शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 21:10 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला

कोल्हापूर, दि. 20 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अमित शाह कधीपासून पंचांगकर्ते झाले?, त्यांनी भविष्य सांगण्याचा “नवा व्यवसाय’ केव्हापासून सुरू केला? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी शाहांसह भाजपावर जोरदार टीका केली आहे. अमित शाहांचे गुजरातेतील उद्योग धंदे मला माहती आहेत, मात्र पंचांग पाहून भाकितही सांगण्याचा अमित शाहांचा नवा उद्योग मला माहीत नव्हता, अशी उपरोधिक टीका शरद पवारांनी केली आहे. कोणत्याही सरकारमध्ये मंत्रिमंडळात कोणता मंत्री असावा किंवा नसावा याचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मात्र आता या घोषणा कोल्हापुरातून होत असल्याचा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना हाणला आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राणेंच्या भाजपा प्रवेशाला आपल्या शुभेच्छा असल्याचे पवारांनी सांगितले. राजू शेट्टी यांच्या सोबत मी संसदेत काम केलं आहे, पण इतर कोणी मला माहिती नसल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांनी नामोल्लेख टाळला आहे. राजू शेट्टींचे लोकसभेतील काम दिसते. मात्र दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहीत नाहीत, त्यांचे योगदान काय? असे म्हणत पवारांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला पुण्यात टोला हाणला होता. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली होती. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ह्य त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेनह्ण असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही.