शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जुनी पूररेषा असताना नवीन कशासाठी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दुसऱ्या विकास आराखड्यामध्ये (१९९९) दर्शविलेल्या पूर नियंत्रण रेषेस अनुसरून सर्व विकसन होत असताना, पुन्हा नव्याने ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दुसऱ्या विकास आराखड्यामध्ये (१९९९) दर्शविलेल्या पूर नियंत्रण रेषेस अनुसरून सर्व विकसन होत असताना, पुन्हा नव्याने पूर नियंत्रणरेषा का आखली जात आहे? अशी विचारणा असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅन्ड इंजिनिअर्स संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. ही पूररेषा निश्चित करण्यासाठी केलेले सर्वेक्षण चुकीचे झाले असून, ते नव्याने करण्यात यावे, अन्यथा शहराची वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त केली आहे. असोसिएशनने ही लेखी तक्रार मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अजय कोराणे यांनी त्या संबंधीची माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर व अमल महाडिक यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या असून, या विषयांत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.असोसिएशनचे म्हणणे असे : कोल्हापूर शहर व इचलकरंजी भागातून वाहणाºया पंचगंगा नदीच्या पूरनियंत्रण रेषेसंदर्भात अद्याप सर्वेक्षण नकाशे अंतिम व्हायचे आहेत. कोल्हापूर शहरास प्रामुख्याने शिवाजी पूल ते शिरोली पूल या दरम्यान पंचगंगा नदीचा स्पर्श होतो.पंचगंगा नदीकाठी वसलेले हे शहर जुने व नवे कोल्हापूर असे मर्यादित क्षेत्र कधीही हद्दवाढ न होता वसले आहे. या शहरात १९७७ व १९९९ साली पहिला व दुसरा विकास आराखडा अस्तित्वात आला व त्याप्रमाणे भागाचे विकसनही ८० टक्के पूर्ण झाले आहे.शासनाने नगरपालिकेची महापालिका झाली तरी, गेल्या४0 वर्षांत एक इंचही हद्दवाढ केलेली नाही. हद्दवाढ न करताच नव्याने प्राधिकरण केले आहे; त्यामुळे आता हद्दवाढही होणार नाही.या दोन्ही विकास आराखड्यांमध्ये पुष्कळसे विकसन यापूर्वी दिलेल्या परवानग्यांनुसार सध्याच्या दिलेल्या पूर नियंत्रण क्षेत्रामध्ये झाले आहे.या क्षेत्रामध्ये पुष्कळ प्रमाणात विकास आराखड्यातील रहिवासी, व्यापारी, सार्वजनिक, निमसार्वजनिक, आदी प्रकारचे आरक्षण असलेल्या जमिनी समाविष्ट आहेत.यामुळे संभाव्य पूरनियंत्रण रेषेचा फटका या विकसनास बसू शकतो, असे झाल्यास शासनाने या दोन्ही विकास आराखड्यांवर आधारित यापूर्वी केलेला सर्व्हे चुकीचा होता का? असा प्रश्न उपस्थित होतो.कारण या दोन्ही विकास आराखड्यातील निषिद्ध क्षेत्र व सध्याची पूर नियंत्रण रेषा यामध्ये पुष्कळ तफावत आढळत आहे. सध्याचे सर्वेक्षण शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाले नसल्याचे दिसून येते.सन १९८९ अन्वये जर पूररेषा निश्चित झाली असल्यास व त्याप्रमाणे दुसºया विकास आराखड्यामध्ये विकास झाला असल्यास, संभाव्य पूर नियंत्रणरेषा अचानक एवढ्या फरकानेकशी येते, याचा उलघडा होतनाही.नो डेव्हलपमेंट झोन वाढणारपंचगंगा नदीत गाळ वाढला आहे, नदीच्या दोन्ही किनाºयावर शेतीचे अतिक्रमण व नदी पात्राची रुंदी कमी झाली हे पापसुद्धा जलसंपदा विभागाचेच आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने नदीचे पाणी जयंती नाल्यामधून बॅक वॉटर स्वरूपात दसरा चौक परिसरात येते व त्याचा फटका नागरिकांना बसतो. दुसºया विकास आराखड्यात पूर नियंत्रण रेषा निश्चित करून नदी क्षेत्रावरील पुष्कळ क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका म्हणून नो डेव्हलपमेंट झोन मोठ्या प्रमाणावर वाढून कोल्हापूरची वाढ खुंटणार आहे, असेही असोसिएशनला वाटते.