शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

जिल्हाधिकारी कार्यालयाला जेव्हा उशिरा जाग येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:59 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाड येथील सावित्री पूल कोसळून दुर्घटना घडून वर्ष उलटले आणि त्या पार्श्वभूमीवर आता पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला द्यावा, अशा आदेशाचे पत्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविले आहे. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाला तब्बल वर्षानंतर जाग आल्याचे ...

ठळक मुद्दे तब्बल वर्षानंतर मागितली पर्यायी शिवाजी पुलाची माहिती : राष्टÑीय महामार्ग विभागाला पत्र इतक्या उशिरा का माहिती मागविली? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाड येथील सावित्री पूल कोसळून दुर्घटना घडून वर्ष उलटले आणि त्या पार्श्वभूमीवर आता पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला द्यावा, अशा आदेशाचे पत्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविले आहे. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाला तब्बल वर्षानंतर जाग आल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी इतक्या उशिरा का माहिती मागविली? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

गतवर्षी आॅगस्टमध्ये घडलेल्या महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामध्ये कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा समावेश होता. त्याच्या शेजारीच पर्यायी शिवाजी पुलाचे काम निम्म्यावर येऊन केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानगीत अडकले होते.

हा पर्यायी पूल लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी कोल्हापूरकरांची भावना होती आणि ती आताही आहे. त्यानुसार ४ आॅगस्ट २०१६ ला तत्कालीन महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, आदींसह पदाधिकाºयांनी शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. यामध्ये ब्रिटिशकालीन पूल मुसळधार पावसाने वाहून जाऊन जीवितहानी झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा. त्याचबरोबर जुन्या शिवाजी पुलाची तांत्रिक पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतूक सुरू ठेवावी किंवा नाही याबाबत संबंधित यंत्रणेकडून सखोल पाहणी करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.

या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालयाला २९ आॅगस्ट २०१७ म्हणजे तब्बल वर्षानंतर जाग आली. त्यांच्याकडून ताराबाई पार्क येथील राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून याबाबत सविस्तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर केलेल्या कार्यवाहीची माहिती राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला पाठवावी, असेही म्हटले आहे.

मुळात ही दुर्घटना घडून वर्ष झाले. त्यानंतर कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाबाबत इतका काथ्थाकूट झाला की, हा प्रश्न थेट संसदेत गेला. खासदार संभाजीराजे व खासदार धनंजय महाडिक यांनी हा प्रश्न उचलून धरत पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, राष्टÑीय महामार्ग विभागाच्या कार्यालयीनस्तरावरही केंद्रीय कार्यालयाकडे पाठपुरावाही सुरू होता, असे असताना महापालिकेच्यावतीने गतवर्षी दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालय एवढ्या उशिरा का जागे झाले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या निमित्ताने या कार्यालयातील भोंगळ आणि अजब कारभाराचा नमुना समोर आल्याचे दिसत आहे.इतक्या उशिरा का? हा आम्हालाही प्रश्नही दुर्घटना घडून एक वर्ष झाले. त्यानंतर कोल्हापुरातील पुलासंदर्भात राष्टÑीय महामार्ग कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा करून योग्य ती माहिती संबंधित यंत्रणेला पाठविण्यात आली आहे; परंतु याबाबत महापालिकेने वर्षभरापूर्वी दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालयाने आताच का पत्र दिले? हा आम्हालाही प्रश्न पडल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.