शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

तूर विक्रीसाठी सरकारची गडबड का? : राजू शेट्टींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 18:21 IST

तूर खरेदीत ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांचे हात ओले

आॅनलाईन/लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : एकीकडे तूर खरेदी करायची आणि लगेच त्याची विक्री केल्याने बाजारातील तुरीचे दर घसरत चालले आहेत. तूर विक्रीसाठी सरकारच्या गडबडीमागील गौडबंगाल काय? असा सवाल करत तुर खरेदीत ‘नाफेड’ च्या अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

सरकारने ताबडतोब तूर विक्री थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून तूर खरेदी सुरू केली पण ‘नाफेड’च्या अधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी व व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांना शेंड्या लावल्या. ३८ लाख क्विंटल तूर खरेदी करूनही शेतकऱ्यांच्या घरात तूर असेल तर ‘नाफेड’ने नेमकी कोणाची तूर खरेदी केली. व्यापाऱ्यांनी ३८-४० रुपयांनी खरेदी केलेली तूर ‘नाफेड’च्या गळ्यात ५०.५० रुपयांना मारली.

परभणी बाजार समितीतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर आलेला माल पावत्या न करता खरेदी केलेला दिसतो. या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेला तर तूर खरेदीत कोट्यवधीचा घोटाळा कोणी केला, हे बाहेर येईल. तुरीचे दर घसरल्याने खरेदीत ‘नाफेड’ने हस्तक्षेप केल्याने दर वाढला पाहिजे. हा सरकारचा उद्देश होता, पण तसे होते का? दिवसेंदिवस बाजारातील दर घसरत चालले आहेत.

सध्या ३८ ते ४६ रुपयांपर्यंत दर राहिले आहेत. त्याला सरकारचे धोरणच जबाबदार असून खरेदी केलेली तूर तातडीने विक्रीसाठी खुली करण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे. सरकार तोट्यात व्यवसाय करून नेमका कोणाचा फायदा करत आहे, असा सवालही खासदार शेट्टी यांनी केला. सरकारने तूर खरेदी करत असताना विक्री बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकऱ्यांची तूर घरात अन्....

सरकारचे तूर खरेदीचे धोरण म्हणजे ‘शेतकऱ्यांची तूर घरात आणि व्यापाऱ्यांची तूर ‘नाफेड’च्या दारात’ असेच म्हणावे लागेल, अशी टीकाही खासदार शेट्टी यांनी केली.