शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

बरं झालं परीक्षा रद्द केली, आमची मानसिकता नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : ‘बरं झालं परीक्षा रद्द केली, विद्यार्थ्यांची मानसिकता नव्हती’, ‘सरकारने योग्य निर्णय घेतला आहे’, अशा प्रतिक्रिया सीबीएसई ...

कोल्हापूर : ‘बरं झालं परीक्षा रद्द केली, विद्यार्थ्यांची मानसिकता नव्हती’, ‘सरकारने योग्य निर्णय घेतला आहे’, अशा प्रतिक्रिया सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बारावीच्या परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी बुधवारी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे.

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय सीबीएसईने गेल्या दीड महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यावेळी बारावीबाबतचा निर्णय दि. १ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केला. या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील बारावीच्या दहा शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील ५५० विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे. या निर्णयाचे परीक्षार्थी, पालक, शिक्षकांनी स्वागत केले आहे. जे विद्यार्थी या विनापरीक्षा पुढील वर्गात जाण्याबाबत समाधानी नसतील त्यांना प्रत्यक्ष परीक्षा देता येणार आहे.

प्राचार्य काय म्हणतात?

सद्यस्थितीचा विचार करता परीक्षा रद्दचा निर्णय स्वागतार्ह आहे. विनापरीक्षा होणाऱ्या मूल्यमापनाबाबत जर एखादा विद्यार्थी समाधानी नसल्यास त्याला प्रत्यक्षात परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

-डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅॅशनल स्कूल

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची सध्या मानसिकताच नव्हती. या स्थितीचा विचार करता केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.

गीता पाटील, प्राचार्य, सिम्बॉलिक इंटरनॅॅशनल स्कूल

पालकांच्या मते

सीबीएसई बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली असती, तर त्याद्वारे एक प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे.

-संजय जोशी

कोरोनाच्या स्थिती लक्षात घेवून परीक्षा रद्दचा निर्णय मला योग्य वाटतो. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा विचार करून सीबीएसईने मूल्यमापनाची पद्धत निश्चित करावी.

- शशांक घोसाळकर.

विद्यार्थी काय म्हणतात?

कोरोनाची वाढती स्थिती पाहता परीक्षा देण्याची आमची मानसिकताच नव्हती. त्यामुळे बरं झालं परीक्षा रद्द झाली. बारावीनंतर नीट, जेईई, एनडीएसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे बारावीतील गुणांचा फार मुद्दा येत नाही.

- तुषार चोपडे.

कोरोना वाढत असताना अजूनही लसीकरणही वाढलेले नाही. त्यामुळे परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. आम्हा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हे सीबीएसईने लवकर जाहीर करावे.

- धवल शिंदे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

बारावीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये : १०

विद्यार्थी संख्या : ५५०