शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अमृतमहोत्सवी वाटचालीत काय गवसले, काय सुटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत असल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळीच झळाळी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात ७५ ...

कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत असल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळीच झळाळी आहे. व्यक्तीच्या आयुष्यात ७५ वर्षे हा मोठा टप्पा असतो. देशाच्यादृष्टीनेही साडेसात दशकांची वाटचाल अनेक बऱ्यावाईट बदलांना सोबत घेणारी आहे. यानिमित्त लोकमतने ज्यांच्या आयुष्याची वाटचाल देशाच्या वाटचालीसोबतच झाली अशा समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांना या निमित्ताने बोलते केले. त्यांनी त्यांना भावलेल्या देशाच्या जडणघडणीतील दोन चांगल्या गोष्टी व आजही खटकणारी एक गोष्ट मांडली.

दीपक मिरजे

(ऑटोमोबाइल डिलर)

१९ ऑक्टोबर १९४७

फोटो : १४०८२०२१-कोल-दीपक मिरजे-१५ऑगस्ट

१.अन्नधान्य निर्मितीपासून अनेक बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो याचा आनंद आहे. जगातील बिगेस्ट ऑटोमोबाइल इंडस्टी म्हणून भारताचा लौकिक तयार झाला हे मोठे यश आहे.

२.आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. आता जगाचे लक्ष भारताकडे आहे हे पाहून आपलीही छाती आनंदाने भरून येते.

३. जगाच्या पाठीवरील जे देश आपल्यासोबतच स्वतंत्र झाले, ते आपल्या पुढे गेले. कारण त्यांनी आपण देशासाठी काम करतो ही भावना लोकांत रुजवली. आपण राष्ट्रउभारणीत अजूनही कमी पडत असल्याची मनात सल आहे.

------------

नाव : दत्तात्रय दिनकर चौगले,

निवृत्त प्राध्यापक, मुरगूड.

जन्म : दि. १४ जानेवारी १९४७

१) स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रउभारणी ही अत्यंत चांगली गोष्ट झाली. ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या.

२) रस्ते, उड्डाणपूल, विमानतळ, आदी स्वरूपांतील विविध पायाभूत सुविधा चांगल्या विकसित झाल्या.

३) दाभोलकर, पानसरे,कलबुर्गी या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यात देशातील पोलीस, गुप्तचर यंत्रणेला आजही यश आले नाही याची मात्र खंत वाटते.

फोटो (१३०८२०२१-कोल-दत्तात्रय चौगले (स्वातंत्र्य दिन प्रतिक्रिया)

पी. जी. मेढे

(साखर उद्योगाचे अभ्यासक)

१४०८२०२१-कोल- पी. जी. मेढे-१५ ऑगस्ट

जन्मतारीख : ६ सप्टेंबर १९४७

१. देशाने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून औद्योगिक व हरित क्रांती केली. अवकाश व संरक्षण तंत्रज्ञानाध्येही देदीप्यमान प्रगती करून महासत्तांच्या पंक्तीत स्थान मिळविले.

२. देशभरातील शेतकरी शेतीत नवनवे प्रयोग करत आहे. शेती अधिक समृध्द होत आहे, त्याकडे नवी पिढी आकर्षिली जात आहे हे पाहून मनाला आनंद वाटतो.

३. बेरोजगारीच्या समस्येवर अद्याप मात करू शकलेलो नाही. कृषिप्रधान देश असूनही शेतीपूरक उद्योगनिर्मिती व शेतमालाला किफायतशीर भाव देण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही.