शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

उपनगरांत नालेसफाईची कामे कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

अमर पाटील : कळंबा हवामान खात्याने यंदा पावसाळा लवकर सुरू होऊन गतवर्षीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

अमर पाटील : कळंबा

हवामान खात्याने यंदा पावसाळा लवकर सुरू होऊन गतवर्षीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उपनगरांत मान्सूनपूर्व केली जाणारी नालेसफाई, स्वच्छतागृहे दुरुस्ती, खड्डे पडलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी ही कामे पावसाळ्यापूर्वी होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आजही उपनगरांतील विविध प्रभागांत कॉलनीअंतर्गत रस्ते विकसित नाहीत; तर मुख्य रस्ते खड्डेमय बनले आहेत. १५ मेनंतर डांबरीकरण अथवा रस्ते पॅचवर्क कामे हाती घेता येत नसल्याने रस्त्याचे पॅचवर्क कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

उपनगरांतील विविध प्रभागांत बारा नैसर्गिक नाले वाहत असून नालेसफाई परिणामकारक न झाल्याने राजलक्ष्मीनगर, साळोखेनगर, कणेरकरनगर, तपोवन, जीवबा नाना पार्क, सुर्वेनगर, रायगड कॉलनी या विविध प्रभागांत ऐन पावसाळ्यात मोठ्या नागरी वस्तीत पावसाचे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होते. तर क्रशर चौक, देवकर पाणंद मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होते.

गतवर्षी रंकाळा तलाव, साळोखेनगर प्रभागात पाच महाकाय धोकादायक वृक्ष नागरी वस्तीत कोसळून सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली होती; तर कळंबा-गारगोटी रस्त्यावर महाकाय वृक्ष कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. वीज वितरण विभागामार्फतसुद्धा अद्यापही विजेच्या तारांशी संपर्क करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणी मोहीम सुरू करण्यात आली नाही.

उपनगरात क्रशर चौक, संभाजीनगरातील सुधाकर जोशीनगर, जुना वाशीनाका, निर्माण चौक, कात्यायनी कॉम्प्लेक्स येथे मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे असून त्याची मोठी पडझड झाली आहे. पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती क्रमप्राप्त असून याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोट : प्रशासनापुढे पावसाळापूर्व कामाचे नियोजन मांडलेले असते; पण ते गंभीरपणे घेतले जात नाही. शिवाय उपनगरांचा विचार करता तोकड्या विकासनिधीमधून सर्व समस्या निराकरण होत नाहीत.

- दीपा मगदूम, माजी नगरसेविका, राजलक्ष्मीनगर.

वेळेत सर्व कर भरून नागरिक प्रशासनास सहकार्य करतात. मात्र मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नंदकुमार पिसे, कणेरकरनगर

फोटो : २२ कळंबा नालेसफाई

कोल्हापुरातील राजलक्ष्मीनगर प्रभागातील नैसर्गिक नाल्यांच्या सफाईचे काम कित्येक वर्षे झाले नसल्याने ऐन पावसाळ्यात निम्म्याहून अधिक प्रभागात नागरी वस्तीत पाणी शिरते.