शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

करवीर तहसील रमणमळ्यात जाणार कधी ?

By admin | Updated: August 28, 2014 00:11 IST

चार कोटींचे बजेट : वर्षभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे धूळखात

प्रवीण देसाई - कोल्हापूर --सतत लोकांची वर्दळ...अस्ताव्यस्त वाहने लावल्यामुळे उडालेला पार्किंगचा बोजवारा...कार्यालयात जाताना बाहेर वाहतूक पोलीस आपली गाडी केव्हा उचलतील ही धास्ती...कार्यालयातही अपुऱ्या जागेमुळे कर्मचारी व नागरिकांची होणारी अडचण...हे चित्र करवीर तहसीलदार कार्यालय येथे नित्य पाहायला मिळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक वर्षभरापूर्वी हे कार्यालय रमणमळा येथे नेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. ३ कोटी ९२ लाख रुपयांचे बजेट तयार करून पाठविलेला हा प्रस्ताव अद्याप शासनस्तरावर धूळखात पडला आहे.करवीर तहसील कार्यालयाची कार्यकक्षा लक्षात घेता सध्याच्या कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त होणारी गर्दी नित्याचीच आहे. कार्यालयाच्या आवारात करवीर पोलीस ठाणे, शेजारीच असणारे न्यायालय व सीपीआर रुग्णालय यामुळे भाऊसिंगजी रोडवर नेहमीच गजबजल्याचे चित्र असते. त्यामुळे साहजिक या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक आहे. तहसील कार्यालयासह पोलीस ठाण्यामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग हा एक मोठा यक्षप्रश्न होऊन बसला आहे. त्यामुळे वादावादीचे प्रकार सर्रास घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एक पोलीस अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हे कार्यालय रमणमळा येथे जाण्याने रहदारीचा ताण नक्कीच कमी होणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामाजवळ शासनाच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ कोटी ९२ लाखांच्या इमारत बांधकामाचे एस्टिमेट तयार करण्यात आले. त्यानंतर गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. वर्ष होऊनही यावर शासनाकडून अद्याप काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे करवीर तहसीलदार कार्यालय गोंगाटातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यायला रमणमळा येथे जाणार का नाही? अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.