शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST

कोल्हापूर : पाटी-पेन्सिल हातात धरून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याच्या वयातील आणि त्यांच्यापेक्षा थोडी मोठी असणारी अनेक लहान मुले कोल्हापुरात भीक ...

कोल्हापूर : पाटी-पेन्सिल हातात धरून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याच्या वयातील आणि त्यांच्यापेक्षा थोडी मोठी असणारी अनेक लहान मुले कोल्हापुरात भीक मागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यात कोल्हापूरबरोबरच कर्नाटक, हैदराबाद येथील मुले-मुलींचा समावेश आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालसंरक्षण समित्या अधिक सक्षम होणे आवश्यक आहे.

स्वत: आणि आपल्या मुलांच्या माध्यमातून भीक मागणे ही कोल्हापूर, पिंपळगाव (ता. कागल), मिरज, कर्नाटक, हैदराबाद राज्यातील झोपडपट्टी परिसरातील काही लोकांनी आपली उपजीविका बनवली आहे. शाळा बंद असल्याने आणि ऑनलाईन शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने भीक मागण्यासाठी लहान मुलांचा त्यांच्या पालक, नातेवाईकांकडून वापर केला जात आहे. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोड, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, राजीव गांधी पुतळा परिसर, रंकाळा चौपाटी परिसर, रंकाळा बसस्थानक, आदी ठिकाणी लहान मुले-मुली भीक मागत असल्याचे दिसून येते. काहीजण लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेश परिसरात फिरून भीक मागतात. दिवसभर भीक मागून सायंकाळी सहाच्या सुमारास ते आपापल्या घरी निघून जातात. त्यांचे नाव, ते कुठे राहतात, त्यांचे आई-वडील काय करतात, याबाबत विचारणा करताच ते तेथून पळून जातात.

मध्यवर्ती बसस्थानक परिसर

मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळ असलेल्या राजीव गांधी पुतळा आणि वटेश्वर मंदिरालगत सोमवारी सकाळी काही महिला, वृद्ध, पुरूष भीक मागत बसले होते. तेथील दोन महिलांसमवेत चार लहान मुलीदेखील होत्या. त्यांना ‘लोकमत’चे छायाचित्रकार कॅमेराबद्ध करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच या मुलींनी आपले चेहरे लपवले आणि पालकांच्या सांगण्यावरून त्या न्यू शाहुपुरीच्या दिशेने पळून गेल्या.

रेल्वे स्थानक परिसर

भीक मागण्यासाठी इचलकरंजी, जयसिंगपूर, मिरज येथून रेल्वेने लहान मुले-मुली कोल्हापुरात येतात. काही रेल्वे स्टेशन परिसरात थांबून तेथून शहरातील विविध भागांमध्ये जातात. सायंकाळी पुन्हा रेल्वेने आपल्या राहत्या ठिकाणी निघून जातात. कोरोनामुळे सध्या पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने बाहेर येणारी अशी मुले-मुली सोमवारी दिसल्या नाहीत.

बालहक्क कोण मिळवून देणार?

अल्पवयीन मुलांचा भीक मागण्यासाठी वापर करणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे मुलांचा वापर थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर मार्गांनी प्रयत्न होणे आवश्यक आहे. नागरिकांनी मुलांना भीक देणे बंद करावे. जी व्यक्ती मुलांना भीक मागायला लावते, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा ते गाव पातळीपर्यंतच्या बालसंरक्षण समित्या सक्षम केल्या पाहिजेत.

- अतुल देसाई, बाल अधिकार कार्यकर्ते.

तावडे हॉटेल परिसर, पिंपळगाव, जयसिंगपूर, वडगाव, इचलकरंजी येथील झोपडपट्टी परिसरातील काही नागरिकांनी आपल्या मुलांसमवेत भीक मागणे ही आपली उपजीविका बनवली आहे. अशी लहान मुले ज्याठिकाणी भीक मागतात, त्याठिकाणी शासनाने रेस्क्यू ऑपरेशन करावे. बालसंरक्षण समित्यांनी अशा मुलांच्या पालकांचे प्रबोधन करावे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

- सुभाष नारे, अध्यक्ष, स्नेहसंवर्धन सेवाभावी संस्था.

060921\06kol_4_06092021_5.jpg

०६०९२०२१-कोल-स्टार डमी ११३९)