शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय?, उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:36 IST

एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड, यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप, यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही.

ठळक मुद्देबेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय?उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी

बेळगाव- एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड, यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप, यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही.मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या हाहाकारामुळे प्रत्येकाला एका तणावपूर्ण वातावरणातून जावे लागत आहे. त्यात कोरोनावरील लस किंवा औषध अजूनही उपलब्ध झाले नसून वैद्यकीय सेवेची वानवा झाली आहे. उपचाराअंती कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील समाधानकारक असली तरीही अनेक रुग्ण उपचाराअभावी फरफटत आहेत. आणि उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.घी गल्ली येथील एका 55 वषीय रहिवाशाला श्वसनाचा त्रास जाणवल्याने 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिम्स प्रशासनाने सर्जिकल ब्लॉकमधील क्वारंटाईनमध्ये त्याला ठेवले होते. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात हलविण्यात आले.

या वॉर्डमध्ये हलविल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. अशातच रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी बीम्स परिसरात तुफान दगडफेक करीत रुग्णवाहिका पेटविली. वॉर्डमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याचाही प्रयत्न केला. बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळ स्टाफने धरणे आंदोलन सुरू केले. बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळामधील सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी यात सहभाग घेतला आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता नागरिक, प्रशासन, प्रशासकीय व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्यात एकमेकात कोणताच ताळमेळ नसल्याचे जाणवते. या एकंदर परिस्थितीवरून एकवेळ कोरोना परवडला परंतु अशा घटनांमुळे होत असलेली घालमेल आणि ससेहोलपट नक्कीच महागात पडेल, हे नक्की.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक