शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगली कोंडी कधी सुटणार? : पाच वर्षांपासून महामार्गाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:16 IST

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाची कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न तब्बल पाच वर्षांनंतरही कायम आहे. या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला असला तरी अद्यापही सांगली-कोल्हापूर महामार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारित आहे.

संदीप बावचे ।जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गाची कोंडी कधी सुटणार? हा प्रश्न तब्बल पाच वर्षांनंतरही कायम आहे. या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला असला तरी अद्यापही सांगली-कोल्हापूर महामार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारित आहे. त्यामुळे या महामार्गावरील समस्यांची मालिका कायम असून, बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच या महामार्गाचे घोंगडे भिजत पडले आहे.

२०११ मध्ये सांगली-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाची निविदा निघाली होती. मुंबईतील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम मिळाले होते. प्रत्यक्षात २०१२ मध्ये या कामाला सुरुवात झाली. रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनी व भूसंपादन याचा अडथळा रस्त्याच्या कामात आला, तर काही ठिकाणचे भूसंपादनच झाले नाही.

अशा अनेक समस्यांच्या फेऱ्यात सुप्रीम कंपनीने रस्त्याचे काम सुरू केले. एकीकडे अपघातांची मालिका, तर दुसरीकडे रस्त्याचे अपुरे काम अशा परिस्थितीत चार वर्षे पूर्ण झाले तरीही रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. एप्रिल २०१६ मध्ये सुप्रीम कंपनीला शासनाने काळ्या यादीत टाकले. यावेळी ९५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा कंपनीने केल्यानंतर टोल वसुलीच्या हालचाली सुरूझाल्या. शिरोली, उदगाव, अंकली येथे टोलनाके बसविण्यासाठी शेड उभारण्यात आले; मात्र अद्याप रस्ता पूर्ण नाही. झालेली कामे निकृष्ट आहेत.त्यातच टोल वसुलीचा घाट सांगली, अंकली, उदगाव, शिरोळ, जयसिंगपूर व इचलकरंजीकरांना प्रत्यक्ष चौपदरीकरणाचा लाभच मिळणार नाही. त्यामुळे टोलचे भूत आमच्या मानगुटीवर का! असा पवित्रा घेत टोलविरोधी कृती समितीने लढ्याला प्रारंभ केला. नागरिकांचा विरोध झाल्यानंतर टोलवसुली नाक्याचे कामच थांबले. सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामांचे मूल्यांकन पूर्ण झाले. त्यानंतर कंपनीला कामाच्या किमतीबाबत किती कोटी द्यायचे याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली. सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे महामार्ग पूर्णत्वाचा प्रश्न पुन्हा अधांतरी पडला आहे.अपघातांची मालिका सुरूच1 हातकणंगले येथे रखडलेल्या उड्डाणपुलाबरोबरच तमदलगे खिंड ते अंकली बायपास रस्ता व तमदलगे ते जयसिंगपूर या दुपदरी रस्त्याचे कामही अपूर्णच आहे. या दोन्ही मार्गावर अडचणीची समस्या आजही कायम आहे.2 अद्याप हा मार्ग सुप्रीम कंपनीच्या अखत्यारितच असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातून सांगण्यात येते. या मार्गावर अपघातांची मालिका कायम असून, चौपदरीकरणांतर्गत दुपदरी रस्ते पूर्ण झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते.पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेतसांगली-कोल्हापूर महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रखडलेल्या कामाबाबत निविदा काढून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले होते. गेल्या पाच वर्षांपासून महामार्गावरील समस्यांची कोंडी तर कायमच आहे. त्यातच पालकमंत्र्यांनी अपुºया रस्त्याबाबत दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्ग अजूनही सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्याच ताब्यात आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरूआहे. बांधकाम विभागाकडे हा महामार्ग हस्तांतरित नसल्यामुळे निधी खर्च करता येत नाही.- व्ही. शिंदे, उपअभियंता, जयसिंगपूर.