शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

महापुरातील घरांची पायाभरणी कधी? : अद्याप सरकारकडून निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठवून दोन महिने उलटले

प्रवीण देसाईकोल्हापूर : आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीने आलेल्या महापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासन व केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल सप्टेंबर महिन्यातच पाठविला असून, अद्याप यातील एक रुपयाही नुकसानग्रस्ताला मिळालेला नाही. त्यामुळे महापुरातील नुकसानग्रस्तांच्या घरांच्या पायाभरणी कधी होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात या अहवालाला अंतिम स्वरूप देऊन तो पुन्हा शासनाला पाठविला. त्यानुसार पूर्णत: घरे पडलेल्यांसाठी प्रत्येकी ९५ हजार १०० रुपयांप्रमाणे ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे; तर पूर्णत: पडलेल्या ६४ झोपड्यांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे तीन लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

अंशता पडलेल्या पक्क्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक कोटी २६ लाख रुपये व अंशत: पडलेल्या कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या राष्टÑीय आपत्ती निवारण निधीतून हा निधी जिल्हा प्रशासनाने मागितला आहे. यानंतर अपेक्षित नुकसानीची मदत येणे अपेक्षित होते.; परंतु यातील एक छदामही पुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या घरांची पायाभरणी होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.जिल्ह्यातील १६ हजार घरांचे पूर्णत: नुकसानमहापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांची संख्या १६ हजार ६४२ इतकी असून त्याकरिता ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. एकूण ६४ झोपड्या जमीनदोस्त झाल्या असून, त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, अंशत: पडलेल्या घरांची संख्या २११४ इतकी असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार, अंशत: पडलेल्या २९७५८ कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे.

महापुरातील पाण्याने पडलेल्या घरांसंदर्भात अंतिम अहवाल गतमहिन्यात राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे ४१ हजार घरांच्या नुकसानीसाठी संबंधितांना ११० कोटी ८५ लाख ७० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच ही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर