शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान काय करताहेत? : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:57 IST

दुधगाव : देशात ललित मोदी ने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्या ने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँके स ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी ...

ठळक मुद्देकवठेपिरानला विविध विकासकामांचा प्रारंभ; मारुती माने यांच्या स्मारकासाठी तातडीने निधी मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.

दुधगाव : देशात ललित मोदीने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्याने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी काय करीत आहेत? असा सवाल माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केला. हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या स्मारकास तातडीने निधी देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. पाटील यांच्या स्थानिक निधीतून कवठेपिरान (ता. मिरज) येथील हाळ भाग व स्मारक रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नामफलकाचे व युवक राष्ट्रवादीने आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटनही झाले. यावेळी आ. पाटील यांनी मारुती माने यांच्या स्मारकास भेट देऊन पाहणी केली. या संयुक्त समारंभात ते बोलत होते.

सरपंच सोनाताई गायकवाड, माजी उपसभापती दत्ता पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, मोदी यांनी प्रभावी भाषणे करून लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचा झंझावात पाहताना वाटायचे, आता यांची सत्ता २०-२५ वर्षे तरी हलणार नाही. मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.दत्ता पाटील म्हणाले, आ. पाटील यांनी सत्ता असताना आपल्या गावाला मोठा निधी देऊन गावाच्या विकासाला गती दिली आहे. विनोद वडगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नाजू पाटील, सर्जेराव पाटील, आण्णासाहेब तामगावे, बाळासाहेब केरीपाळे, रावसाहेब कोरे, अतुल पाटील, ऋषिकेश पाटील, अमित चौगुले, संग्राम चव्हाण, सुनील पाटील, अक्षय पाटील, राजरत्न कांबळे, सागर चौगुले उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडेलराज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. सरकार येत्या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करू शकते. जनतेने पाच वर्षात भरपूर भोगले असल्यामुळे ती भुलणार नाही, असे सांगून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही स्पष्ट केले.