शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

गुरुजीच उशीर करतात तेव्हा...!

By admin | Updated: December 19, 2014 00:14 IST

मुख्यालयी राहण्याची सक्ती : फेरतपासणी अहवालाकडे दुर्लक्ष; स्मरणपत्रालाही केराची टोपली

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात राहत असलेल्यांची वस्तुस्थितीजन्य माहिती विहीत नमुन्यात पंधरा दिवसांत द्या, असा शिक्षण विभागाने आदेश दिला. मात्र, आता महिना उलटला तरी जिल्ह्यातील सर्व ‘गुरुजीं’नी माहिती दिलेली नाही. स्मरणपत्रालाही केराची टोपली दाखवली आहे. ‘रोज शाळेला वेळेत या’ असे विद्यार्थ्यांना उपदेशाचे धडे देणारे गुरुजीच मुख्यालयासंबंधित माहिती देण्याची वेळ पाळत नाहीत, विलंब करतात. यावर पुढे काय करायचे यासंबंधी जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यालयी राहावे म्हणूनच शासन शिक्षकांना दोन, तर मुख्याध्यापकांना अडीच हजार रुपये घरभाडे दरमहा देत असते. बहुतांशी गुरुजी (शिक्षक)मुख्यालयात न राहताच भाडे घेतात. त्याचा अप्रत्यक्षपणे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व प्राथमिक शिक्षकांनी नियमानुसार मुख्यालयात राहावे, असा आदेश दोन महिन्यांपूर्वी काढला होता. कार्यवाही सुरू झाली. शिक्षण प्रशासनाने माहिती घेतली. सर्व शिक्षकांनी ‘आम्ही मुख्यालयातच राहतो,’ अशी माहिती देऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. हे उघड झाल्यामुळे खरोखरंच शिक्षक मुख्यालयात राहतात का, याचा शोध घेण्यासाठी फेरतपासणीचा आदेश २७ आॅक्टोबरला प्रशासनाने सर्व विस्तार अधिकारीतर्फे गुरुजींना दिले. मुख्यालयातील वास्तव्याच्या पुराव्यासाठी फोटो, शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षाची सही आदी माहिती विहित नमुन्यात देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. मुदतीत एकाही तालुक्यातील सर्व गुरूजींनी माहिती दिली नाही.माहिती देण्याऐवजी गुरुजी संघटनांच्या माध्यमातून मुख्यालयात राहण्याची अटच शिथील करावी यासाठी दबाव आणत राहिले. लोकप्रतिनिधींकडे जावून विनंती करत आहेत. याउलट कितीही दबाव आला तरी मागे हटायचे नाही, असा निर्धार करून प्रशासनही पाठपुरावा करत आहे. शिक्षण प्रशासनाने १५ नोव्हेंबरला विस्तार अधिकाऱ्यातर्फे सर्व गुरुजींना स्मरणपत्र दिले. या पत्राची दखल न घेतल्याने १७ रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले. दोन्ही स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवून फेरतपासणी माहिती देण्याकडे गुरुजींनी पाठ फिरविली आहे. मुख्यालयात राहत असल्यासंबंधीचा फेरतपासणी अहवाल शिक्षकांनी दिलेला नाही. समायोजन, टीईटी परीक्षा यामध्ये शिक्षण विभाग व्यस्त होता. माहितीसाठी पाठपुरावा झाला नाही. आता पुन्हा बैठक घेऊ. मुख्यालयात राहण्याची अट शिथिल केलेली नाही. कोण असे सांगत असेल, तर ते चुकीचे आहे.- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), जिल्हा परिषद मुख्यालयी राहत नाहीत हीच अडचणफेरतपासणी माहितीच्या सत्यतेसंबंधी शिक्षण विस्तार अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. यामुळे फेरतपासणीतील माहिती खरीच देणे गरजेचे आहे. खोटी माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते. खरी माहिती द्यायची तर मुख्यालयात राहण्यास जावे लागणार आहे. बहुतांशीजण मुख्यालयातच राहत नसल्यामुळे खरी माहिती देणार कशी? हीच नेमकी अडचण वेळेत माहिती न देण्याची गुरुजींची आहे.