शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

टँकरने भरली जाणारी विहीर आता तुडुंब...

By admin | Updated: August 7, 2016 01:01 IST

वेळूची टँकरमुक्तीकडे वाटचाल : गावाच्या शिवारात पाणी खेळू लागले; जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात

सातारा : टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये टँकर ओतून याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असे. तीच विहीर आज गावात झालेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत कामांमुळे तुडुंब भरली आहे. वेळूच्या शिवारात जागोजागी पाणी खेळले आहे. सध्या सुरू असणाऱ्या पाझर तलाव जोड प्रकल्पाने गाव निश्चितच टँकरमुक्त झाले आहे. अवघ्या १५११ लोकसंख्येचे वेळू हे गाव. या गावामध्ये राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत आणि श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या गावात ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धाही घेण्यात आली. ४४५ कुटुंब संख्या असणाऱ्या या गावात ३११ शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. मनुष्यबळाद्वारे ९२४.३१ घनमीटर सीसीटीचे काम तर १७ हजार ६७० घनमीटर डीपसीसीटीचे काम यंत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ६ गॅबियन बंधारे, २९ माती नालाबांध, कंपार्टमेंट बंडिंग त्याचबरोबर खोलीकरण, रुंदीकरण, पाणीसाठा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आणि शेततळी यांचा यामध्ये समावेश आहे. गावातील सार्वजनिक विहिरीत टँकर ओतून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या गावात झालेल्या कामांमुळे काही दिवसांपूर्वी कोरड्या असणाऱ्या या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. गावची टंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी यांत्रिकी विभागामार्फत तलाव जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)गावामध्ये ४ पाझर तलावगावामध्ये ४ पाझर तलाव आहेत. यामधील बेलेवाडीमध्ये असणारा पाझर तलाव हा वरच्या बाजूला आहे आणि तो नेहमी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असतो. सध्या जलरोधी चर काढून या पाझर तलावांमधील गळती रोखण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावातील गाळही काढण्यात आला आहे. या कामांमुळे आणि झालेल्या पावसांमुळे सध्या या तलावामध्ये समाधानकारक पाण्याची पातळी झाली आहे. बेलेवाडीतून ओसंडून वाहणारे अतिरिक्त पाणी खाली असणाऱ्या पाझर तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ७५० मीटर पाईपद्वारे हे दोन्ही पाझर तलाव जोडण्यात येत आहेत, अशी माहिती यंत्रिकी विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रकाश भोसले यांनी दिली.