शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

गुरुजीच उशीर करतात तेव्हा...!

By admin | Updated: December 19, 2014 00:14 IST

मुख्यालयी राहण्याची सक्ती : फेरतपासणी अहवालाकडे दुर्लक्ष; स्मरणपत्रालाही केराची टोपली

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात राहत असलेल्यांची वस्तुस्थितीजन्य माहिती विहीत नमुन्यात पंधरा दिवसांत द्या, असा शिक्षण विभागाने आदेश दिला. मात्र, आता महिना उलटला तरी जिल्ह्यातील सर्व ‘गुरुजीं’नी माहिती दिलेली नाही. स्मरणपत्रालाही केराची टोपली दाखवली आहे. ‘रोज शाळेला वेळेत या’ असे विद्यार्थ्यांना उपदेशाचे धडे देणारे गुरुजीच मुख्यालयासंबंधित माहिती देण्याची वेळ पाळत नाहीत, विलंब करतात. यावर पुढे काय करायचे यासंबंधी जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यालयी राहावे म्हणूनच शासन शिक्षकांना दोन, तर मुख्याध्यापकांना अडीच हजार रुपये घरभाडे दरमहा देत असते. बहुतांशी गुरुजी (शिक्षक)मुख्यालयात न राहताच भाडे घेतात. त्याचा अप्रत्यक्षपणे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व प्राथमिक शिक्षकांनी नियमानुसार मुख्यालयात राहावे, असा आदेश दोन महिन्यांपूर्वी काढला होता. कार्यवाही सुरू झाली. शिक्षण प्रशासनाने माहिती घेतली. सर्व शिक्षकांनी ‘आम्ही मुख्यालयातच राहतो,’ अशी माहिती देऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. हे उघड झाल्यामुळे खरोखरंच शिक्षक मुख्यालयात राहतात का, याचा शोध घेण्यासाठी फेरतपासणीचा आदेश २७ आॅक्टोबरला प्रशासनाने सर्व विस्तार अधिकारीतर्फे गुरुजींना दिले. मुख्यालयातील वास्तव्याच्या पुराव्यासाठी फोटो, शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षाची सही आदी माहिती विहित नमुन्यात देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. मुदतीत एकाही तालुक्यातील सर्व गुरूजींनी माहिती दिली नाही.माहिती देण्याऐवजी गुरुजी संघटनांच्या माध्यमातून मुख्यालयात राहण्याची अटच शिथील करावी यासाठी दबाव आणत राहिले. लोकप्रतिनिधींकडे जावून विनंती करत आहेत. याउलट कितीही दबाव आला तरी मागे हटायचे नाही, असा निर्धार करून प्रशासनही पाठपुरावा करत आहे. शिक्षण प्रशासनाने १५ नोव्हेंबरला विस्तार अधिकाऱ्यातर्फे सर्व गुरुजींना स्मरणपत्र दिले. या पत्राची दखल न घेतल्याने १७ रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले. दोन्ही स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवून फेरतपासणी माहिती देण्याकडे गुरुजींनी पाठ फिरविली आहे. मुख्यालयात राहत असल्यासंबंधीचा फेरतपासणी अहवाल शिक्षकांनी दिलेला नाही. समायोजन, टीईटी परीक्षा यामध्ये शिक्षण विभाग व्यस्त होता. माहितीसाठी पाठपुरावा झाला नाही. आता पुन्हा बैठक घेऊ. मुख्यालयात राहण्याची अट शिथिल केलेली नाही. कोण असे सांगत असेल, तर ते चुकीचे आहे.- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), जिल्हा परिषद मुख्यालयी राहत नाहीत हीच अडचणफेरतपासणी माहितीच्या सत्यतेसंबंधी शिक्षण विस्तार अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. यामुळे फेरतपासणीतील माहिती खरीच देणे गरजेचे आहे. खोटी माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते. खरी माहिती द्यायची तर मुख्यालयात राहण्यास जावे लागणार आहे. बहुतांशीजण मुख्यालयातच राहत नसल्यामुळे खरी माहिती देणार कशी? हीच नेमकी अडचण वेळेत माहिती न देण्याची गुरुजींची आहे.