शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान काय करताहेत? : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:57 IST

दुधगाव : देशात ललित मोदी ने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्या ने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँके स ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी ...

ठळक मुद्देकवठेपिरानला विविध विकासकामांचा प्रारंभ; मारुती माने यांच्या स्मारकासाठी तातडीने निधी मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.

दुधगाव : देशात ललित मोदीने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्याने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी काय करीत आहेत? असा सवाल माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केला. हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या स्मारकास तातडीने निधी देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. पाटील यांच्या स्थानिक निधीतून कवठेपिरान (ता. मिरज) येथील हाळ भाग व स्मारक रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नामफलकाचे व युवक राष्ट्रवादीने आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटनही झाले. यावेळी आ. पाटील यांनी मारुती माने यांच्या स्मारकास भेट देऊन पाहणी केली. या संयुक्त समारंभात ते बोलत होते.

सरपंच सोनाताई गायकवाड, माजी उपसभापती दत्ता पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, मोदी यांनी प्रभावी भाषणे करून लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचा झंझावात पाहताना वाटायचे, आता यांची सत्ता २०-२५ वर्षे तरी हलणार नाही. मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.दत्ता पाटील म्हणाले, आ. पाटील यांनी सत्ता असताना आपल्या गावाला मोठा निधी देऊन गावाच्या विकासाला गती दिली आहे. विनोद वडगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नाजू पाटील, सर्जेराव पाटील, आण्णासाहेब तामगावे, बाळासाहेब केरीपाळे, रावसाहेब कोरे, अतुल पाटील, ऋषिकेश पाटील, अमित चौगुले, संग्राम चव्हाण, सुनील पाटील, अक्षय पाटील, राजरत्न कांबळे, सागर चौगुले उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडेलराज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. सरकार येत्या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करू शकते. जनतेने पाच वर्षात भरपूर भोगले असल्यामुळे ती भुलणार नाही, असे सांगून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही स्पष्ट केले.