शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बॉक्सच्या वजनावरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:57 IST

कोल्हापूर : एक किलोच्या गुळाच्या बॉक्सच्या वजनावरून शेतकरी, व्यापाºयांच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देगूळ उत्पादक, व्यापारी बैठक :बॉक्ससह हमालांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठकीचा निर्णय

कोल्हापूर : एक किलोच्या गुळाच्या बॉक्सच्या वजनावरून शेतकरी, व्यापाºयांच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. बॉक्सचे पैसे व्यापाºयांनी द्यावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली; तर बॉक्सविरहित गूळ आणावा, आम्ही खरेदी करतो, यावर व्यापारी ठाम राहिल्याने दोन तासांत ठोस तोडगा निघालाच नाही. अखेर बॉक्ससह हमालीच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला.

हंगामात कोणत्याही कारणाने सौदे बंद पडू नयेत, याची दक्षता सर्वच घटकांनी घ्यायची आणि ज्यांच्यामुळे सौदे बंद पडतील त्या संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.गूळ हंगामाबाबत बाजार समितीत शनिवारी शेतकरी, व्यापारी, अडत्यांची बैठक आयोजित केली होती. एक किलो गुळाच्या रव्याच्या पॅकिंगचे वजन धरावे अन्यथा त्याचे पैसे व्यापाºयांनी द्यावेत. दिवसाला एका शेतकºयाचे ६०० ते ९०० रुपयांचे नुकसान होत असल्याचे दादासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. सांगली वगळता उर्वरित बाजारपेठेत पॅकिंगचे वजन धरले जात नाही.

बॉक्सच्या वजनातही तूट असल्याचे टिक्कू पटेल, विक्रम खाडे, पिंटू खोए यांनी सांगितले. यावर हरकत घेत आमच्या गुळाची गुणवत्ता चांगली असूनही सांगली पेठेत ५ ते २५ रुपये जादा दर मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. बॉक्सच्या पैशासाठी भांडता; पण तुमच्या गुळात कचरा व मुंगळे असल्याने अन्न औषध प्रशासन आमच्यावर कारवाई करीत असल्याचा आरोप टिक्कू पटेल यांनी केला. गूळ तयार करण्यापासून सर्व प्रक्रियेत आम्ही स्वच्छता पाळतो. तुमच्या गोडावूनमधील अस्वच्छतेमुळेच मुंगळे लागत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तुम्ही विषयांतर करून दिशाभूल करणार असाल तर गुºहाळघरे चालूच करीत नसल्याचा इशारा उत्तम पाटील यांनी दिला.

कोणत्याही पॅकिंगवर निव्वळ वजन लिहावे, असा कायदा असल्याचे निकेत दोशी व सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. कायदा सांगून शेतकºयांना भीती दाखवू नका, तोडगा काढायचा झाल्यास बॉक्सचे पैसे एकाच घटकावर लादून चालणार नसल्याचे संचालक विलास साठे यांनी ठणकावून सांगितले. याबाबत पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.जादा बॉक्सची हमाली मिळावी, अशी मागणी बाबूराव खोत यांनी केली. दरवर्षी १० टक्के वाढ मिळत असताना नव्याने मुद्दा का काढता, असे विक्रम खाडे, अमीश पटेल यांनी सांगितले. सौद्याची वेळ वाढवावी, असे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले. बॉक्सचे वजन व हमालीबाबत मंगळवारी (दि. १७) बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय झाला. यावेळी बाळासाहेब मनाडे, शिवाजी पाटील, भगवान काटे यांनी चर्चेत भाग घेतला. सभापती सर्जेराव पाटील, उपसभापती आशालता पाटील, सचिव दिलीप राऊत व संचालक उपस्थित होते.लेव्ही वसुली पुरतेच तुम्ही का?सौदे बंद पाडून शेतकºयांचे नुकसान करू नका, असा जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्याचे माथाडी बोर्डाचे निरीक्षक के. डी. खैरे यांनी सांगितले. यावर हरकत घेत हमालांनी संप केला तर माथाडी बोर्डाने पर्यायी व्यवस्था द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त लेव्ही वसुलीपुरते येणार का? अशी विचारणा उपसचिव मोहन सालपे यांनी केली.