शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते...तीन वर्षांच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारांच्या वितरणासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसमीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ ...

ठळक मुद्देएक कोटी रुपयांची तरतूदआदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसमीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ देण्यासाठीची तयारी या विभागाने सुरू केली आहे.

दहा वर्षांपूर्वी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावे आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालय पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्था आणि खासगी संस्थांनाही या योजनेतून पुरस्कार देण्यात येतात.तसेच खासगी स्त्री व पुरुष डॉक्टर, शासकीय स्त्री व पुरुष डॉक्टर, आदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक २५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतात.

महाराष्ट्राच्या अवाढव्य आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगले काम करणारे डॉक्टर आणि संस्थांना यातून प्रोत्साहन मिळावे, या हेतूने या पुरस्कार योजनेची सुरुवात करण्यात आली.मात्र गेली दोन वर्षे या पुरस्कारांचे वितरणच केले गेलेले नाही. मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्यापासून ते वेगवेगळी कारणे सांगत या आरोग्य संस्थांना आणि डॉक्टरांना पुरस्कार देणेच राहून गेले आहे. आता यंदा आरोग्य विभागाला एकदम जाग आली असून २०१५-१६, २०१६-२०१७ आणि यंदाचा २०१७-२०१८ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

शासनाने २६ सप्टेंबर रोजी आदेश काढून यासाठीच्या परीक्षण समितीची व त्यातील अशासकीय सदस्यांचीही नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांबरोबरच डॉ. ए. पी. खाडे, डॉ. मधुसूदन कर्नाटकी, डॉ. गो. सी. चिंधे आणि विलास देशपांडे यांचा या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

पुरस्कार २० लाखांचे; तर ९८ लाखांचे बजेट!या तीन वर्षांचे रोख रकमेचे पुरस्कार देण्यासाठी सुमारे २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र याचा योजनेची माहिती देण्यापासून ते पुरस्कार वितरण समारंभापर्यंतचा सर्व खर्च एकत्रित करता, ते एकूण बजेट ९८ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २० लाखांचे पुरस्कार आणि ते वितरित करण्यासाठी आणि स्पर्धा घेण्यासाठी ८० लाख रुपये खर्च असे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.