शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तृतीयपंथीयांसाठीचे कल्याणकारी मंडळ कागदावरच पायाभूत सर्वेक्षणच नाही : संख्येबाबतही राज्यभरात संभ्रमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:56 IST

राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्थापन केलेले कल्याणकारी मंडळ गेली दोन वर्षे कागदावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून सरकारने स्थापना केली;

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्थापन केलेले कल्याणकारी मंडळ गेली दोन वर्षे कागदावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून सरकारने स्थापना केली; परंतु पुढे त्याबाबत कोणतीच प्रक्रिया केलेली नाही. मुळात तृतीयपंथी म्हणायचे कुणाला व त्यांची नेमकी संख्या किती याबाबतही संभ्रम आहे. त्यासाठीच पायाभूत सर्वेक्षण होण्याची गरज आहे.

न्यायालयाने तृतीयपंथीयांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी लिंग या शब्दासमोर स्त्री-पुरुष व तृतीयपंथी असा पर्याय देऊन त्यांना इतर मागासवर्गीयांना ज्या सवलती मिळतात, त्या द्याव्यात, असा निर्णय जुलै २०१६ मध्ये दिला. राज्य शासनाने केलेल्या २०१४ च्या महिला धोरणातही कल्याणकारी मंडळाचा उल्लेख आहे. त्याचीच दखल घेऊन शासनाने कल्याणकारी मंडळाची घोषणा केली; परंतु ते मंडळ फक्त नावापुरतेच राहिले आहे.

त्यामुळे हे मंडळ नियुक्त करून त्यांना पुरेसे बजेट दिले जावेच; परंतु त्याचवेळी प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी देवदासी पुनर्वसन चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. साधना झाडबुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तृतीयपंथीयांचे सोशल वर्कर व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जावे व त्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे ओळखपत्र दिल्यास योजनांचा लाभ देणे सुलभ होऊ शकते.एक दृष्टिक्षेपस्त्रियांतील समलिंगींना ‘लेस्बियन’ म्हणून ओळख.पुरुषांतील समलिंगींना‘गे’ म्हणून ओळख.पुरुष व महिलांबरोबरही लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना ‘बी’ म्हणून ओळख.शरीर पुरुषाचे; परंतु मानसिकता स्त्रीची किंवा त्याच्या उलटे असा व्यवहार करणाºयांना तृतीयपंथी म्हणून ओळखले जाते.हिजडा ते ईमेल..तृतीयपंथीयांना हिजडा, पावणेआठ, छक्का, देवडा, बंदे, किन्नर, अलक्या, पवय्या, खोजे, लुगडवाला, फातडा, देवमामा, देवमावशी, देवाची आई अशा नावांनी बोलविले जाते. अलीकडे त्यास ‘ईमेल’ म्हणूनही हिणवले जाते.उपजीविकेची साधनेज्यांना देवाला सोडलेले असते, ते धार्मिक विधी करून पोट भरतात.टाळ्या वाजवूनभीक मागणे.मूल जन्माला आल्यावर नाचत आशीर्वाद देऊन मिळणाºया पैशांतून.वेश्याव्यवसाय करून जगणाºयांची संख्यासर्वांत जास्त.