प्रेरणा दिन ठरेल, अशी अपेक्षाही साळोखे यांनी यावेळी व्यक्त केली. वाचन संस्कृती वाढण्यासाठी, वाचक संस्था विस्तारण्यासाठी गेली १५-१६ वर्षे ते एकहाती ग्रंथदान हा उपक्रम प्रत्यक्षात राबवत असून जिल्ह्यातील अनेक शाळा-महाविद्यालये, वाचनालये, सहकारी शिक्षक, पत्रकार, विद्यार्थ्यांना व मान्यवरांना ते पुस्तके भेट देत आले आहेत. सुमारे ९ हजार पुस्तके त्यांनी या काळात वाटली आहेत.

साळोखे म्हणाले, वाचनाचे, पुस्तकांचे महत्त्व नव्याने सांगण्याची वेळ सध्या आली आहे.

आपल्या भाषेतील उत्तमोत्तम, वाचनीय पुस्तकांकडे पाठ फिरवणे, वृत्तपत्रापलिकडे काही पूरक वाचन करण्याचा कंटाळा करणे यातच आपल्याकडील सुशिक्षित व नोकरीत असणारा मोठा वर्ग धन्यता मानतो. वाचन करणे म्हणजे वेळेची नासाडी करणे, वेळेचा दुरुपयोग आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या शरीराबरोबरच मनाचे, बुद्धीचे, भावनांचे भरण-पोषण होणे तेवढेच आवश्यक आहे, हे आपण का पटवून घेत नाही, असे ही ते म्हणाले.

एका बाजूस सध्याचे युग हे तीव्र स्पर्धेचे, माहिती व तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असणारे युग आहे, असे सर्रास म्हटले जाते. तरीही वाचनाची, पुस्तकांची घोर उपेक्षा सर्वत्र केली जाते, हे चित्र समाजाच्या भल्याचे नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वाचन संस्कृती योग्यरित्या रुजविल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच ग्रंथदान व पुस्तक भेटीसारखे उपक्रम प्रत्येक वाचनप्रेमी व ग्रंथप्रेमींनी राबवले पाहिजेत, त्यातच जागतिक पुस्तक दिनासारख्या कार्यक्रमांचे यश आहे, असेही साळोखे शेवटी म्हणाले.