शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बॉक्सच्या वजनावरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:57 IST

कोल्हापूर : एक किलोच्या गुळाच्या बॉक्सच्या वजनावरून शेतकरी, व्यापाºयांच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देगूळ उत्पादक, व्यापारी बैठक :बॉक्ससह हमालांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठकीचा निर्णय

कोल्हापूर : एक किलोच्या गुळाच्या बॉक्सच्या वजनावरून शेतकरी, व्यापाºयांच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. बॉक्सचे पैसे व्यापाºयांनी द्यावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली; तर बॉक्सविरहित गूळ आणावा, आम्ही खरेदी करतो, यावर व्यापारी ठाम राहिल्याने दोन तासांत ठोस तोडगा निघालाच नाही. अखेर बॉक्ससह हमालीच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला.

हंगामात कोणत्याही कारणाने सौदे बंद पडू नयेत, याची दक्षता सर्वच घटकांनी घ्यायची आणि ज्यांच्यामुळे सौदे बंद पडतील त्या संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.गूळ हंगामाबाबत बाजार समितीत शनिवारी शेतकरी, व्यापारी, अडत्यांची बैठक आयोजित केली होती. एक किलो गुळाच्या रव्याच्या पॅकिंगचे वजन धरावे अन्यथा त्याचे पैसे व्यापाºयांनी द्यावेत. दिवसाला एका शेतकºयाचे ६०० ते ९०० रुपयांचे नुकसान होत असल्याचे दादासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. सांगली वगळता उर्वरित बाजारपेठेत पॅकिंगचे वजन धरले जात नाही.

बॉक्सच्या वजनातही तूट असल्याचे टिक्कू पटेल, विक्रम खाडे, पिंटू खोए यांनी सांगितले. यावर हरकत घेत आमच्या गुळाची गुणवत्ता चांगली असूनही सांगली पेठेत ५ ते २५ रुपये जादा दर मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. बॉक्सच्या पैशासाठी भांडता; पण तुमच्या गुळात कचरा व मुंगळे असल्याने अन्न औषध प्रशासन आमच्यावर कारवाई करीत असल्याचा आरोप टिक्कू पटेल यांनी केला. गूळ तयार करण्यापासून सर्व प्रक्रियेत आम्ही स्वच्छता पाळतो. तुमच्या गोडावूनमधील अस्वच्छतेमुळेच मुंगळे लागत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तुम्ही विषयांतर करून दिशाभूल करणार असाल तर गुºहाळघरे चालूच करीत नसल्याचा इशारा उत्तम पाटील यांनी दिला.

कोणत्याही पॅकिंगवर निव्वळ वजन लिहावे, असा कायदा असल्याचे निकेत दोशी व सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. कायदा सांगून शेतकºयांना भीती दाखवू नका, तोडगा काढायचा झाल्यास बॉक्सचे पैसे एकाच घटकावर लादून चालणार नसल्याचे संचालक विलास साठे यांनी ठणकावून सांगितले. याबाबत पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.जादा बॉक्सची हमाली मिळावी, अशी मागणी बाबूराव खोत यांनी केली. दरवर्षी १० टक्के वाढ मिळत असताना नव्याने मुद्दा का काढता, असे विक्रम खाडे, अमीश पटेल यांनी सांगितले. सौद्याची वेळ वाढवावी, असे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले. बॉक्सचे वजन व हमालीबाबत मंगळवारी (दि. १७) बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय झाला. यावेळी बाळासाहेब मनाडे, शिवाजी पाटील, भगवान काटे यांनी चर्चेत भाग घेतला. सभापती सर्जेराव पाटील, उपसभापती आशालता पाटील, सचिव दिलीप राऊत व संचालक उपस्थित होते.लेव्ही वसुली पुरतेच तुम्ही का?सौदे बंद पाडून शेतकºयांचे नुकसान करू नका, असा जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्याचे माथाडी बोर्डाचे निरीक्षक के. डी. खैरे यांनी सांगितले. यावर हरकत घेत हमालांनी संप केला तर माथाडी बोर्डाने पर्यायी व्यवस्था द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त लेव्ही वसुलीपुरते येणार का? अशी विचारणा उपसचिव मोहन सालपे यांनी केली.