शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील घरांची पायाभरणी कधी? : अद्याप सरकारकडून निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठवून दोन महिने उलटले

प्रवीण देसाईकोल्हापूर : आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीने आलेल्या महापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासन व केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल सप्टेंबर महिन्यातच पाठविला असून, अद्याप यातील एक रुपयाही नुकसानग्रस्ताला मिळालेला नाही. त्यामुळे महापुरातील नुकसानग्रस्तांच्या घरांच्या पायाभरणी कधी होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात या अहवालाला अंतिम स्वरूप देऊन तो पुन्हा शासनाला पाठविला. त्यानुसार पूर्णत: घरे पडलेल्यांसाठी प्रत्येकी ९५ हजार १०० रुपयांप्रमाणे ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे; तर पूर्णत: पडलेल्या ६४ झोपड्यांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे तीन लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

अंशता पडलेल्या पक्क्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक कोटी २६ लाख रुपये व अंशत: पडलेल्या कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या राष्टÑीय आपत्ती निवारण निधीतून हा निधी जिल्हा प्रशासनाने मागितला आहे. यानंतर अपेक्षित नुकसानीची मदत येणे अपेक्षित होते.; परंतु यातील एक छदामही पुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या घरांची पायाभरणी होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.जिल्ह्यातील १६ हजार घरांचे पूर्णत: नुकसानमहापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांची संख्या १६ हजार ६४२ इतकी असून त्याकरिता ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. एकूण ६४ झोपड्या जमीनदोस्त झाल्या असून, त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, अंशत: पडलेल्या घरांची संख्या २११४ इतकी असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार, अंशत: पडलेल्या २९७५८ कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे.

महापुरातील पाण्याने पडलेल्या घरांसंदर्भात अंतिम अहवाल गतमहिन्यात राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे ४१ हजार घरांच्या नुकसानीसाठी संबंधितांना ११० कोटी ८५ लाख ७० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच ही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर