शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

महापुरातील घरांची पायाभरणी कधी? : अद्याप सरकारकडून निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठवून दोन महिने उलटले

प्रवीण देसाईकोल्हापूर : आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीने आलेल्या महापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासन व केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल सप्टेंबर महिन्यातच पाठविला असून, अद्याप यातील एक रुपयाही नुकसानग्रस्ताला मिळालेला नाही. त्यामुळे महापुरातील नुकसानग्रस्तांच्या घरांच्या पायाभरणी कधी होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात या अहवालाला अंतिम स्वरूप देऊन तो पुन्हा शासनाला पाठविला. त्यानुसार पूर्णत: घरे पडलेल्यांसाठी प्रत्येकी ९५ हजार १०० रुपयांप्रमाणे ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे; तर पूर्णत: पडलेल्या ६४ झोपड्यांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे तीन लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

अंशता पडलेल्या पक्क्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक कोटी २६ लाख रुपये व अंशत: पडलेल्या कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या राष्टÑीय आपत्ती निवारण निधीतून हा निधी जिल्हा प्रशासनाने मागितला आहे. यानंतर अपेक्षित नुकसानीची मदत येणे अपेक्षित होते.; परंतु यातील एक छदामही पुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या घरांची पायाभरणी होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.जिल्ह्यातील १६ हजार घरांचे पूर्णत: नुकसानमहापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांची संख्या १६ हजार ६४२ इतकी असून त्याकरिता ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. एकूण ६४ झोपड्या जमीनदोस्त झाल्या असून, त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, अंशत: पडलेल्या घरांची संख्या २११४ इतकी असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार, अंशत: पडलेल्या २९७५८ कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे.

महापुरातील पाण्याने पडलेल्या घरांसंदर्भात अंतिम अहवाल गतमहिन्यात राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे ४१ हजार घरांच्या नुकसानीसाठी संबंधितांना ११० कोटी ८५ लाख ७० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच ही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर