शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 21:10 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला

कोल्हापूर, दि. 20 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अमित शाह कधीपासून पंचांगकर्ते झाले?, त्यांनी भविष्य सांगण्याचा “नवा व्यवसाय’ केव्हापासून सुरू केला? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी शाहांसह भाजपावर जोरदार टीका केली आहे. अमित शाहांचे गुजरातेतील उद्योग धंदे मला माहती आहेत, मात्र पंचांग पाहून भाकितही सांगण्याचा अमित शाहांचा नवा उद्योग मला माहीत नव्हता, अशी उपरोधिक टीका शरद पवारांनी केली आहे. कोणत्याही सरकारमध्ये मंत्रिमंडळात कोणता मंत्री असावा किंवा नसावा याचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मात्र आता या घोषणा कोल्हापुरातून होत असल्याचा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना हाणला आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राणेंच्या भाजपा प्रवेशाला आपल्या शुभेच्छा असल्याचे पवारांनी सांगितले. राजू शेट्टी यांच्या सोबत मी संसदेत काम केलं आहे, पण इतर कोणी मला माहिती नसल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांनी नामोल्लेख टाळला आहे. राजू शेट्टींचे लोकसभेतील काम दिसते. मात्र दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहीत नाहीत, त्यांचे योगदान काय? असे म्हणत पवारांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला पुण्यात टोला हाणला होता. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली होती. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ह्य त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेनह्ण असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही.