शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते...तीन वर्षांच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारांच्या वितरणासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसमीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ ...

ठळक मुद्देएक कोटी रुपयांची तरतूदआदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसमीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ देण्यासाठीची तयारी या विभागाने सुरू केली आहे.

दहा वर्षांपूर्वी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावे आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालय पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्था आणि खासगी संस्थांनाही या योजनेतून पुरस्कार देण्यात येतात.तसेच खासगी स्त्री व पुरुष डॉक्टर, शासकीय स्त्री व पुरुष डॉक्टर, आदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक २५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतात.

महाराष्ट्राच्या अवाढव्य आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगले काम करणारे डॉक्टर आणि संस्थांना यातून प्रोत्साहन मिळावे, या हेतूने या पुरस्कार योजनेची सुरुवात करण्यात आली.मात्र गेली दोन वर्षे या पुरस्कारांचे वितरणच केले गेलेले नाही. मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्यापासून ते वेगवेगळी कारणे सांगत या आरोग्य संस्थांना आणि डॉक्टरांना पुरस्कार देणेच राहून गेले आहे. आता यंदा आरोग्य विभागाला एकदम जाग आली असून २०१५-१६, २०१६-२०१७ आणि यंदाचा २०१७-२०१८ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

शासनाने २६ सप्टेंबर रोजी आदेश काढून यासाठीच्या परीक्षण समितीची व त्यातील अशासकीय सदस्यांचीही नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांबरोबरच डॉ. ए. पी. खाडे, डॉ. मधुसूदन कर्नाटकी, डॉ. गो. सी. चिंधे आणि विलास देशपांडे यांचा या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

पुरस्कार २० लाखांचे; तर ९८ लाखांचे बजेट!या तीन वर्षांचे रोख रकमेचे पुरस्कार देण्यासाठी सुमारे २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र याचा योजनेची माहिती देण्यापासून ते पुरस्कार वितरण समारंभापर्यंतचा सर्व खर्च एकत्रित करता, ते एकूण बजेट ९८ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २० लाखांचे पुरस्कार आणि ते वितरित करण्यासाठी आणि स्पर्धा घेण्यासाठी ८० लाख रुपये खर्च असे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.