शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उद्यानमधील झेंडा फडकणार कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पोलीस उद्यानातील ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील तिरंगा कधी फडकणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात ...

कोल्हापूर : पोलीस उद्यानातील ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील तिरंगा कधी फडकणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोलीस उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्या ठिकाणी तिरंगा फडकण्यापेक्षा जास्त दिवस उतरवला गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या प्रजासत्ताकदिनी तरी तो फडकणार का, अशी विचारणा होत आहे.

तत्कालीन महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी उद्योगांच्या सहभागातून कोल्हापूर पोलीस दलाच्या जागेवर केएसबीपी संस्थेचे सुजय पित्रे यांनी पोलीस उद्यान साकारले. तसेच या ठिकाणी देशातील दुसऱ्या नंबरच्या ३०३ फूट उंचीचा भारतीय तिरंगाही उभारण्यात आला. येथील उद्यानाला नागरिकांची चांगली पसंती मिळाली. परंतु नंतर मात्र हा तिरंगा फडकताना दिसण्याऐवजी उतरवलेलाच दिसू लागला. लाखो रुपयांची गुंतवणूक करून नेमके काय मिळवले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात पर्यटन वाढावे, यासाठी पाटील यांनी केएसबीपीच्या माध्यमातून जे प्रयत्न केले ते दाद देण्याजोगे आहेत. मात्र, या ध्वजस्तंभावर महिनोनमहिने तिरंगा फडकत नाही, याची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा केली जात आहे.

याबाबत दोन वर्षांपूर्वीही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा देशातील सर्वांत उंच असलेला वाघा सीमेवरील तिरंगा प्रचंड वाऱ्यामुळे नेहमी उतरवून ठेवला जातो. रांची येथील ध्वजही उतरवलेला असतो. पुण्यातील ध्वजही वातावरणानुसार उतरवला जातो. मात्र, वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून कोल्हापूरचा झेंडा नेहमी फडकत राहील याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, तरीही झेंडा फडकत नाही, हे वास्तव आहे.

चौकट

नेमकी जबाबदारी कोणाची

पोलीस उद्यानातील झेंडा फडकत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, अशी विचारणा होत आहे. जर ती जबाबदारी पोलीस दलाची असेल तर तशी कार्यवाही त्यांनी करण्याची गरज आहे. पोलीस दल ती जबाबदारी घेणार नसेल, तर ज्यांनी प्रकल्प उभारला त्या केएसबीपी संस्थेची ती जबाबदारी आहे. त्यांनी याबाबत निर्णय जाहीर करण्याची गरज आहे.

२३०१२०२१ कोल झेंडा

पोलीस उद्यानातील या ध्वजस्तंभाला आता तिरंग्याची प्रतीक्षा आहे.