शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमृतमहोत्सवी वाटचालीत काय गवसले, काय सुटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत असल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळीच झळाळी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात ७५ ...

कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत असल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळीच झळाळी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात ७५ वर्षे हा मोठा टप्पा असतो. देशाच्यादृष्टीनेही साडेसात दशकांची वाटचाल अनेक बऱ्यावाईट बदलांना सोबत घेणारी आहे. यानिमित्त लोकमतने ज्यांच्या आयुष्याची वाटचाल देशाच्या वाटचालीसोबतच झाली अशा समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांना या निमित्ताने बोलते केले. त्यांनी त्यांना भावलेल्या देशाच्या जडणघडणीतील दोन चांगल्या गोष्टी व आजही खटकणारी एक गोष्ट मांडली.

दीपक मिरजे

(ऑटोमोबाइल डिलर)

१९ ऑक्टोबर १९४७

फोटो : १४०८२०२१-कोल-दीपक मिरजे-१५ऑगस्ट

१.अन्नधान्य निर्मितीपासून अनेक बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो याचा आनंद आहे. जगातील बिगेस्ट ऑटोमोबाइल इंडस्टी म्हणून भारताचा लौकिक तयार झाला हे मोठे यश आहे.

२.आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. आता जगाचे लक्ष भारताकडे आहे हे पाहून आपलीही छाती आनंदाने भरून येते.

३. जगाच्या पाठीवरील जे देश आपल्यासोबतच स्वतंत्र झाले, ते आपल्या पुढे गेले. कारण त्यांनी आपण देशासाठी काम करतो ही भावना लोकांत रुजवली. आपण राष्ट्रउभारणीत अजूनही कमी पडत असल्याची मनात सल आहे.

------------

नाव : दत्तात्रय दिनकर चौगले,

निवृत्त प्राध्यापक, मुरगूड.

जन्म : दि. १४ जानेवारी १९४७

१) स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रउभारणी ही अत्यंत चांगली गोष्ट झाली. ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या.

२) रस्ते, उड्डाणपूल, विमानतळ, आदी स्वरूपांतील विविध पायाभूत सुविधा चांगल्या विकसित झाल्या.

३) दाभोलकर, पानसरे,कलबुर्गी या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यात देशातील पोलीस, गुप्तचर यंत्रणेला आजही यश आले नाही याची मात्र खंत वाटते.

फोटो (१३०८२०२१-कोल-दत्तात्रय चौगले (स्वातंत्र्य दिन प्रतिक्रिया)

पी. जी. मेढे

(साखर उद्योगाचे अभ्यासक)

१४०८२०२१-कोल- पी. जी. मेढे-१५ ऑगस्ट

जन्मतारीख : ६ सप्टेंबर १९४७

१. देशाने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून औद्योगिक व हरित क्रांती केली. अवकाश व संरक्षण तंत्रज्ञानाध्येही देदीप्यमान प्रगती करून महासत्तांच्या पंक्तीत स्थान मिळविले.

२. देशभरातील शेतकरी शेतीत नवनवे प्रयोग करत आहे. शेती अधिक समृध्द होत आहे, त्याकडे नवी पिढी आकर्षिली जात आहे हे पाहून मनाला आनंद वाटतो.

३. बेरोजगारीच्या समस्येवर अद्याप मात करू शकलेलो नाही. कृषिप्रधान देश असूनही शेतीपूरक उद्योगनिर्मिती व शेतमालाला किफायतशीर भाव देण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही.