शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

उपनगरांत नालेसफाईची कामे कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

अमर पाटील : कळंबा हवामान खात्याने यंदा पावसाळा लवकर सुरू होऊन गतवर्षीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

अमर पाटील : कळंबा

हवामान खात्याने यंदा पावसाळा लवकर सुरू होऊन गतवर्षीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उपनगरांत मान्सूनपूर्व केली जाणारी नालेसफाई, स्वच्छतागृहे दुरुस्ती, खड्डे पडलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी ही कामे पावसाळ्यापूर्वी होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आजही उपनगरांतील विविध प्रभागांत कॉलनीअंतर्गत रस्ते विकसित नाहीत; तर मुख्य रस्ते खड्डेमय बनले आहेत. १५ मेनंतर डांबरीकरण अथवा रस्ते पॅचवर्क कामे हाती घेता येत नसल्याने रस्त्याचे पॅचवर्क कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

उपनगरांतील विविध प्रभागांत बारा नैसर्गिक नाले वाहत असून नालेसफाई परिणामकारक न झाल्याने राजलक्ष्मीनगर, साळोखेनगर, कणेरकरनगर, तपोवन, जीवबा नाना पार्क, सुर्वेनगर, रायगड कॉलनी या विविध प्रभागांत ऐन पावसाळ्यात मोठ्या नागरी वस्तीत पावसाचे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होते. तर क्रशर चौक, देवकर पाणंद मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होते.

गतवर्षी रंकाळा तलाव, साळोखेनगर प्रभागात पाच महाकाय धोकादायक वृक्ष नागरी वस्तीत कोसळून सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली होती; तर कळंबा-गारगोटी रस्त्यावर महाकाय वृक्ष कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. वीज वितरण विभागामार्फतसुद्धा अद्यापही विजेच्या तारांशी संपर्क करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणी मोहीम सुरू करण्यात आली नाही.

उपनगरात क्रशर चौक, संभाजीनगरातील सुधाकर जोशीनगर, जुना वाशीनाका, निर्माण चौक, कात्यायनी कॉम्प्लेक्स येथे मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे असून त्याची मोठी पडझड झाली आहे. पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती क्रमप्राप्त असून याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोट : प्रशासनापुढे पावसाळापूर्व कामाचे नियोजन मांडलेले असते; पण ते गंभीरपणे घेतले जात नाही. शिवाय उपनगरांचा विचार करता तोकड्या विकासनिधीमधून सर्व समस्या निराकरण होत नाहीत.

- दीपा मगदूम, माजी नगरसेविका, राजलक्ष्मीनगर.

वेळेत सर्व कर भरून नागरिक प्रशासनास सहकार्य करतात. मात्र मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नंदकुमार पिसे, कणेरकरनगर

फोटो : २२ कळंबा नालेसफाई

कोल्हापुरातील राजलक्ष्मीनगर प्रभागातील नैसर्गिक नाल्यांच्या सफाईचे काम कित्येक वर्षे झाले नसल्याने ऐन पावसाळ्यात निम्म्याहून अधिक प्रभागात नागरी वस्तीत पाणी शिरते.