शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

करवीर तहसील रमणमळ्यात जाणार कधी ?

By admin | Updated: August 28, 2014 00:11 IST

चार कोटींचे बजेट : वर्षभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे धूळखात

प्रवीण देसाई - कोल्हापूर --सतत लोकांची वर्दळ...अस्ताव्यस्त वाहने लावल्यामुळे उडालेला पार्किंगचा बोजवारा...कार्यालयात जाताना बाहेर वाहतूक पोलीस आपली गाडी केव्हा उचलतील ही धास्ती...कार्यालयातही अपुऱ्या जागेमुळे कर्मचारी व नागरिकांची होणारी अडचण...हे चित्र करवीर तहसीलदार कार्यालय येथे नित्य पाहायला मिळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक वर्षभरापूर्वी हे कार्यालय रमणमळा येथे नेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. ३ कोटी ९२ लाख रुपयांचे बजेट तयार करून पाठविलेला हा प्रस्ताव अद्याप शासनस्तरावर धूळखात पडला आहे.करवीर तहसील कार्यालयाची कार्यकक्षा लक्षात घेता सध्याच्या कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त होणारी गर्दी नित्याचीच आहे. कार्यालयाच्या आवारात करवीर पोलीस ठाणे, शेजारीच असणारे न्यायालय व सीपीआर रुग्णालय यामुळे भाऊसिंगजी रोडवर नेहमीच गजबजल्याचे चित्र असते. त्यामुळे साहजिक या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक आहे. तहसील कार्यालयासह पोलीस ठाण्यामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग हा एक मोठा यक्षप्रश्न होऊन बसला आहे. त्यामुळे वादावादीचे प्रकार सर्रास घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एक पोलीस अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हे कार्यालय रमणमळा येथे जाण्याने रहदारीचा ताण नक्कीच कमी होणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामाजवळ शासनाच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ कोटी ९२ लाखांच्या इमारत बांधकामाचे एस्टिमेट तयार करण्यात आले. त्यानंतर गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. वर्ष होऊनही यावर शासनाकडून अद्याप काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे करवीर तहसीलदार कार्यालय गोंगाटातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यायला रमणमळा येथे जाणार का नाही? अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.